शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

घाटकुरोडा रेती घाटावरुन चोरटी वाहतूक सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:01 IST

घोगरा येथे तलाठी कार्यालय आहे. मात्र येथील तलाठी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे रेतीघाटावरुन रेतीची चोरटी वाहतूक बिनधास्तपणे सुरु आहे. ट्रॅक्टर मालक आपली मोटारसायकल समोर-समोर घेऊन जातात व त्यांच्या मागोमाग त्यांची रेती भरलेली ट्रॅक्टर नेत असतात. असा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. रेती वाहून नेणाऱ्या जड वाहनांनामुळे या भागातील रस्त्यांची अवस्था फारच दयनिय झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील मुरुम व गिट्टी बाहेर निघालेली आहे. परिणामी या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागाची डोळेझाक : लाखो रुपयांचा महसूल पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा वैनगंगा नदीच्या काठावर दोन रेती घाट आहे. पण सध्या या रेती घाटांचा लिलाव न झाल्याने हे दोन्ही रेतीघाट बंद आहे. मात्र डोंगाघाट रेतीघाटावरुन दररोज रात्री बेरात्री मोठ्या प्रमाणात रेतीच अवैध वाहतूक सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याने मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडत आहे.घोगरा येथे तलाठी कार्यालय आहे. मात्र येथील तलाठी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे रेतीघाटावरुन रेतीची चोरटी वाहतूक बिनधास्तपणे सुरु आहे. ट्रॅक्टर मालक आपली मोटारसायकल समोर-समोर घेऊन जातात व त्यांच्या मागोमाग त्यांची रेती भरलेली ट्रॅक्टर नेत असतात. असा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. रेती वाहून नेणाऱ्या जड वाहनांनामुळे या भागातील रस्त्यांची अवस्था फारच दयनिय झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील मुरुम व गिट्टी बाहेर निघालेली आहे. परिणामी या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. याच रस्त्याने घाटकुरोडा येथील विद्यार्थी व नागरिक बाहेर गावी ये-जा करतात. पण या रस्त्याची अंत्यत दुर्दशा झाली असल्याने या मार्गावरून ये-जा करणाºया विद्यार्थी आणि नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता एकेरी असल्यामुळे अनेकवेळा एखादे जड वाहन येत असल्यास रस्त्याच्या कडेला थांबावे लागते. या रस्त्यांने तुमसर आगाराची तुमसर ते तिरोडा बस व्हाया (घोगरा), (घाटकुरोडा) मार्ग जाऊन तिरोडा येथून ही बस परत येते. पण रस्ता खराब असल्याने ही बस बंद होण्याच्या मार्गावर आहे. तरी सबंधीत अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रेतीची चोरटी वाहतूक बंद करण्याची मागणी सरपंच भिकाबाई देव्हाळे, नत्थू बिसेन, सूर्यप्रकाश भांडारकर, अरुण खळोदे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.