शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

माल्ही येथे गढूळ पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:21 IST

येथील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या माल्ही गावात मागील काही दिवसांपासून गावकऱ्यांना गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे नगर परिषद प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.

ठळक मुद्देन.प.चे दुर्लक्ष : गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात

राजीव फुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : येथील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या माल्ही गावात मागील काही दिवसांपासून गावकऱ्यांना गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे नगर परिषद प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.आमगाव नगर परिषदेच्या हद्दीतील माल्ही गावात बाघ नदीतील पात्रात विहीर तयार करण्यात आली. सदर विहिरीतील पाणी पंपाद्वारे माल्हीतील प्रत्येक वॉर्डाला एक दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागीेल काही दिवसांपासून गावकऱ्यांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. याची माहिती नगर परिषद प्रशासनाला देण्यात आली. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या विहिरीतील गाळाचा उपसा अद्यापही करण्यात आला नाही. तर पाईप लाईनची सुध्दा दुरूस्ती न केल्याने नालीमधील पाणी नळाच्या पाईप लाईनमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाईप लाईन व पाणी टाकी तयार करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि तांत्रीक बाबीकडे दुर्लक्ष केल्याने ही योजना गावकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. या योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.माल्ही येथील लोकसंख्या अडीच हजारावर असून अद्यापही गावकºयांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. माल्ही येथील रस्ते, नाली, गटारे आदींची दैनिय अवस्था झाली आहे. दूषीत व गढूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना विविध आजरांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गंभीर समस्येची प्रशासनाने अद्यापही दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी याची गांर्भियाने दखल घेवून ही समस्या मार्गी लावण्याची मागणी गोकुल कोरे, सुरेश शेंडे, दिनेश शेंडे,राजेश शेंडे, देवचंद धानोरकर, विनोद पाथोडे, जयेंद्र मेंढे, अजय कागदीमेश्राम, योगेश कोरे, रामू शेंडे व गावकºयांनी केली आहे.गावकºयांना पुरवठा करण्यात येत असलेले पाणी दूषीत व गढूळ आहे. यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात न.प.मुख्याधिकाºयांकडे तक्रार केली. मात्र त्यांनी याची दखल घेतली नाही.- प्रशांत कोरे, सामाजिक कार्यकर्ता.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीटंचाई