शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

माल्ही येथे गढूळ पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:21 IST

येथील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या माल्ही गावात मागील काही दिवसांपासून गावकऱ्यांना गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे नगर परिषद प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.

ठळक मुद्देन.प.चे दुर्लक्ष : गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात

राजीव फुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : येथील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या माल्ही गावात मागील काही दिवसांपासून गावकऱ्यांना गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे नगर परिषद प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.आमगाव नगर परिषदेच्या हद्दीतील माल्ही गावात बाघ नदीतील पात्रात विहीर तयार करण्यात आली. सदर विहिरीतील पाणी पंपाद्वारे माल्हीतील प्रत्येक वॉर्डाला एक दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागीेल काही दिवसांपासून गावकऱ्यांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. याची माहिती नगर परिषद प्रशासनाला देण्यात आली. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या विहिरीतील गाळाचा उपसा अद्यापही करण्यात आला नाही. तर पाईप लाईनची सुध्दा दुरूस्ती न केल्याने नालीमधील पाणी नळाच्या पाईप लाईनमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाईप लाईन व पाणी टाकी तयार करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि तांत्रीक बाबीकडे दुर्लक्ष केल्याने ही योजना गावकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. या योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.माल्ही येथील लोकसंख्या अडीच हजारावर असून अद्यापही गावकºयांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. माल्ही येथील रस्ते, नाली, गटारे आदींची दैनिय अवस्था झाली आहे. दूषीत व गढूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना विविध आजरांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गंभीर समस्येची प्रशासनाने अद्यापही दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी याची गांर्भियाने दखल घेवून ही समस्या मार्गी लावण्याची मागणी गोकुल कोरे, सुरेश शेंडे, दिनेश शेंडे,राजेश शेंडे, देवचंद धानोरकर, विनोद पाथोडे, जयेंद्र मेंढे, अजय कागदीमेश्राम, योगेश कोरे, रामू शेंडे व गावकºयांनी केली आहे.गावकºयांना पुरवठा करण्यात येत असलेले पाणी दूषीत व गढूळ आहे. यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात न.प.मुख्याधिकाºयांकडे तक्रार केली. मात्र त्यांनी याची दखल घेतली नाही.- प्रशांत कोरे, सामाजिक कार्यकर्ता.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीटंचाई