शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माल्ही येथे गढूळ पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:21 IST

येथील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या माल्ही गावात मागील काही दिवसांपासून गावकऱ्यांना गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे नगर परिषद प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.

ठळक मुद्देन.प.चे दुर्लक्ष : गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात

राजीव फुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : येथील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या माल्ही गावात मागील काही दिवसांपासून गावकऱ्यांना गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे नगर परिषद प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.आमगाव नगर परिषदेच्या हद्दीतील माल्ही गावात बाघ नदीतील पात्रात विहीर तयार करण्यात आली. सदर विहिरीतील पाणी पंपाद्वारे माल्हीतील प्रत्येक वॉर्डाला एक दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागीेल काही दिवसांपासून गावकऱ्यांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. याची माहिती नगर परिषद प्रशासनाला देण्यात आली. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या विहिरीतील गाळाचा उपसा अद्यापही करण्यात आला नाही. तर पाईप लाईनची सुध्दा दुरूस्ती न केल्याने नालीमधील पाणी नळाच्या पाईप लाईनमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाईप लाईन व पाणी टाकी तयार करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि तांत्रीक बाबीकडे दुर्लक्ष केल्याने ही योजना गावकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. या योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.माल्ही येथील लोकसंख्या अडीच हजारावर असून अद्यापही गावकºयांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. माल्ही येथील रस्ते, नाली, गटारे आदींची दैनिय अवस्था झाली आहे. दूषीत व गढूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना विविध आजरांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गंभीर समस्येची प्रशासनाने अद्यापही दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी याची गांर्भियाने दखल घेवून ही समस्या मार्गी लावण्याची मागणी गोकुल कोरे, सुरेश शेंडे, दिनेश शेंडे,राजेश शेंडे, देवचंद धानोरकर, विनोद पाथोडे, जयेंद्र मेंढे, अजय कागदीमेश्राम, योगेश कोरे, रामू शेंडे व गावकºयांनी केली आहे.गावकºयांना पुरवठा करण्यात येत असलेले पाणी दूषीत व गढूळ आहे. यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात न.प.मुख्याधिकाºयांकडे तक्रार केली. मात्र त्यांनी याची दखल घेतली नाही.- प्रशांत कोरे, सामाजिक कार्यकर्ता.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीटंचाई