शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

गाढवी नदी व नाल्यांचा पूर ओसरला

By admin | Updated: July 17, 2017 01:15 IST

शनिवारी केशोरी परिसरात झालेल्या मूसळधार पावसामुळे गाढवी नदीला पूर आल्याने चिचोली येथील महेंद्र तुळशीराम लांडगे

जनजीवन पूर्वपदावर : ‘त्या’ इसमाचा मृतदेह सापडलालोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : शनिवारी केशोरी परिसरात झालेल्या मूसळधार पावसामुळे गाढवी नदीला पूर आल्याने चिचोली येथील महेंद्र तुळशीराम लांडगे (४०) हा इसम पुरात वाहून गेला. आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकामार्फत मृतदेहाची शोधमोहीम सुरू असताना रविवारी सकाळी ८ वाजता घटनास्थळावरून सुमारे १०० मीटर अंतरावर मृतदेह आढळला. महेंद्रच्या अकाली निधनाने चिचोली गावात शोककळा पसरली आहे. तर गाढवी नदी व परिसरातील नाल्यांचा पूर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर आले आहे.शनिवारी केशोरी परिसरात निसर्गाचा कोप झाला. अवघ्या चार तासांत २६५ मिमी पाऊस पडला. पावसाच्या कहराने गाढवी नदीने रौद्र रूप धारण केले. एरवी केवळ इटयाडोह धरणाच्या ओव्हरफ्लोमुळे ओसंडून वाहणारी गाढवी नदी पहिल्यांदाच अतिवृष्टीमुळे दुथडी वाहू लागली. परिसरातील शेतात सर्वत्र पाणी जमा झाले. शेतातून नदी-नाल्यासारखा प्रवाह वाहू लागला. जरूघाटा गावातील घराघरांत पाणी घुसले. जरूघाटावासीयांनी पहाटे ४ वाजतापासून समाजमंदिरात गोळा होवून वेळ काढला. त्यांच्या मनात केवळ दहशत होती. जरूघाटा गावात कधीच एवढे पुराचे पाणी येत नाही. मात्र हा प्रकोप पहिल्यांदाच घडल्याचे जाणकार सांगतात. केवळ १० ते १२ किमीच्या अंतरात एवढा पावसाचा प्रकोप कसा, हा उलगडा अद्यापही जरूघाटा व परिसरातील जनतेच्या मनात घर करून आहे.प्रतापगड व गोठणगाव डोंगरमाथ्यावर अतिवृष्टी झाली. डोंगरमाथ्यावरून प्रचंड वेगाने हे पाणी खाली उतरले. सोबतच डोंगरावरील दगडधोंडे वेगाने पाण्याच्या प्रवाहासोबत उतरल्याने प्रतापगडच्या आसपास रस्त्यावर दगडधोंडे दिसून येत आहेत. डोंगरावरून पाणी अतिवेगाने गाढवी नदी व चिचोलीच्या दिशेने आल्याने एकाएकीच पूर आल्याचे बोलले जात आहे. या अतितीव्र पाण्याच्या प्रवाहात महेंद्र वाहून गेला. तो शनिवारी सकाळी केशोरीला गेला तेव्हा नदी व नजीकच्या परिसरात पाणी नव्हते. मात्र तो जेव्हा परतला तेव्हा चहुकडे पाणीच पाणी होते. बाहेर निघता येईना. महेंद्र वाहून जात असताना इतर तिघे सावध झाले. त्यांनी बचावासाठी गाढवी नदीवरील उंचवठ्यावर सुरक्षेच्या दृष्टीने राहणे पसंत केले. याची माहिती तालुका प्रशासनाला देण्यात आली. लगेच आपत्ती व्यवस्थापन पथक चिचोली गावाला रवाना करण्यात आले. त्यावेळी तिघे जण पसरलेल्या पाण्याच्या उंचवठ्यावर मदतीची प्रतीक्षा करीत होते. बचाव पथकाने सुमारे पाच फूट पाण्यात उतरून पुरात अडकलेल्या तिघांपर्यंत दोरखंड बांधले व या दोरखंडाच्या सहाय्याने तिघेही सुखरूप चिचोलीला परतले. वेळीच मदत मिळाली म्हणून तिघे बचावले. मात्र महेंद्र पूरबळी ठरला. या अतिवृष्टीच्या पाण्यामुळे इतर नाल्यांनासुद्धा पूर आला. त्यामुळे काही काळ जनजीवन प्रभावित झाले होते. मोरगाव ते निलज दरम्यानच्या नाल्यावर पाणी असल्याने महागाव ते अर्जुनी वाहतूक बंद होती. महागाव ते खामखुरा दरम्यानच्या नाल्यावर सुमारे पाच ते सहा फूट पाणी होते.घर, गोठे, पशू व पिकांचे नुकसानया अतिवृष्टीमुळे केशोरी व महागाव महसूल मंडळात घर, गोठे व पशुहानी झाली आहे. शिवाय धानपीक व बागायती पिकांचेही नुकसान झाले आहे. तलाठ्यांनी घरांच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले. शेतपिकांच्या नुकसानीचे अद्यापही सर्वेक्षण सुरू झालेले नाही. कृषी विभागाचे कर्मचारी व तलाठी मिळून येत्या एकदोन दिवसात संयुक्त सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती केशोरीचे मंडळ अधिकारी एल.यू. मेश्राम यांनी दिली. सर्वेक्षणानंतरच पीक नुकसानीची आकडेवारी कळेल. मांडोखाल येथील चार जनावरे घरी परतलेच नाही. अतिवृष्टीनंतर ते जंगलात भटकत आहेत की पुरात वाहून गेले, ते अद्यापही कळले नाही.