शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

यंदाही गणरायाचे आगमन खड्ड्यातूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:02 IST

गणेशोत्सव अवघ्या बारा दिवसांवर आला असताना अद्यापही शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले नाही. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून आता डबके तयार झाले आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेचे दुर्लक्ष : गणेशभक्तात नाराजी, केव्हा पालटणार रस्त्यांचे रूप? मलमपट्टी किती दिवस चालणार?

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गणेशोत्सव अवघ्या बारा दिवसांवर आला असताना अद्यापही शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले नाही. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून आता डबके तयार झाले आहे. मात्र खड्डे बुजविण्याची जबाबदारी असलेल्या नगर परिषदेचे याकडे दुुर्लक्ष झाल्याने गणरायाचे आगमन यंदा शहरात खड्ड्यांमधूनच होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे.पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी शहरातील रस्त्यांची डागडूजी करण्याची जबाबदारी स्थानिक नगर परिषदेची आहे. मात्र यंदा नगर परिषदेला पावसाळ्यापूर्वी ही कामे करण्याचा विसर पडला. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात नगर परिषदेने मलमा टाकून शहरातील खड्ड्यांना मलमपट्टी करण्याचे काम सुरू केले. मात्र १५ आॅगस्टनंतर शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यांची डागडूजी करण्यासाठी टाकलेला मलमा वाहून गेला. त्यामुळे रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे झाली आहे. शहरातील सिव्हील लाईन, गोरेलाल चौक, मामा चौक, शास्त्रीवार्ड, छोटा गोंदिया, एन.एम.डी.कॉलेज रोड, पाल चौक व रेल्वे स्थानकाच्या मागील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. विशेष म्हणजे या भागात दरवर्षी सर्वाधिक सार्वजनिक गणेशाची स्थापना केली जाते. तर गणेश मंडळे सिव्हिल लाईन बोडी परिसतील मुर्तीकारांकडून वाजत गाजत गणेशमूर्त्या स्थापन करण्यासाठी नेतात. मात्र या मार्गावर खड्डेच खड्डे पडले असून या खड्डयांमधून गणेशभक्तांना मुर्त्या स्थापन करण्यासाठी घेवून जाव्या लागणार आहेत. त्यामुळे यंदाही गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच होणार असल्याचे चित्र आहे. गणेश चतुर्थीला केवळ बारा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे नगर परिषदेला गणेशभक्तांची आणि शहरवासीयांची किती काळजी आहे, हे दिसून येते.रस्त्यांच्या कामाने अडचणनगर परिषदेतर्फे शहरातील रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाची सुरूवात गोरेलाल चौकातून करण्यात आली. सध्या या रस्त्यांची कामे अर्धवट झाली असून यामुळे या मार्गावरुन ये-जा करण्यास अडचण निर्माण होत आहे. रस्त्यांच्या कामाचा फटका गणेशभक्तांना सुद्धा बसणार असून त्यांना गणेशमूर्त्यांची स्थापना करण्यासाठी आणताना मोठी कसरत करावी लागणार आहे.खड्ड्यांना चुरी व मलम्याचा आधारशहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी नगर परिषदेने मलमा आणि चुरीचा वापर केला. मात्र पावसामुळे खड्ड्यांमधील चुरी व मलमा वाहून गेला आहे. त्यामुळे रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. तर खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून डबके तयार झाल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनचालक आणि नागरिकांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.शहरासह ग्रामीण रस्त्यांची लागली वाटखड्ड्यांंची समस्या केवळ शहरातच नसून जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कायम आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची डागडूजी कामेच करण्यात आली नसल्याने या रस्त्यांची अक्षरक्ष: चाळणी झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन ये-जा करताना गावकºयांच्या नाकीनऊ येत आहेत.

टॅग्स :Ganpati Utsavगणपती उत्सव