शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

भरकटलेल्या पावलांना सावरतेय ‘मैत्री’

By admin | Updated: September 14, 2016 00:22 IST

आपल्या पाल्यांच्या मनात येणाऱ्या वाईट विचारांमुळे आपण त्रस्त आहात? आपला मुलगा, मुलगी संकुचित वृत्तीमुळे आपल्याशी बिनधास्त बोलू शकत नाही?

१८८७ जणांचे समुपदेशन : ९५२ किशोर व ९३५ किशोरींचा समावेशनरेश रहिले गोंदियाआपल्या पाल्यांच्या मनात येणाऱ्या वाईट विचारांमुळे आपण त्रस्त आहात? आपला मुलगा, मुलगी संकुचित वृत्तीमुळे आपल्याशी बिनधास्त बोलू शकत नाही? आपण त्यांच्या भविष्याला घेऊन चिंताग्रस्त आहात? या प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असतील तर काळजीचे कारण नाही. त्या बालकांच्या शंका-कुशंकांचे समाधान करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने समुपदेशन ‘मैत्री’ संवाद केंद्र कार्यरत झाले आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाव्यतिरिक्त जिल्हाभरातील किशोरवयीन मुला-मुलींच्या समस्याचे समाधान या ‘मैत्री’तून केले जात आहे. आतापर्यंत यातून १८८७ मुलामुलींचे समुपदेशन केल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या ‘मैत्री’ संवाद केंद्रात या प्रकारच्या समस्येने ग्रस्त मुले-मुली दाखल होतात. बालकांच्या विक्षिप्त कृत्याची तक्रार शिक्षक-पालकांकडून केली जाते. परंतु त्यात चुक त्या मुला-मुलींची नसते. वाढत्या वयासोबत त्यांच्यात शारीरिक व मानसिक बदल होतात. या बदलाला सांभाळताना अनेक समस्या येतात. या समस्येचे योग्य समाधान करण्यासाठी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास ते स्वत:च समस्यांचे समाधान शोधण्याचा प्रयत्न करतात. यातून ते चुकीच्या मार्गावरही जातात. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात १० ते १९ वर्षातील मुला-मुलींसाठी ‘मैत्री’ संवाद व सेवा केंद्र सुरू करण्यात आले. बाई गंगाबाई महिला रूग्णालय मध्ये गुरुवार, तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात बुधवारी व देवरीच्या ग्रामीण रूग्णालयात शुक्रवारी ही सेवा दिली जात आहे.वेळेवर मार्गदर्शन गरजेचे किशोरवयीन बालकांच्या समस्येवर वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. बालकांच्या समस्या समाधानासाठी ‘मैत्री’ संवाद केंदाकडून आश्रमशाळा, झोपडपट्टी परिसर, शाळांमध्ये मार्गदर्शन केले जाते. बालकांच्या समस्यांना घेऊन काही पालक व शिक्षक ‘मैत्री’ संवाद केंद्रात येतात. परंतु बालक आपल्या पाल्यांसामोर मनमोकळ्या पणाने बोलत नाहीत. अश्यावेळी त्या बालकांसोबत एकट्यात बोलले जाते. किंवा आपल्या समस्या कागदावर लिहून दिले जाते. १८८७ मुले-मुली योग्य मार्गावरअर्श कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते आॅगस्ट अखेरपर्यंत १८८७ मुला-मुलींना ‘मैत्री’ संवाद केंद्रातून मार्गदर्शन करण्यात आले. यात ९५२ किशोर व ९३५ किशोरींचा समावेश आहे. आॅगस्ट महिन्यात २६० युवक व २४२ युवतींना या केंद्राच्या माध्यमातून चांगल्या मार्गावर आल्या. एप्रिल ते आॅगस्ट अखेर जिल्हा सामान्य रूग्णालयात ७४४, महिला रूग्णालय ५१६ तिरोडा उपजिल्हा रूग्णालय २८८, देवरी ग्रामीण रूग्णालयात ३९९ युवक-युवतींना मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे होतात समस्या किशोरवयीन मुला-मुलींच्या हातात आता स्मार्ट फोन आला आहे. इंटरनेटचा सर्रास होत असलेला वापर, टी.व्ही. चॅनलवर जे दाखवायला नको ते दाखविले जाते. त्यामुळे वाटईट कृत्य करण्याचा प्रयत्न प्रौगंडावस्थेतील मुले-मुली करतात.यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. शाळांमध्येही या प्रकारच्या समस्या वाढत आहेत. बालके प्रौढ व्यक्तीसारखा व्यवहार करतात. या प्रकरातून लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर येतात.‘मैत्री’ संवाद केंद्राच्या माध्यमातून किशोर-किशोरी यांना शारीरिक, मानसिक व लैंगिक आरोग्यासंदर्भात माहिती दिली जाते. मोफत हिमोग्लोबीन, रक्त व सिकलसेल तपासणी करण्यात येते. विवाह पूर्व मार्गदर्शन, आहार विषयक मार्गदर्शन व रक्ताची कमतरता यावर उपचार केला जातो. मुलींना मासिक धर्म आजारासंदर्भात माहिती दिली जाते. प्रजनन व लैंगिक आजारासंबंधी प्रतिबंधक आरोग्य शिक्षण व उपाय योजना केली जाते. हे सर्व गुप्त ठेवले जाते.