शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अखेरच्या घटका मोजणाऱ्या शाळेला चौघींनी दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

या ऐतिहासिक शाळेची पटसंख्या सन २०१८ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीसाठी १५ होती. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या शाळेकडे शहरातीलच पालकांनी पाठ फिरविली. त्याला विविध कारणे असली तरी स्वातंत्र्य पूर्व काळातील या शाळेचे दुर्देव की तिला विद्यार्थ्यांची वाट होती. विद्यार्थी या शाळेकडे फिरकायला तयार नव्हते.

ठळक मुद्देआव्हान गुणवत्तेचे : निरूत्साही वातावरणाला बनविणार आनंददायी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा तालुक्यात सर्वात प्रथम सन १८८७ मध्ये स्थापन झालेली ऐतिहासिक शाळा म्हणजे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आहे. प्रचंड विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेत कधी विद्यार्थी मिळणारच नाही अशी वेळ येऊ शकते, असे कुणाला कधी स्वप्नातही वाटले नसेल. पण असे झाले. या ऐतिहासिक शाळेची पटसंख्या सन २०१८ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीसाठी १५ होती. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या शाळेकडे शहरातीलच पालकांनी पाठ फिरविली. त्याला विविध कारणे असली तरी स्वातंत्र्य पूर्व काळातील या शाळेचे दुर्देव की तिला विद्यार्थ्यांची वाट होती. विद्यार्थी या शाळेकडे फिरकायला तयार नव्हते. अशात सन २०१८ मधील बदल्यांत चार शिक्षिका या शाळेत बदलून आल्या व त्यांच्या प्रयत्नांनी या शाळेला जीवदान मिळाले.बांते, पटले, चिंचमलातपुरे आणि भोंगाडे या चार शिक्षिकांच्या आगमनाने शाळेत आशेचा किरण दिसला. या चौघींनी जेव्हा शाळेत पहिले पाऊल टाकले तेव्हा शाळेची दुरवस्था बघून तर त्या हवालदिल झाल्या. विद्यार्थी तर नाहीतच पण शाळेमध्ये भौतिक सोयींचा अतिशय अभाव होता.शाळा अतिशय जूनी व निरूत्साही अशा कंटाळवाण्या खोल्या, शाळेच्या रंगरूपाचा पूर्णपणे अभाव त्या शिक्षिकांना दिसला. परंतु शाळेचा चेहरामोहरा बदलविण्याचा चंग मुख्याध्यापिका बांते व त्यांच्या इतर सहकारी शिक्षिकांनी बांधला.त्यानुसार, शाळेचा चेहरामोहरा बदलविण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली व शिक्षिका कामाला लागल्या. आधी पटसंख्या वाढविण्याला सुरूवात केली. शाळेची शोभा म्हणजे विद्यार्थी. परंतु तेच नसतील तर ती वस्तू शाळा होऊच शकणार नाही.त्यासाठी शाळा सुरू होण्याच्या ८ दिवसांपूर्वी त्यांनी गावातच मुक्काम केला. पालकांच्या भेटी घेणे त्यांचे मन वाळविणे हे खुले जटील काम होते. पण सततच्या पाठपुराव्याने यश आले. काही पालक या चौघींच्या विश्वासावर मुलांना या शाळेत प्रवेश देण्यास तयार झाले.आता हळुहळु मुले तर शाळेत प्रवेश घेऊ लागली पण कंटाळवाने असलेले शाळेचे रूप बदलून गेले आहे.निराश व कंटाळवाण्या वातावरणात विद्यार्थ्यांना पूर्णवेळ बसण्यास प्रेरित करणे अवघड होते. अशात या चौघींनी प्रथम स्वत: पासून सुरूवात केली. शाळेला नवरूप आणण्यासाठी मग शाळा व्यवस्थापन समितीला सुद्धा हुरूप आला व ते सुद्धा मदतीला तयार झाले. स्वत: व लोकसहभागातून शाळेचे रूप बऱ्याच प्रमाणात बदलण्यात त्या यशस्वी झाल्या.तिरोडा तालुक्यात सर्वात जूनी असलेली शाळा इतिहास जमा होण्याच्या मार्गावर होती. परंतु या शाळेतील चौघा शिक्षिकांनी या शाळेला फुलविण्याचे काम केले. पटसंख्या व गुणवत्ता वाढीवर त्यांचा भर आहे.-डॉ. किरण धांडेवरिष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया.आव्हान गुणवत्ता वाढविण्याचेप्रवेशित मुलांची गुणवत्ता वाढविणे हे फार मोठे आव्हान त्या चौघा शिक्षिकांसमोर होते. कारण शहरी भागात जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोण थोडासा नकारात्मक असतो. त्यामुळे शिक्षणाबाबत जागरूक असलेले पालक या शाळेकडे वळतच नव्हते. शहरातील खाजगी शाळांकडे त्यांचे लक्ष होते. या शाळेत प्रवेशीत सर्व मुले ज्यांच्या पालकांना फारसा शिक्षणाचा गंध नाही अशी आहेत. परंतु या चारही शिक्षिकांची आता खरी परीक्षा सुरू झाली आहे. खासगी शाळांच्या बरोबरीचा विद्यार्थी या शाळेतून घडावा अशी गुणवत्ता विद्यार्थ्यांत टाकण्याचे आव्हान त्या शिक्षिकांपुढे आहे.पालकांचा विश्वास बसलामुलांच्या गुणवत्तेसाठी त्या चारही शिक्षिकांनी कंबर कसली. आज या शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तम वाचन करतात. त्याचप्रमाणे ईयत्ता पहिली सोडून सर्व मुले भागाकार स्तरावर आहेत. ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ बंद पडण्याच्या स्थितीत असलेल्या शाळेचा आजची पटसंख्या ३५ झाली. पुढच्या सत्रात ही पटसंख्या अजून वाढणार आहे. कारण आपले मूल या सरकारी शाळेतही उत्तम शिकू शकतात हा विश्वास पालकांमध्ये निर्माण झाला आहे.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक