शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

पर्यावरणपूरक उत्सवासाठी फाऊंडेशनची धडपड

By admin | Updated: September 18, 2015 01:32 IST

मांगल्याच्या देवतेचा १० दिवसांचा सण पर्यावरणाला हानी न पोहचविता साजरा करावा यासाठी मध्यभरतात पर्यावरण व वन्यजीव संरक्षणतसेच संवर्धनासाठी ....

गोंदिया : मांगल्याच्या देवतेचा १० दिवसांचा सण पर्यावरणाला हानी न पोहचविता साजरा करावा यासाठी मध्यभरतात पर्यावरण व वन्यजीव संरक्षणतसेच संवर्धनासाठी अग्रणी असलेल्या सातपुडा फाऊंडेशनच्या वतीने धडपड सुरू आहे. यासाठी फाऊंडेशनच्यावतीने ग्रामीण भागात जनजागृतीचे काम सुरू असून शाळेतील विद्यार्थ्यांना मातीचे गणपती व निर्माल्यातून खत तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. गणपती उत्सवाला गुरूवारपासून (दि.१७) सर्वत्र थाटात सुरूवात झाली आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील उत्सवाची परंपरा काही औरच आहे. एकाहून एक देखावे व मुर्त्यांची स्थापना येथे केली जात असल्याने गोंदियातील उत्सव लगतच्या राज्यांपर्यंत आपली ख्याती निर्माण करून आहे. मात्र उत्सवाच्या या थाटामाटात मानवाच्या हातून काही घोडचुकाही घडत आहेत. पर्यावरणाला विसरून सध्या उत्सव साजरा केला जात आहे. परिणामी १० दिवसांच्या या उत्सवानंतर नदी,नाल व तलाव निर्माल्य व विसर्जन करण्यात आलेल्या मुर्त्यांनी भरलेले दिसतात. या प्रकारावर आळा बसावा व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा यासाठी फाऊंडेशनने जनजागृती सुरू केली आहे. फाऊंडेशनचे प्रशिक्षक व संवर्धन अधिकारी मुकुंद धुर्वे ग्रामीण भागातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राला लागून असलेल्या गावांत हा उपक्रम राबवित आहेत. यात ते या परिसरातील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक मातीचे गणपती अगदी सोप्या पद्धतीने तयार करण्याचे तसेच १० दिवसांत निघालेल्या निर्माल्यापासून खते तयार करण्याचे प्रशिक्षण देत आहेत. फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे व संचालक गिरी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविला जात आहे. त्याला ग्रामीण भागात प्रतिसादही मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)स्वत: तयार केलेल्या मूर्तींची स्थापना धुर्वे यांनी जीईएस हायस्कूल कुऱ्हाडी, आदिलोक विद्यालय हायस्कूल बोळूंदा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळ बागडबन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगेझरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडेबर्रा, जीईएस हायस्कूल कवलेवाडा आदी शाळांमध्ये मातीची मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण शिक्षक व विद्यार्थ्यांना दिले. याचे फलित असे की, सर्वांनी आपल्या घरी स्वत: मातीची मूर्र्ती तयार करून व तिला नैसर्गिक रंगांनीच रंग देऊन स्थापना केली आहे. एक गाव- एक गणपतीची सुरूवात सातपुडा फाऊंडेशनच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या जनजागृती उपक्रमापासून प्रेरीत होत मंगेझरी, बोळूंदा, कोडेबर्रा, बागळबन या गावांत एक गाव- एक गणपती ला सुरूवात करण्यात आली आहे. शासनाकडून एक गाव एक-एक गणपती ही मोहिम राबविली जाते. अशात फाऊंडेशनच्या माध्यमातून शासनाच्या या मोहिमेला हातभार लावला जात आहे. गावात शांतता पूर्वक गणपती उत्सव साजरा व्हावा हा या मागचा हेतू असतो.