शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये थरार! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग, भाजपा इच्छुकांचा कारनामा
2
शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला! धापा टाकत कार्यकर्ता अखेर अर्ज घेऊन आला
3
Amit Shah : Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
4
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
5
मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
नाराजी टाळण्यासाठी एबी फॉर्मबाबत सस्पेन्स, उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस : युतीची शक्यता कमीच
7
उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'?
8
जालना मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा; शिंदेसेना-भाजपात १२ प्रभागांतील जागांवर एकमत
9
Nashik Municipal Corporation Election : नाशकात शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र; महायुतीत फूट तर मविआत एकजूट, भाजपकडून 'ही' नावं निश्चित
10
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
11
Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
12
वादळाने दृष्टी हिरावली, 'दिव्यदृष्टी'ने भाकितं वर्तवली; बाबा वेंगा कोण होत्या? त्यांनी खरंच हे सगळं लिहून ठेवलंय?
13
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
14
विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
15
बच्चू कडूंच्या प्रहारची उद्धवसेनेसोबत युती, पण उमेदवार लढणार मशाल चिन्हावर!
16
Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन
17
मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
18
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य   
19
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
20
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
Daily Top 2Weekly Top 5

वनांची कत्तल, वाढत्या प्रदूषणाने पर्यावरण संकटात

By admin | Updated: June 4, 2014 23:50 IST

निसर्ग संपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात वृक्षतोड मोठय़ा प्रमाणात होत आहे. सतत जंगलांना लागणारी आग, वृक्षतोड व प्रदूषणात होणार्‍या वाढीमुळे पर्यावरण संकटात आले आहे. पर्यावरणाचा र्‍हास

नरेश रहिले - गोंदियानिसर्ग संपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात वृक्षतोड मोठय़ा प्रमाणात होत आहे. सतत जंगलांना लागणारी आग,  वृक्षतोड व प्रदूषणात होणार्‍या वाढीमुळे पर्यावरण संकटात आले आहे. पर्यावरणाचा र्‍हास  मानवाच्या जीवनावर बेतू लागला आहे. गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार ५४२. २८९ चौ.कि.मी. अंतरात वनजमीन आहे. यातील १७३१.८00 चौ.कि.मी. जागा प्रादेशिक वनविभागाची आहे. तर ४८३.१७२ चौ.कि.मी. वन्यजीव विभागाच्या अंतर्गत आहे. तर ३२७.३१७ चौ.कि.मी. वन हे वनविकास महामंडळाच्या अंतर्गत आहे. निसर्ग सृष्टीने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील वनांचे माळरानात रुपांतर होत आहे. वनमाफियांकडून सर्रासपणे जंगल तोड होत आहे. या वृक्षतोडीला काही वनाधिकार्‍यांचेही सहकार्य आहे. होणार्‍या वृक्षकटाईमुळे निसर्गाचा लहरीपणा दिसू लागला आहे. पाण्याचे  स्त्रोत कमी होत असल्याचे जाणवते. पर्यावरण प्रदुषणात वाढ करणारे मोठे माध्यम म्हणजे जिल्ह्यातील राईस मिल व मोठय़ा प्रमाणात असलेल्या वाहनांची संख्या आहे. राईस मिलमधून बाहेर टाकण्यात येणारा धूर लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचविणारा आहे. शहराच्या ठिकाणी राईस मिल राहू नये असे नियम असताना देखील शहरी भागातच अनेक व्यापार्‍यांच्या राईस मिल राजरोसपणे सुरू आहेत. राईस मिल मालकांनी निघणार्‍या धूराला आटोक्यात आणण्यासाठी मिल परिसरात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. परंतु एकही राईस मिल मालक वृक्षारोपण करताना दिसत नाही. पर्यावरणाच्या र्‍हासासाठी माणूसच जबाबदार असून वनविभागही याकडे दुर्लक्ष करीत आहे. गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात यावर्षी जंगलात आगीच्या ६३ घटना घडल्या. यात १५४.१0 हेक्टर वनपरिसरात आग लागली. या आगीत कोट्यवधीचे नुकसान झाले. परंतु वनविभाग कवडीचेही नुकसान झाले नाही असे म्हणते. म्हणजे ६३ आगिच्या घटनांची नोंद झाली मात्र आगीत कवडीचीही संपती जळाली नाही ही आश्‍चर्याची बाब आहे. जेव्हा कुंपणच शेत खाते ही स्थिती गोंदिया जिल्ह्याच्या वनविभागाची झाली आहे. या सर्व प्रकारामुळे मात्र पर्यावरण संकटात सापडत आहे.