शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

अन्न व औषध विभागाची फक्त एकच कारवाई

By admin | Updated: October 28, 2014 22:58 IST

दिवाळीच्या दिवसांत मिष्ठान्नांत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा वापर होत असल्याचा गोंदिया शहराचा इतिहास आहे. असे असतानाही मात्र यंदाच्या दिवाळीत अन्न व औषध

नागपूरच्या अधिकाऱ्यांना गोंदियाचा प्रभार : भेसळ फोफावल्याची शक्यतागोंदिया : दिवाळीच्या दिवसांत मिष्ठान्नांत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा वापर होत असल्याचा गोंदिया शहराचा इतिहास आहे. असे असतानाही मात्र यंदाच्या दिवाळीत अन्न व औषध प्रशासनाकडून शहरात भेसळ तपासणीची फक्त एकच कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. विभागाकडून काहीच ठोस पाऊलं उचलण्यात येत नसल्याचे बघून मोठ्या प्रमाणात भेसळ फोफावली असल्याचे व दिवाळीत शहरवासीयांनी भेसळयुक्त मिष्ठान्नांचे सेवन केले असे बोलणे वावगे ठरणार नाही. एकंदर अन्न व औषध प्रशासनाचा अफलातून कारभार मात्र शहरवासीयांसाठी धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. अन्न व औषधांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. अशा प्रकारांची माहिती मिळाल्यास विभागाकडून कारवाई करून भेसळीचे प्रकार रोखले जातात. दिवाळीत मोठया प्रमाणात मिष्ठान्नांची उलाढाल होते. या मिष्ठान्नांत येथील काही विक्रेते भेसळयुक्त व शिळा खवा, पनिर, दूध व अन्य पदार्थांचा वापर करतात. विशेष म्हणजे हा प्रकार खुद्द विभागानेच मध्यंतरी कारवाया करून उघडकीस आणला होता. त्यानुसार यंदाही भेसळयुक्त पदार्थांपासून मिष्ठान्न तयार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट होते. मात्र असे असतानाही विभागाकडून काही ठोस उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून आले नाही. येथील अन्न व औषध विभागात अफलातून कारभार सुरू आहे. येथे विभागाचे कार्यालय आहे मात्र मनुष्यबळ नसल्याने भंडारा कार्यालयातील फक्त एक लिपीक येथे येतो. त्यांना काहीच अधिकारी नसल्याने ते फक्त दिवस घालवून सायंकाळी परत निघून जातात. शिवाय धक्कादायक बाब अशी की, गोंदिया जिल्ह्याचे अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून नागपूरचे अधिकारी प्रवीण उमप यांच्याकडे प्रभार देण्यात आला आहे. त्यांना नागपूर सांभाळून गोंदियाकडेही लक्ष द्यायचे आहे. अशात उमप यांनी १८ आॅक्टोबर रोजी शहरातील सिव्हील लाईंसमधील आकाशगंगा डेअरीवर कारवाई करून त्यांच्याकडील दुध व खव्याचे सॅम्पल घेतले. घेण्यात आलेले सॅम्पल मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अद्याप त्यांचा अहवाल प्राप्त झालेला नसल्याचे उमप यांनी सांगीतले. यानंतर मात्र उमप नागपूरला निघून गेले व परत न आल्याने येथील डेअरीवाल्यांना रान मोकळे होते. नेमका याचाच फायदा घेत मिष्ठान्न तयार करणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मिष्ठान्न तयार करून शहरवासीयांपुढे मांडल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारातून मात्र विभागाची लचर कार्यप्रणाली पुढे येते. विभागाकडे असलेली मनुष्यबळाची कमतरता मात्र सामान्य नागरिकांच्या जिव्हारी येत असल्याचाच हा प्रकार आहे. (शहर प्रतिनिधी)