शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

गोंदियात पूर परिस्थिती, जवळपास ४० मार्ग बंद; प्रमुख धरणाचे दरवाजे उघडले, अनेक कर्माचारी अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 09:04 IST

पावसामुळे १५ ऑगस्टच्या ध्वजारोहण कार्यक्रमांवर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सोमवारी सकाळी ही पावसाचा जोर कायम होता. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून ४० मार्ग बंद झाले आहे. तर सर्वच प्रमुख धरणाचे दरवाजे उघडल्याने नदी नाल्यांना पूर आला असून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह आणि तिरोडा तालुक्यातील चोरखमारा सिंचन प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात बुधवारपर्यंत पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूर परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. पावसामुळे १५ ऑगस्टच्या ध्वजारोहण कार्यक्रमांवर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणाऱ्या गोंदिया-बालाघाट मार्गावरील बाघ नदीवरील छोट्या पुलावरुन १५ फूट वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या ३५ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गोंदिया-कोहमारा मार्गावरील आजरी-डव्वा पुलावरुन पाणी वाहत असल्याने सडक अर्जुनी ते गोंदिया मार्ग बंद झाला आहे. गोरेगाव ते ठाणा मार्गावरील पांगोली नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला आहे. तर सालेकसा तालुक्यातील भजेपार-गांधीटोला, भजेपार-अंजोरा, भजेपार-बोरकन्हार, भजेपार-साकरीटोला, आमगाव सालेकसा, पानगाव सोनपुरी, पिपरिया -सालेकसा हा मार्ग बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास ४१ वर प्रमुख मार्ग बंद झाले आहे. सालेकसा तालुक्यातील बेवारटोला प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने या तालुक्यातील पूर परिस्थिती गंभीर झाली आहे.

जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणाचे दरवाजे उघडले

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सिरपूर धरणाचे ७ दरवाजे, कालीसरार ५ दरवाजे, पुजारीटोला धरणाचे १३ दरवाजे, संजय सराेवरचे ६ दरवाजे व बावनथडी प्रकल्पाचे ६ गेट उघडण्यात आले आहे. तर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिल्याने प्रशासनाने जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अनेक कर्मचारी अडकले

स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम सोमवारी सकाळी होता. मात्र जिल्ह्यातील ४१ वर प्रमुख मार्ग बंद असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना ध्वजारोहण कार्यक्रमापासून वंचित राहण्याची वेळ आली.

टॅग्स :floodपूरRainपाऊस