शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

गोंदियात पूर परिस्थिती, जवळपास ४० मार्ग बंद; प्रमुख धरणाचे दरवाजे उघडले, अनेक कर्माचारी अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 09:04 IST

पावसामुळे १५ ऑगस्टच्या ध्वजारोहण कार्यक्रमांवर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सोमवारी सकाळी ही पावसाचा जोर कायम होता. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून ४० मार्ग बंद झाले आहे. तर सर्वच प्रमुख धरणाचे दरवाजे उघडल्याने नदी नाल्यांना पूर आला असून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह आणि तिरोडा तालुक्यातील चोरखमारा सिंचन प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात बुधवारपर्यंत पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूर परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. पावसामुळे १५ ऑगस्टच्या ध्वजारोहण कार्यक्रमांवर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणाऱ्या गोंदिया-बालाघाट मार्गावरील बाघ नदीवरील छोट्या पुलावरुन १५ फूट वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या ३५ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गोंदिया-कोहमारा मार्गावरील आजरी-डव्वा पुलावरुन पाणी वाहत असल्याने सडक अर्जुनी ते गोंदिया मार्ग बंद झाला आहे. गोरेगाव ते ठाणा मार्गावरील पांगोली नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला आहे. तर सालेकसा तालुक्यातील भजेपार-गांधीटोला, भजेपार-अंजोरा, भजेपार-बोरकन्हार, भजेपार-साकरीटोला, आमगाव सालेकसा, पानगाव सोनपुरी, पिपरिया -सालेकसा हा मार्ग बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास ४१ वर प्रमुख मार्ग बंद झाले आहे. सालेकसा तालुक्यातील बेवारटोला प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने या तालुक्यातील पूर परिस्थिती गंभीर झाली आहे.

जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणाचे दरवाजे उघडले

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सिरपूर धरणाचे ७ दरवाजे, कालीसरार ५ दरवाजे, पुजारीटोला धरणाचे १३ दरवाजे, संजय सराेवरचे ६ दरवाजे व बावनथडी प्रकल्पाचे ६ गेट उघडण्यात आले आहे. तर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिल्याने प्रशासनाने जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अनेक कर्मचारी अडकले

स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम सोमवारी सकाळी होता. मात्र जिल्ह्यातील ४१ वर प्रमुख मार्ग बंद असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना ध्वजारोहण कार्यक्रमापासून वंचित राहण्याची वेळ आली.

टॅग्स :floodपूरRainपाऊस