शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

ग्रामस्थांच्या समस्या मार्गी लावू

By admin | Updated: October 26, 2015 01:59 IST

खेड्याच्या विकासामध्येच देशाचा विकास दडला आहे. शेवटच्या टोकावरील माणूसच विकासाचा मुख्य केंद्रबिंदू ...

सामान्य जनतेच्या कामाला प्राधान्य : पालीवाल यांनी ऐकल्या व्यथाबोंडगावदेवी : खेड्याच्या विकासामध्येच देशाचा विकास दडला आहे. शेवटच्या टोकावरील माणूसच विकासाचा मुख्य केंद्रबिंदू समजून पहिल्या प्रथमच निवडून आलेले काँग्रेस जि.प. सदस्य गिरिश पालीवाल यांनी थेट गावखेड्यात जावून तेथील लोकांना भेडसावणाऱ्या समस्या ऐकून घेऊन त्या मार्गी लावण्याचा मनोदय ग्रामस्थांसमोर बोलून दाखविला.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवनिर्मित माहुरकुडा प्रभागाचे गोंदिया जि.प. सदस्य गिरिश पालीवाल यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून खेड्याकडे चला हा ध्यास मनोमनी पत्करुन गावखेड्याचा सर्वांगिण विकासावर भर दिल्याचे त्यांनी अंगिकारलेल्या कार्यप्रणालीवरुन दिसून येत आहे. जि.प. सदस्य आपल्या दारी याला अनुसरुन जि.प. सदस्य गिरिश पालीवाल यांनी आपल्या प्रभागातील महालगाव या आदिवासी गावाला पहिल्या प्रथमच भेट देऊन तेथील गावकऱ्यांच्या व्यथा पानटपरीसमोर मनमोकळ्यापणाने ऐकून घेतल्या. एकूण ५०० लोकवस्ती असलेल्या महालगावात ८५ टक्के अनुसूचित जमातीचे तर १५ टक्के अनुसूचित जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी पक्क्या रस्त्यांची गरज आहे. पावसाच्या दिवसात गाववासीयांना तारेवरची कसरत करुन तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. जि.प. सदस्यांच्या गाव भेटीत गावकऱ्यांनी विविध समस्यांचा पाढा वाचला. त्यात महालगाववरून वडेगावला जाणारा तसेच झरपडा ते अर्जुनी-मोरगाव जाणाऱ्या मार्गाची दैनावस्था झाली आहे. ठिकठिकाणी डांबर उकळले आहे. गावात जि.प.ची पहिली ते चौर्थीपर्यंत शाळा आहे. परंतु एका वर्गखोलीची कमतरता आहे. गावात २०-२५ वर्षापासूनची जुनाट अंगणवाडीची ईमारत आहे. लहान बालकांना झाडाखाली बसून अंगणवाडी सेविका संस्काराचे डोस पाजत आहे. वयोवृद्धांना अल्पशे मिळणारे सहाय्य एक हजार मिळावे, गावातील शासकीय कर्मचाऱ्यांनी वेळेच्या आत काम करावे, अशा विविध समस्या साध्याभोळ्या ग्रामस्थांनी जि.प. सदस्य गिरिश पालीवाल यांच्यासमोर ठेवल्या. पालीवाल यांनी गावकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. महालगावच्या जागरुक जनतेने गावातील अडचणी विशद केल्या. त्या मार्गी लावण्याचा निश्चित प्रयत्न करून गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी गावकऱ्यांसमोर दिली.आपला पिंड हा समाजकार्याचा असल्याने सामान्य जनतेच्या कामासाठी कोणतीही तडजोड करणार नाही. जनतेच्या विकासात आडकाठी निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. वेळोवेळी जनतेच्या कामाला धावून येणार. गावाच्या समस्या दूर करण्याच्या कामाला अग्रक्रम देऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावकऱ्यांना मिळवून देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार, अशी ग्वाही गिरिश पालीवाल यांनी गावकऱ्यांसमोर दिली. (वार्ताहर)