शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
2
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
3
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
4
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
5
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
6
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
7
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
8
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
9
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
10
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
11
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
12
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
13
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
14
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
15
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
16
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
17
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
18
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
19
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी गणवेश नाहीच

By admin | Updated: June 25, 2014 23:48 IST

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाची योजना यंदा मात्र फसली आहे. विभागाने मागणी केलेला तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांचा निधीच न आल्याने आज शाळेच्या पहिल्या

९१ हजार ८११ विद्यार्थी राहणार वंचित : ३.२६ कोटी मिळालेच नाहीकपिल केकत - गोंदियाशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाची योजना यंदा मात्र फसली आहे. विभागाने मागणी केलेला तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांचा निधीच न आल्याने आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करता येणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ९१ हजार ८११ विद्यार्थी गणवेशापासून वंचीत राहणार आहेत. शिक्षणापासून कुणीही वंचीत राहू नये यासाठी शासनाकडून विद्यार्थी व पालकांना आकर्षीत करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षीत करण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले जात असून त्यात एक म्हणजे विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तक वाटपाचा कार्यक्रम आहे. मात्र प्रशासनाच्या लेटलतीफ कार्यप्रणालीमुळे हे कार्यक्रमचं आता फसू लागल्याची स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. यातील पाठ्यपुस्तक वितरणाचा कार्यक्रम यंदा यशस्वी ठरणार. मात्र शाळेच्या पहिल्या विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करण्याचा कार्यक्रम यंदा फसल्याचे दिसून येत आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळेत (जिल्हा परिषद व नगर परिषद) वर्ग १ ते ८ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली तसेच एससी, एसटी व बीपीएल अंतर्गत येत असलेल्या परिवारातील मुलांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत दोन जोड गणवेश दिले जातात. शालेच्या पहिल्या दिवशी या विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करण्याची तशी विशेष योजनाच शासनाकडून राबविली जात आहे. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती गणवेश तयार करून विद्यार्थ्यांना वितरीत करते. पाठ्यपुस्तक व गणवेश मिळाल्यास विद्यार्थ्यांत शाळा व शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यांचा कल शाळेकडे वाढणार असा या मागचा उद्देश आहे. जिल्ह्यात यावर्षी ९१ हजार ८११ विद्यार्थी या योजनेस पात्र ठरत आहेत. यातील ७१ हजार ३१७ विद्यार्थ्यांना गणवेशासाठी ४०० रूपये दराने गणवेश द्यावयाचे आहेत. तर २० हजार ४९४ विदयार्थी राज्य शासनाच्या १०३ विकास गट योजनेंतर्गत येत असल्याने त्यांना राज्य शासनाकडून एक जोड गणवेश दिले जातात. तर या विद्यार्थ्यांना दुसरा जोड सर्व शिक्षा अभियांनांतर्गत दिला जाणार असल्याने त्यांना गणवेशासाठी २०० रूपये लागणार आहेत.त्यानुसार, संबंधित विभागाने शासनाकडे तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांची मागणी केली होती. मात्र शासनाकडून अद्याप मागण्यात आलेला निधी देण्यात आलेला नाही. परिणामी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करायचे कसे हा प्रश्न विभागापुढे उभा आहे. त्यातही शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वाटपाची योजना यशस्वी करण्या संदर्भात आदेश देऊन टाकले आहेत. मात्र पैसे न दिल्याने मुख्याध्यापकांची फसगत झाली आहे. शाळेतील एवढ्या विद्यार्थ्यांचे गणवेश आता त्यांना आपल्याकडून पैसे फसवून बनवावे लागणार आहे. तर शिक्षकांचे मागील दोन महिन्यांपासून पगार न झाल्याने त्यांचीही स्थिती बिकट असून त्यात गणवेशाचा बोझा उचलण्यास स्पष्ट नकार दिसून येत आहे. एकंदर यावर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वाटपाची योजना फसली असून विद्यार्थी गणवेशापासून वंचीत राहणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यातही हा प्रकार लगतच्या अन्य जिल्ह्यांतही असल्याने अवघ्या राज्यातच गणवेश काही वाटले जाणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.