शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

पहिल्या दिवशी गणवेश नाहीच

By admin | Updated: June 25, 2014 23:48 IST

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाची योजना यंदा मात्र फसली आहे. विभागाने मागणी केलेला तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांचा निधीच न आल्याने आज शाळेच्या पहिल्या

९१ हजार ८११ विद्यार्थी राहणार वंचित : ३.२६ कोटी मिळालेच नाहीकपिल केकत - गोंदियाशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाची योजना यंदा मात्र फसली आहे. विभागाने मागणी केलेला तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांचा निधीच न आल्याने आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करता येणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ९१ हजार ८११ विद्यार्थी गणवेशापासून वंचीत राहणार आहेत. शिक्षणापासून कुणीही वंचीत राहू नये यासाठी शासनाकडून विद्यार्थी व पालकांना आकर्षीत करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षीत करण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले जात असून त्यात एक म्हणजे विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तक वाटपाचा कार्यक्रम आहे. मात्र प्रशासनाच्या लेटलतीफ कार्यप्रणालीमुळे हे कार्यक्रमचं आता फसू लागल्याची स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. यातील पाठ्यपुस्तक वितरणाचा कार्यक्रम यंदा यशस्वी ठरणार. मात्र शाळेच्या पहिल्या विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करण्याचा कार्यक्रम यंदा फसल्याचे दिसून येत आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळेत (जिल्हा परिषद व नगर परिषद) वर्ग १ ते ८ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली तसेच एससी, एसटी व बीपीएल अंतर्गत येत असलेल्या परिवारातील मुलांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत दोन जोड गणवेश दिले जातात. शालेच्या पहिल्या दिवशी या विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करण्याची तशी विशेष योजनाच शासनाकडून राबविली जात आहे. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती गणवेश तयार करून विद्यार्थ्यांना वितरीत करते. पाठ्यपुस्तक व गणवेश मिळाल्यास विद्यार्थ्यांत शाळा व शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यांचा कल शाळेकडे वाढणार असा या मागचा उद्देश आहे. जिल्ह्यात यावर्षी ९१ हजार ८११ विद्यार्थी या योजनेस पात्र ठरत आहेत. यातील ७१ हजार ३१७ विद्यार्थ्यांना गणवेशासाठी ४०० रूपये दराने गणवेश द्यावयाचे आहेत. तर २० हजार ४९४ विदयार्थी राज्य शासनाच्या १०३ विकास गट योजनेंतर्गत येत असल्याने त्यांना राज्य शासनाकडून एक जोड गणवेश दिले जातात. तर या विद्यार्थ्यांना दुसरा जोड सर्व शिक्षा अभियांनांतर्गत दिला जाणार असल्याने त्यांना गणवेशासाठी २०० रूपये लागणार आहेत.त्यानुसार, संबंधित विभागाने शासनाकडे तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांची मागणी केली होती. मात्र शासनाकडून अद्याप मागण्यात आलेला निधी देण्यात आलेला नाही. परिणामी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करायचे कसे हा प्रश्न विभागापुढे उभा आहे. त्यातही शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वाटपाची योजना यशस्वी करण्या संदर्भात आदेश देऊन टाकले आहेत. मात्र पैसे न दिल्याने मुख्याध्यापकांची फसगत झाली आहे. शाळेतील एवढ्या विद्यार्थ्यांचे गणवेश आता त्यांना आपल्याकडून पैसे फसवून बनवावे लागणार आहे. तर शिक्षकांचे मागील दोन महिन्यांपासून पगार न झाल्याने त्यांचीही स्थिती बिकट असून त्यात गणवेशाचा बोझा उचलण्यास स्पष्ट नकार दिसून येत आहे. एकंदर यावर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वाटपाची योजना फसली असून विद्यार्थी गणवेशापासून वंचीत राहणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यातही हा प्रकार लगतच्या अन्य जिल्ह्यांतही असल्याने अवघ्या राज्यातच गणवेश काही वाटले जाणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.