शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

पहिल्याच दिवशी ठोकले शाळेला कुलूप

By admin | Updated: June 26, 2014 23:20 IST

तज्ञ शिक्षकांची कमतरता त्यातच विद्यालयात एकूण १३ शिक्षकांच्या रिक्त पदाला घेऊन शिक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी गुरूवारी (दि.२६) शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकले.

गोरेगावात एल्गार : शिक्षणाचा खेळ खंडोबा, अरुणनगर येथेही विद्यार्थी पोहोचले नाहीगोरेगाव : तज्ञ शिक्षकांची कमतरता त्यातच विद्यालयात एकूण १३ शिक्षकांच्या रिक्त पदाला घेऊन शिक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी गुरूवारी (दि.२६) शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकले. यावेळी शिक्षण समिती व जि.प. सदस्य बबिता टेंभुर्णेकर, पं.स. सभापती चित्रकला चौधरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदलाल सोनवाने, माजी जि.प. सदस्य जगदीश येरोला, सरपंच विश्वजीत डोंगरे, व्यवस्थापन समिती सदस्य भरतलाल चव्हाण, सेवकराम नेवारे, आर.जे. अगडे, सुरेश चन्ने, उपसरपंच सलीम पठाण, तिलकचंद मडावी, घनश्याम वाघमारे, देवानंद सोनवाने, रेखा लांजेवार आदी उपस्थित होते.येथील शहीद जाम्मा-तिम्या जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात मागील एक वर्षापासून प्राचार्य एक पद, पर्यवेक्षक एक पद, विज्ञान शाखा शिक्षक तीन पद, कला शिक्षक दोन पद, हायस्कुल विभाग शिक्षक दोन पद, पदविधर शिक्षक दोन पद, इतर शिक्षक दोन पद अशी एकूण १३ पदे रिक्त आहेत. शिक्षण समिती व शाळा व्यवस्यथापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रिक्त पदे भरण्यासाठी वारंवार शिक्षण विभागाला मागणी केली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी २७ मे रोजी बैठक घेऊन शाळेला कुलूप ठोकण्याचा ठराव घेतला. दरम्यान तसे निवेदन राज्याचे शिक्षणमंत्री, क्षेत्राचे आमदार, जि.प. अध्यक्ष, जि.प. शिक्षण सभापती, जि.प. शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी पं.स. गोरेगाव, गटशिक्षणाधिकारी, ठाणेदार गोरेगाव यांना ११ जूनला देण्यात आल होते. मात्र अद्याप यावर कसलीच कारवाई करण्यात आली नाही. यावरून गावकरी व पालकात असंतोष निर्माण झाला होता. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी शासन व जिल्हा परिषद स्तरावर नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात. त्यातच सदर शाळा व महाविद्यालय म्हणून तालुक्यातील एकमेव शाळा आहे. मात्र याच शाळेत शिक्षकांच्या कमतरतेने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होऊन त्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात दिसत आहे. यामुळे पालकांत रोष व्याप्त होता. यामुळेच शाळेच्या पहिल्या दिवशीच सकाळी ९ वाजता शिक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले. (तालुका प्रतिनिधी)-