शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

मनाला आनंद देणारे फटाके देतात गंभीर आजार

By admin | Updated: October 22, 2014 23:20 IST

दिवाळी हा आनंद आणि उत्साहाला उधान आणणाला सण. दिवाळी आणि फटाके हे समीकरण इतके घट्ट जुळलेले आहे की फटाक्याशिवाय दिवाळी ही कल्पनाच करता येत नाही. परंतु मनाला आनंद

गोंदिया : दिवाळी हा आनंद आणि उत्साहाला उधान आणणाला सण. दिवाळी आणि फटाके हे समीकरण इतके घट्ट जुळलेले आहे की फटाक्याशिवाय दिवाळी ही कल्पनाच करता येत नाही. परंतु मनाला आनंद देणारे हेच फटाके एखाद्याच्या जीवनात कायमचे नैराश्य आणू शकते. त्यामुळे क्षणिक आनंद देणाऱ्या या फटाक्यांपासून सावध राहणे गरजेचे असल्याचा सल्ला वैद्यकीय व्यवसायातील तज्ज्ञ देत आहेत.फटाक्यांचा शोध साधारणत: २ हजार वर्षापूर्वी चीनमध्ये लागला. आता तर आॅस्ट्रेलिया व अमेरीकेत विशिष्ट उत्सवाच्या वेळी मोठमोठे फटाका-शो संगणकाद्वारे संचालित केले जातात. फटाके फुटल्यावर त्यातून निघणारा रासायनिक पदार्थ मानवाच्या जीवनावर विपरीत परिणाम करणारा आहे. फटाक्यामधून धूर, सल्फर डॉयआॅक्साईड व नाईट्रोजन आॅक्साईड तसेच कार्बन मोनाआॅक्साईड, शिसे आणि तांबे बोहर पडते. धुरामध्ये बारीक रासायनिक व अरासायनिक पदार्थाचे कण असतात. ते सूक्ष्म कण लेसदैन २.५ मायक्रो मीटरपेक्षाही कमी असल्याने श्वासद्वारे घश्यात व फुफुसात जातात. ते शरीरात गेल्यावर फॅरीन्जायटीस, लॅरीन्जायटीस, सायनुसायटीस, ब्रॉकायटीस व न्युमोनियासारखे गंभीर आजार जडतात. त्यात जीवनाला मोठा धोका असतो. कधी- कधी या फटक्यामुळे रूग्णांची छाती आवळल्यासारखी होते. लोकांना गुदमरल्यासारखेही वाटते. ज्यांना अस्थमा आहे त्यांना त्रास उमळून येतो. कधी- कधी ते गंभीरही होतात. हृदयरूग्णांना झटका येवू शकतो. रक्तदाब वाढू शकतो, डोळ्यांनाही एलर्जी होवू शकते, या फटाक्यातून सल्फर डायआॅक्साईड गॅस निघतो. त्यातील सल्फ्युरीक अ‍ॅसीड हे आम्ल असल्याने त्याला पाण्याचे विशेष आकर्षण आहे. हे अ‍ॅसीड पावसाच्या पाण्यासोबत धरतीवर पडते, त्याला अ‍ॅसीडचा पाउस असे म्हटले जाते. या अ‍ॅसीडच्या पावसामुळे पृथ्वीवरील प्राणीमात्रा, जीव जंतु व विविध वनस्पती नष्ठ होतात. कार्बन मोनॉॅक्साईड हे श्वासाद्वारे फुफुसात जाते, रक्तात मिसळते व रूग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. यातच रूग्ण अतिगंभीर होतो. या फटक्यामधून निघणारे शिसे श्वासद्वारे रक्तात जातात त्यामुळे व्यक्तीच्या मेंदुवर सुज येते. मज्जातंतुची वाढ खुंटते, ६ वर्षाखालील मुले या फटाक्यामुळे विक्षीतपणे वागतात. गर्भवती महिलेच्या रक्तात हे शिसे गेले तर ते प्लॉसन्टामधून बाळाच्या मेंदूत जाते व बाळाच्या मेंदूची वाढ खुंटते. या असे डॉ.शशांक डाये यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी या संदर्भात घडणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती दिली. फटाक्यामुळे डोळयाला इजा होणे, अंधत्व येते. त्यामुळे शक्यतोवर फटाके फोडु नये असे सांगत फटाक्यांनी एखाद्या भाजला तर त्यांनी तो भाग बर्फाच्या पाण्यात १० ते १५ मिनिटे ठेवावा. डोळ्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवावी व लगेच डॉक्टरकडे जावे, शक्यतोवर फटाके फोडू नये, फुलझड्या किंवा टिकल्या वापराव्यात असा सल्ला तज्ज्ञ देतात. (तालुका प्रतिनिधी)