शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला रोखण्यासाठी एकजुटीने लढा

By admin | Updated: January 17, 2015 22:59 IST

काही चुकांमुळे आम्हाला केंद्र व राज्यातही सत्ता गमवावी लागली. भाजपने सर्वांना भूलथापा देत सत्ता मिळविली. पण कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये. भाजप सरकारने जनतेला दिलेली

माणिकराव ठाकरे : आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नेते-कार्यकर्त्यांना सल्लागोंदिया : काही चुकांमुळे आम्हाला केंद्र व राज्यातही सत्ता गमवावी लागली. भाजपने सर्वांना भूलथापा देत सत्ता मिळविली. पण कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये. भाजप सरकारने जनतेला दिलेली आश्वासने हवेत विरत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ही बाब जनतेपर्यंत पोहोचवून आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक एकजुटीने लढवावी आणि जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आणावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले.येथील अग्रसेन भवनात सायंकाळी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, आ.गोपालदास अग्रवाल, माजी आ.रामरतन राऊत, सेवक वाघाये, डॉ.नामदेव उसेंडी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, डॉ.योगेंद्र भगत, डॉ.नामदेव किरसान, अशोक लंजे, झामसिंग बघेले, पी.जी.कटरे, पन्नालाल सहारे, उषा मेंढे, नवटवलाल गांधी, रजनी नागपुरे, छाया चव्हाण, प्रफुल्ल अग्रवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर चांगलेच प्रहार केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान मोदींच्या हातचे बाहुले असल्याचे सांगून राज्याची राजधानी मुंबईवर मोदींचा डोळा आहे. केवळ व्यापाऱ्यांचे हित जोपासणाऱ्या मोदी सरकारला शेतकऱ्यांचे दु:ख कळत नाही. आजही दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना हे सरकार काय करीत आहे? असा सवाल त्यांनी केला. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा पुळका आलेले सरकार आता गप्प का? असेही ठाकरे म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी) साडेतीन तास उशिरा सुरूवातकाँग्रेस कार्यकर्त्यांचा हा मेळावा तब्बल साडेतीन तास उशिराने सुरू झाला. नियोजित कार्यक्रमानुसार हा मेळावा दुपारी १ वाजता सुरू होणार होता. मात्र ४ वाजून ४० मिनिटांनी प्रदेशाध्यक्षांचे सभास्थळी आगमन झाले. या मेळाव्यासाठी जिल्हाभरातून कार्यकर्ते व पदाधिकारी आले होते. मात्र प्रदेशाध्यक्षांची वाट पाहता पाहता कंटाळून अनेक कार्यकर्ते आल्या पावली परत निघून गेले. सत्ता गेली तरी मिजास कायम आहे का? असा प्रश्न करीत कार्यकर्त्यांची कुजबूज सुरू होती.वेळ बराच झाल्याने माजी मंत्री नितीन राऊत यांना भाषण आवरते घेण्याची सूचना करण्यात आली. मात्र प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांचे भाषण सुरू झाले त्यावेळी ट्रेनने येणाऱ्यांची वेळ झाल्याने त्यांना भाषण सोडून उठावे लागले.सभेतील गर्दी कमी होत असल्याचे पाहून कार्यालयाचे ग्रीन बंद करून बाहेर जाणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी ओरडण्याचा आवाज वरच्या हॉलपर्यंत येत असल्यामुळे ग्रील उघडण्यात आले.इतर वर्क्त्यांनी हिंदीतून भाषण दिले असले तरी माणिकराव ठाकरे यांनी मराठीतून भाषण दिले. सुरूवातीला त्यांनी ‘मराठीतून बोलू की हिंदीतून’ असे विचारले. तेव्हा मराठीतून म्हणणाऱ्यांची संख्या जास्त होती. जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कोणासोबत आघाडी करायची हे स्थानिक स्तरावरच ठरवा पण एकजुटीने लढण्यात फायदा असल्याचा सल्ला माणिकराव ठाकरे यांनी दिला.या मेळाव्याला महिलांची संख्या खूपच नगण्य होती. तसेच शहरी कार्यकर्त्यांची संख्याही कमी दिसत होती. मंचावर स्थान मिळविण्यासाठी मात्र जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. ज्यांना कोणताही जनाधार नाही असेही काही चेहरे नेहमीप्रमाणे मंचावर होते.