शहरं
Join us  
Trending Stories
1
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
2
फेरारी नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
3
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
4
कोण आहेत आशीष पांडे आणि कल्याण कुमार? मोदी सरकारनं 'या' पदावर केली नियुक्ती
5
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
6
मूर्ती लहान पण कीर्ती महान! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी शतक
7
Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
8
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
9
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
10
AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
12
"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
13
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
14
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
15
Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
16
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
17
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
18
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
19
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
20
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं

शेतकऱ्यांना मदत न करणाऱ्या बँकांवर खटले भरणार

By admin | Updated: August 3, 2014 00:09 IST

गेल्या तीन वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ, गारपीट, पूर अशा अस्मानी संकटांना सामोरे जावे लागले. या संकटांचा सामना करीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना साडेतेरा हजार कोटींची

उपमुख्यमंत्री पवार : निर्धार मेळाव्यातून राकाँं कार्यकर्त्यांना केले जागृतगोंदिया : गेल्या तीन वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ, गारपीट, पूर अशा अस्मानी संकटांना सामोरे जावे लागले. या संकटांचा सामना करीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना साडेतेरा हजार कोटींची नुकसानभरपाई दिली. शेतकऱ्यांवर थकीत असलेले ७१ कोटींचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी जी बँक सहकार्य करणार नाही त्या बँकेवर खटला दाखल करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.गोंदियाच्या पोवार बोर्र्डींग येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार मेळाव्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. मेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री खा.प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख, आ. राजेंद्र जैन, माजी आ.दिलीप बन्सोड, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्षमी तुरकर, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती टिकाराम मेंढे, बबलू कटरे व पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रात जेवढी कामे झाली तेवढी कामे महाराष्ट्रातील क्वचितच एखाद्या लोकसभा क्षेत्रात झाली असतील. महाराष्ट्रातील सर्वात मोठा ३० हजार कोटींचा पॉवर प्लांट गोंदियाच्या तिरोडा येथे अदानी आणण्यात आला. महाराष्ट्रातील सात मेडीकल कॉलेजपैकी दोन मेडीकल कॉलेज विदर्भाला दिले असून त्यात गोंदियाचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचनावर भर विदर्भावर देण्यात आला. गोसेखुर्दला तीन पॅकेल दिले. बावनथडीचा प्रकल्प प्रलंबित होता. मात्र तो प्रश्न प्रफुल्ल पटेलांनी मार्गी लावला. धापेवाडा सिंचन प्रकल्प आमच्या काळातच मंजूर करून पाच वर्षात पूर्ण करण्यात आला. धापेवाडाचे पाणी अदानी प्रकल्पाला देण्यापूर्र्वी ते पाणी आधी पिण्यासाठी, नंतर शेतकऱ्यांना शेतीसाठी व उरलेले पाणी उद्योगासाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला. सध्या केंद्रात असलेल्या सरकारने ‘अच्छे दिन आयेंगे’ असे स्वप्न दाखवून केंद्रात सत्ता स्थापन केली. परंतु अच्छे दिन कुणाचे याचा अंदाज लोकांना लागला असल्याचा टोला त्यांनी लावला.यावेळी खा.प्रफुल्ल पटेल म्हणाले, आपण विकासाची कामे केली परंतु लोकसभेच्या निवडणुकीत जनतेचा आपल्यावरील विश्वास कमी पडला. याचे चिंतन करून विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागू, असे ते म्हणाले. त्यांंनी आता होणाऱ्या रेल्वे भाडेवाढ व इतर वस्तूंच्या वाढणाऱ्या किमतीकडे लक्ष वेधले. केंद्राने धानाच्या हमीभावात केवळ ५० रुपये वाढ केली. शेतकऱ्यांना मिळणारा बोनस बंद करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केवळ निवेदने देऊन थांबू नये, तर रस्त्यावर उतरण्याची सवय लावली पाहीजे, असे आवाहन खा.पटेल यांनी केले.यावेळी राकाँचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री अनिल देशमुख केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर आपल्या भाषणांमधून टिका केली. या मेळाव्याला १० हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. संचालन गंगाधर परशुरामकर यांनी तर आभार शिव शर्मा यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)