शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

सिंचन योजनेमुळे शेतकरी त्रस्त

By admin | Updated: June 15, 2014 23:37 IST

गोंदिया तालुका अंतर्गत येणाऱ्या रावणवाडी परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेत जमिनीला सिंचनाची व्यवस्था होऊन या भागात हरितक्रांती येणार असे दिवास्वप्न येथील पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांना दाखविले होते.

रावणवाडी : गोंदिया तालुका अंतर्गत येणाऱ्या रावणवाडी परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेत जमिनीला सिंचनाची व्यवस्था होऊन या भागात हरितक्रांती येणार असे दिवास्वप्न येथील पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांना दाखविले होते. परंतु शेतकऱ्यानच्या आशेवर पाणी फेरल्या गेले.रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेचा कलवा तयार करताना मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. मात्र यातून निघणाऱ्या माती मलबा दगड नजीकच्या शेतात अस्ताव्यस्त स्थितीत पसरविण्यात आले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे शेतकरी वर्ग शासन यंत्रणेबद्दल असंतोष व्यक्त करीत आहे. काही अल्प काळातच पावसाळ्याला सुरूवात होणार असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. पाटबंधारे विभागाने खोदकाम करून त्यातून निघणारी माती, मलबा, दगड हटवून शेतकऱ्याच्या शेत जमिनी मोकळ्या करून देण्याची जाग अद्याप का आली नाही, असा प्रश्न पीडित शेतकऱ्याकडून उपस्थित करण्यात येत आहे. कालव्याचे खोदकाम करताना मक्तेदारांनी खोदकामातून निघणारा मलबा त्याचवेळी इतरत्र हलविणे गरजेचे होते. तसे दिशानिर्देश संबंधित पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अंमलदारानी खोदकाम करते वेळीच निगा राखून सुपीक शेतजमिनी मोकळ्या करून देणे गरजेचे होते. मात्र संबंधित विभागाने शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी आणण्याचे यंत्र न बनवता या योजनेला मलई खाण्याचे यंत्र बनविण्यात आले, असा पीडित शेतकऱ्यांचा आरोप आहे. या गाव परिसरात कोणत्याही दिशेला जमिनीचे बाजारभाव गगनाला भिडले असल्याने सामान्य शेतकरी कधी स्वप्नातही शेतजमिनी खरेदी करण्याचे विचार करीत नाही. आजच्या काळात या गावाच्या परिसरात शेतजमिनीचे बाजारभाव १५ ते २० लाख रुपये प्रति एकरावर असून खरेदी करणे गरजंूना भाग पडत असले तरी पाटबंधारे विभागाने येथील शेतकऱ्याच्या शेतजमिनीच्या किमती कवडीमोल ठरवून काही शेतकऱ्यांना मोबदला दिला. तुटपुंजे पैसे काही शेतकऱ्यांना दिले तर बऱ्याच शेतकऱ्यांना आजपर्यंत मोबदला देण्यात आलेला नाही. पीडित शेतकऱ्यांनी जी रक्कम मिळत आहे ती रक्कम मुकाट्याने घेतली. पाटबंधारे विभागाच्या मार्फत शेतकऱ्याच्या शेतजमिनीत माती मलबा असल्यामुळे शेतकऱ्याचा जमिनी नापीक आल्या म्हणून पाटबंधारे विभागाने ठरावीक कालावधीचा शेत भाडा दिला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात विभागाने स्वहित साधून आपल्या मर्जीतील शेतकऱ्यांना किराया भाडे देण्यात आले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात घोडचूक करूनच निधी वितरित करण्यात आली. त्यात बऱ्याच शेतकऱ्यांना विभागाने जाणीवपूर्वक किराया भाड्यापासून वंचित केले आहे. खोदकामापूर्वी शेतकऱ्याचा बांधावर बऱ्याच जातीचे मौल्यवान वृक्षांची संख्या होती त्या वृक्षांना यंत्राच्या साहाय्याने क्षणार्थ धरतीवर लोटवून तोडण्यात आले. मात्र त्या वृक्षाचा मोबदला अजून शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. ज्या जमिनीत एकही वृक्ष नव्हते त्याठिकाणी वृक्षांची संख्या दर्शावून मर्जीतील लोकांना मोबदला देण्यात आला. पाटबंधारे विभागाने या शेतकऱ्यांना भूमिहीन करण्यात कसलीच कसर सोडली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)