शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

सिंचनासाठी शेतकऱ्यांचे इटियाडोह धरणावर साखळी उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST

इटियाडोह धरण गोंदिया जिल्ह्यासाठी वरदान आहे. हे धरण अर्जुनी मोरगाव तालुक्यात गोठणगाव येथे बांधण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती धरणामध्ये गेली. ज्यांची शेती धरणात गेली त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. ते सुद्धा सिंचनापासून वंचित होणार आहेत. मागील काही वर्षांपासून धरणाच्या सिंचनाला घेऊन रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या रोटेशन पद्धतीमुळे तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहण्याची भीती आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : रब्बी हंगामाच्या धान पिकासाठी इटियाडोह धरणाचे पाणी देण्यात यावे, या मागणीला घेऊन धरण परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी धरणाच्या गेटसमोर शुक्रवारपासून (दि.३१) तीन दिवसीय साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.इटियाडोह धरण गोंदिया जिल्ह्यासाठी वरदान आहे. हे धरण अर्जुनी मोरगाव तालुक्यात गोठणगाव येथे बांधण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती धरणामध्ये गेली. ज्यांची शेती धरणात गेली त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. ते सुद्धा सिंचनापासून वंचित होणार आहेत. मागील काही वर्षांपासून धरणाच्या सिंचनाला घेऊन रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या रोटेशन पद्धतीमुळे तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहण्याची भीती आहे. रोटेशन पद्धत हा पाणी वापर संस्थांचा एकप्रकारचा जावईशोधच आहे. यावर्षी रब्बी हंगामाला तालुका सोडून गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीपर्यंत पाणी देण्यात येणार, असे पाणीवाटप संस्थांनी ठरविले. यामुळे धरण परिसरातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहणार आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांत असंतोष आहे. धरण परिसरातील शेतकऱ्यांचा धरणाच्या पाण्यावर प्रथम अधिकार आहे. रब्बी हंगामाला धरणाचे पाणी द्या या मागणीसाठी परिसरातील शेकडो शेतकरी धरणाच्या गेटसमोर शुक्रवारपासून साखळी उपोषणाला बसले आहेत. हे साखळी उपोषण तीन दिवस चालणार आहे. शेतकऱ्यांची मागणी मान्य न झाल्यास या उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होईल, अशी माहिती उपोषणकर्त्यांनी दिली आहे. प्रशासनाने या प्रश्नावर त्वरित मार्ग काढावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी रतिराम राणे, यशवंत परशुरामकर, यशवंत गणवीर, दीनदयाल डोंगरवार, संजय ईश्वार, राजहंस ढोके, नारायण हटवार, विनोद किरसान, राधेश्याम साखरे, राजकुमार तुलावी, जागेश्वर भोगारे, धनराज हर्षे, गुलाब भोयर, आनंदराव तिरगम, भिवा मलगाम, मधू गहाणे, योगराज हलमारे, त्र्यंबक झोळे, प्रमोद डोंगरवार, मनोहर बडवाईक, हेमंत देशमुख, संजू देशमुख, शिगू कोवे, हेमराज नाईक, प्रभू नंदनवार, शिवलाल वाघमारे, मोहन दानी, भाष्कर दखने, सोमा नरवास, रूपलाल गहाणे, प्रेमलाल करंडे, दीपक राणे, विनोद किरसान, तुलसीदास कोडापे, यशवंत भोयर, निलकंठ हटवार, विष्णू सिकदार, दीपक चक्रवर्ती आणि शेतकरी उपस्थित होते.

 

टॅग्स :Itiadoh Projectइटियाडोह प्रकल्पagitationआंदोलन