शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सिंचनासाठी शेतकऱ्यांचे इटियाडोह धरणावर साखळी उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST

इटियाडोह धरण गोंदिया जिल्ह्यासाठी वरदान आहे. हे धरण अर्जुनी मोरगाव तालुक्यात गोठणगाव येथे बांधण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती धरणामध्ये गेली. ज्यांची शेती धरणात गेली त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. ते सुद्धा सिंचनापासून वंचित होणार आहेत. मागील काही वर्षांपासून धरणाच्या सिंचनाला घेऊन रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या रोटेशन पद्धतीमुळे तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहण्याची भीती आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : रब्बी हंगामाच्या धान पिकासाठी इटियाडोह धरणाचे पाणी देण्यात यावे, या मागणीला घेऊन धरण परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी धरणाच्या गेटसमोर शुक्रवारपासून (दि.३१) तीन दिवसीय साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.इटियाडोह धरण गोंदिया जिल्ह्यासाठी वरदान आहे. हे धरण अर्जुनी मोरगाव तालुक्यात गोठणगाव येथे बांधण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती धरणामध्ये गेली. ज्यांची शेती धरणात गेली त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. ते सुद्धा सिंचनापासून वंचित होणार आहेत. मागील काही वर्षांपासून धरणाच्या सिंचनाला घेऊन रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या रोटेशन पद्धतीमुळे तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहण्याची भीती आहे. रोटेशन पद्धत हा पाणी वापर संस्थांचा एकप्रकारचा जावईशोधच आहे. यावर्षी रब्बी हंगामाला तालुका सोडून गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीपर्यंत पाणी देण्यात येणार, असे पाणीवाटप संस्थांनी ठरविले. यामुळे धरण परिसरातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहणार आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांत असंतोष आहे. धरण परिसरातील शेतकऱ्यांचा धरणाच्या पाण्यावर प्रथम अधिकार आहे. रब्बी हंगामाला धरणाचे पाणी द्या या मागणीसाठी परिसरातील शेकडो शेतकरी धरणाच्या गेटसमोर शुक्रवारपासून साखळी उपोषणाला बसले आहेत. हे साखळी उपोषण तीन दिवस चालणार आहे. शेतकऱ्यांची मागणी मान्य न झाल्यास या उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होईल, अशी माहिती उपोषणकर्त्यांनी दिली आहे. प्रशासनाने या प्रश्नावर त्वरित मार्ग काढावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी रतिराम राणे, यशवंत परशुरामकर, यशवंत गणवीर, दीनदयाल डोंगरवार, संजय ईश्वार, राजहंस ढोके, नारायण हटवार, विनोद किरसान, राधेश्याम साखरे, राजकुमार तुलावी, जागेश्वर भोगारे, धनराज हर्षे, गुलाब भोयर, आनंदराव तिरगम, भिवा मलगाम, मधू गहाणे, योगराज हलमारे, त्र्यंबक झोळे, प्रमोद डोंगरवार, मनोहर बडवाईक, हेमंत देशमुख, संजू देशमुख, शिगू कोवे, हेमराज नाईक, प्रभू नंदनवार, शिवलाल वाघमारे, मोहन दानी, भाष्कर दखने, सोमा नरवास, रूपलाल गहाणे, प्रेमलाल करंडे, दीपक राणे, विनोद किरसान, तुलसीदास कोडापे, यशवंत भोयर, निलकंठ हटवार, विष्णू सिकदार, दीपक चक्रवर्ती आणि शेतकरी उपस्थित होते.

 

टॅग्स :Itiadoh Projectइटियाडोह प्रकल्पagitationआंदोलन