शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कसायाला गाय न विकण्याची शेतकऱ्यांनी शपथ घ्यावी

By admin | Updated: February 8, 2016 01:55 IST

कृषिप्रधान भारत देशात गाईला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. मात्र दुसरीकडे गार्इंची कत्तल करून मांस विकणे जोमाने सुरू आहे.

जवरीच्या तंमुसचे आवाहन: शासनाने गोहत्येवर बंदी घालावीगोंदिया : कृषिप्रधान भारत देशात गाईला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. मात्र दुसरीकडे गार्इंची कत्तल करून मांस विकणे जोमाने सुरू आहे. या व्यवसायाकडे मात्र पोलीस विभाग डोळेझाक करून व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देत असल्याचा नागरिकांचा समज आहे. त्यामुळे गोहत्या होऊ देणार नाही. कसायाला गाय विकणार नाही, अशी शपथ प्रत्येक शेतकऱ्याने घ्यावी, असा निर्धार जवरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व सरपंच ईश्वरदास पाथोडे यांनी केला आहे.जिल्ह्यातील प्रत्येक धान उत्पादक शेतकऱ्याकडे गाई-म्हशी, शेळ्या ही जनावरे आहेत. जिल्ह्यात बहुतांश आदिवासी जमातीतील लोकांकडेही गाई आहेत. ज्या गार्इंची म्हातारपणाकडे वाटचाल होते, त्यांना पैशाच्या मोहापायी अनेक शेतकरी कमी किमतीत कसायांना विकत आहेत. म्हातारी गाय मेली तर पैसेही मिळणार नाही. मग कमी किमतीत का होईना, हे गृहीत धरून त्या गाईला कसायाच्या हातात टाकतात. कसाई गार्इंना सरळ कत्तलखान्याकडे पाठवून मालामाल होत आहेत. गोहत्या करण्यावर शासनाची बंदी असली, तरीही याची अंमलबजावणी गृह विभागांतर्गत चालणाऱ्या पोलीस विभागाकडून होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.गोहत्या बंदीसाठी सर्व शेतकऱ्यांना जागरूक व्हावे अशी प्रखर भावना जवरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. गोपालकांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आठही तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात गार्इंना कत्तलखान्यात विक्री करण्यात येते. मात्र, पोलीस क्वचितच या जनावरांना वाहून नेणारे ट्रक जप्त करतानाचे चित्र दिसून येते. या सर्व प्रकरणात बजरंग दलाचे कार्यकर्ते किंवा पोलीस एकमेकांवर नेहमीच आरोप-प्रत्यारोप करतात. मात्र, गोपालकाने आपली गाय पैशाच्या हव्यासापोटी कसायाला विकलीच नाही, तर ती गाय कत्तलखान्यात जाणारच नाही यासाठी जवरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने गोहत्या बंद करावी, ही मागणी करीत कोणत्याही शेतकऱ्याने आपली गाय कसायाला विकू नये, असे आवाहन केले आहे.(तालुका प्रतिनिधी)