शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
4
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
5
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
6
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
7
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
8
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
9
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
10
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
11
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
12
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
13
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
14
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
15
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
16
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
17
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
18
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
19
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
20
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत

कसायाला गाय न विकण्याची शेतकऱ्यांनी शपथ घ्यावी

By admin | Updated: February 8, 2016 01:55 IST

कृषिप्रधान भारत देशात गाईला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. मात्र दुसरीकडे गार्इंची कत्तल करून मांस विकणे जोमाने सुरू आहे.

जवरीच्या तंमुसचे आवाहन: शासनाने गोहत्येवर बंदी घालावीगोंदिया : कृषिप्रधान भारत देशात गाईला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. मात्र दुसरीकडे गार्इंची कत्तल करून मांस विकणे जोमाने सुरू आहे. या व्यवसायाकडे मात्र पोलीस विभाग डोळेझाक करून व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देत असल्याचा नागरिकांचा समज आहे. त्यामुळे गोहत्या होऊ देणार नाही. कसायाला गाय विकणार नाही, अशी शपथ प्रत्येक शेतकऱ्याने घ्यावी, असा निर्धार जवरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व सरपंच ईश्वरदास पाथोडे यांनी केला आहे.जिल्ह्यातील प्रत्येक धान उत्पादक शेतकऱ्याकडे गाई-म्हशी, शेळ्या ही जनावरे आहेत. जिल्ह्यात बहुतांश आदिवासी जमातीतील लोकांकडेही गाई आहेत. ज्या गार्इंची म्हातारपणाकडे वाटचाल होते, त्यांना पैशाच्या मोहापायी अनेक शेतकरी कमी किमतीत कसायांना विकत आहेत. म्हातारी गाय मेली तर पैसेही मिळणार नाही. मग कमी किमतीत का होईना, हे गृहीत धरून त्या गाईला कसायाच्या हातात टाकतात. कसाई गार्इंना सरळ कत्तलखान्याकडे पाठवून मालामाल होत आहेत. गोहत्या करण्यावर शासनाची बंदी असली, तरीही याची अंमलबजावणी गृह विभागांतर्गत चालणाऱ्या पोलीस विभागाकडून होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.गोहत्या बंदीसाठी सर्व शेतकऱ्यांना जागरूक व्हावे अशी प्रखर भावना जवरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. गोपालकांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आठही तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात गार्इंना कत्तलखान्यात विक्री करण्यात येते. मात्र, पोलीस क्वचितच या जनावरांना वाहून नेणारे ट्रक जप्त करतानाचे चित्र दिसून येते. या सर्व प्रकरणात बजरंग दलाचे कार्यकर्ते किंवा पोलीस एकमेकांवर नेहमीच आरोप-प्रत्यारोप करतात. मात्र, गोपालकाने आपली गाय पैशाच्या हव्यासापोटी कसायाला विकलीच नाही, तर ती गाय कत्तलखान्यात जाणारच नाही यासाठी जवरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने गोहत्या बंद करावी, ही मागणी करीत कोणत्याही शेतकऱ्याने आपली गाय कसायाला विकू नये, असे आवाहन केले आहे.(तालुका प्रतिनिधी)