शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

बाजार समितीतही शेतकऱ्यांची पिळवणूक

By admin | Updated: November 2, 2014 22:36 IST

शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी हाती आलेले हलके धान मोठ्या आशेने कृषी उत्पन्न बाजार समितीत विकत आहेत. मात्र बाजार समितीत शेतकऱ्यांच्या या धानाला

हलक्या धानाची आवक जोमात : आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदीकपिल केकत - गोंदियाशासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी हाती आलेले हलके धान मोठ्या आशेने कृषी उत्पन्न बाजार समितीत विकत आहेत. मात्र बाजार समितीत शेतकऱ्यांच्या या धानाला आधारभूत किंमती पेक्षा कमी दर दिले जात आहे. १३६० रूपये आधारभूत किंमत असलेले हलके धान बाजार समितीत सर्वाधीक १२२५ रूपये दराने खरेदी केले जात आहे. यातून मात्र बाजार समितीतही शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. गोंदिया जिल्ह्याला धानाचा कटोरा म्हणून ख्याती प्राप्त आहे. जिल्ह्यात धानाचेच सर्वाधीक पिक घेतले जाते. मात्र यातही हलक्या धानाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात होते. हलके धान म्हणायचे झाल्यास त्यात आयआर व १०१० या प्रतीच्या धानाचा समावेश होतो. खरिपातही शेतकऱ्यांनी हलक्या प्रतीचे धान पिक जास्त घेतले असून बहुतांश शेतकऱ्यांचे धान हाती आले आहे. सध्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी दिवाळीत पैसे हाती असावे या उद्देशातून मोठ्या आशेने आपले हलके धान बाजार समितीत विकले. येथे बाजार समितीबाबत जाणून घेतले असता, येथील बाजार समितीत १५३ गावे येतात. बाजार समितीचे नवीन वर्ष १ आॅक्टोबर पासून सुरू होते व तेव्हापासूनच धान खरेदीही सुरू झाली आहे. बाजार समितीतून मिळालेल्या माहितीनुसार, २१ आॅक्टोबर पर्यंत बाजार समितीत चार हजार ८९३ क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. यात दोन हजार ८१८ क्विंटल हलके धान आहे. तर दिवाळी नंतर ३० व ३१ आॅक्टोबर या दोन दिवसांची खरेदी वेगळीच आहे. बाजार समितीत सध्या हलक्या धानाची आवक जास्त प्रमाणात असून यात आयआर व १०१० या धानांचे प्रमाण जास्त आहे. शासनाने सर्वसाधारण धानाला सन २०१४-१५ या वर्षात एक हजार ३६० रूपये आधारभूत किंमत जाहीर केल्याचे खूद्द बाजार समितीकडून सांगीतले जात आहे. मात्र याच बाजार समितीत हलक्या धानात मोडणाऱ्या आयआर या धानाला आतापर्यंत एक हजार १५० ते एक हजार २२५ रूपये तर १०१० या धानाला एक हजार १४० तर एक हजार २२० रूपये प्रती क्विंटल भाव दिला जात असल्याचेही बाजार समितीतूनच कळले. म्हणजेच शेतकऱ्याला आयआर या धानाच्या विक्रीत प्रती क्विंटल १३५ तर १०१० च्या विक्रीत प्रती क्विंटल १४० रूपये कमी दिले जात आहे. यात धानाची गुणवत्ता बघून भाव दिले जाते हे जरी खरे असले तरिही बाजार समितीत आलेला पूर्ण धान अत्यंत खालच्या दर्जाचा असेल हे ही शक्य नाही. एकंदर बाजार समितीतही शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.