शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो तुर्तास धान कापणी नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 05:00 IST

जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. सध्या हलक्या धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. जड धान निसविण्याच्या मार्गावर आहे. जड धानासाठी हा पाऊस अनुकुल मानला जात आहे.मात्र हलक्या धानाची कापणी सुरू असून कापणी केलेला धान तसाच बांध्यामध्ये पडून आहे. त्यामुळे मंगळवार आणि बुधवारी (दि.७) झालेल्या परतीच्या पावसाचा फटका कापणीला केलेल्या धानाला बसला.

ठळक मुद्देपरतीचा पावसाची शक्यता : कृषी विभागाने दिला अर्लट

लोकमत न्यूज नेटवर्कगोदिया : जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील हलक्या धानाच्या कापणीला सुरूवात केली आहे. मात्र याच दरम्यान परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने कापणी केलेल्या धानाला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. हवामान विभागाने १४ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा इशारा दिला असून शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी तुर्तास करु नये अशा इशारा कृषी विभागाने दिला आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. सध्या हलक्या धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. जड धान निसविण्याच्या मार्गावर आहे. जड धानासाठी हा पाऊस अनुकुल मानला जात आहे.मात्र हलक्या धानाची कापणी सुरू असून कापणी केलेला धान तसाच बांध्यामध्ये पडून आहे. त्यामुळे मंगळवार आणि बुधवारी (दि.७) झालेल्या परतीच्या पावसाचा फटका कापणीला केलेल्या धानाला बसला. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.काही शेतकऱ्यांनी हलक्या धानाची मळणी करण्यास सुरूवात केली होती, त्याला सुध्दा पावसाचा फटका बसल्याने धान पाखड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील काही शेतकरी जड धानासह हलका धानाची सुध्दा लागवड करतात. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने या धानाची विक्री करुन शेतकरी दिवाळी सण साजरा करतात.दिवाळीचा सण एक महिनावर असून यंदा त्यापुर्वीच हलका धान निघाल्याने लगबगीने धानाची कापणी करुन त्याची मळणी करण्यास सुरूवात केली आहे. मात्र यंदा परतीचा पाऊस चांगलाच बरसत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच हवामान विभागाने १४ ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकट टळले नसून त्यांनी वेळीच सावध होत धान कापणी आणि मळणी थांबवावी अशा सूचना कृषी विभागाने केल्या आहेत.३० हजार हेक्टरला फटकाजिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे ३० हजार हेक्टरवरील पिकांना फटका सबला आहे.पाऊस आणि वाऱ्यामुळे शेतातील धानपिक झोपल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांनी नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीला देण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.हवामान विभागाने १४ ऑक्टोबर दरम्यान पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या कालावधी शेतकऱ्यांनी धानाची कापणी आणि मळणी करु नये, तसेच हलक्या धान पिकाचे नुकसान झाले असल्यास त्याची माहिती विमा कंपनीला ७२ तासाच्या आत द्यावी.- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती