शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

योजना भरपूर असूनही शेतकऱ्यांना लाभ नाही

By admin | Updated: May 14, 2014 01:57 IST

शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावा, कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक प्रगती करता यावी, यासाठी शासनाने अनेक उपाययोजना अमलात आणल्या;

काचेवानी : शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावा, कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक प्रगती करता यावी, यासाठी शासनाने अनेक उपाययोजना अमलात आणल्या; मात्र या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत आहेत. शासनाच्या कृषीविषयक योजना राबविणारे अधिकारी बोकाळले असल्यामुळे प्रत्येक योजनेपासून शेतकरी वंचित राहात आहेत.शेतकऱ्यांच्या उत्थानाकरिता, मदतीकरिता आणि मार्गदर्शनाकरिता केंद्र स्तरावर कृषी विभाग, राज्याचा कृषी विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठिकाणी कृषी विभाग कार्यरत आहे. याव्यतिरिक्त सेवाभावी संस्थेद्वारे (बँक, संस्था) शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ घेता यावा, याकरिता चार दशकांपूर्वीपासून प्रयत्न केले जात आहेत. मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्याऐवजी दयनीय होत चाललेली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.शेतकऱ्यांना शेतीविषयक जाणीव व्हावी, आधुनिक शेतीत सुधारणा व्हावी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावले, याकरिता १९६९ मध्ये कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात करण्यात आली. कृषी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालये सुरू करण्यात आली. पिकात सुधारणा व्हावी, उत्पन्नात वाढ व्हावी, कमी खर्चात अधिक उत्पादन मिळावे, याकरिता १९७२ मध्ये पीक संशोधन केंद्र उभारण्यात आले. बियाणे तंत्रज्ञान संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. मत्स्य संशोधन केंद्राची स्थापना १९८३ ला करण्यात आली. भूसंसाधन केंद्राची व कार्यक्रमाची स्थापना, पर्यावरण केंद्राची प्रगत प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. एवढेच नाही, तर कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र सुरू करण्यात आले. शेतकरी दिलासा अभियान सुरू करण्यात आले. २00३ मध्ये कृषी तंत्रज्ञान केंद्राची सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर भाभा अणुसंशोधन केंद्राच्या सहयोगातून संशोधनाचे कार्य १९८४ पासून सुरू करण्यात आले.सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून शासनातर्फे शेतीविषयक आधुनिक साहित्य व औजारे, बियाणे, कमी दरात खते, औषधी, यंत्रे पुरविण्यात येत आहेत. राष्ट्रीय पाणलोट कार्यक्रमाची स्थापना १९९५ मध्ये करण्यात आली. या योजनेंतंर्गत बांधाचे धुर्‍यावर माती घालणे (शेती पुनरुज्जीवन), भाततळे, सिमेंट नाल्यांचे बांधकाम व बोडीचे काम पूर्ण केले जात आहे.शेतकऱ्यांना दिले जाणारे आर्थिक लाभ व सहयोग यावर विचार केल्यास राष्ट्रीयकृत बँकेत कृषी विभाग असतो. जिल्हा मध्यवर्ती बँक, सेवा सहकारी संस्था, ग्रामीण व शहरी भागात सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची सुविधा करण्यात आली आहे. शेतीत उत्पादन काढण्याकरिता कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी अल्प दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. परंतु या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार शासन करीत असल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)