शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

योजना भरपूर असूनही शेतकऱ्यांना लाभ नाही

By admin | Updated: May 14, 2014 01:57 IST

शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावा, कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक प्रगती करता यावी, यासाठी शासनाने अनेक उपाययोजना अमलात आणल्या;

काचेवानी : शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावा, कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक प्रगती करता यावी, यासाठी शासनाने अनेक उपाययोजना अमलात आणल्या; मात्र या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत आहेत. शासनाच्या कृषीविषयक योजना राबविणारे अधिकारी बोकाळले असल्यामुळे प्रत्येक योजनेपासून शेतकरी वंचित राहात आहेत.शेतकऱ्यांच्या उत्थानाकरिता, मदतीकरिता आणि मार्गदर्शनाकरिता केंद्र स्तरावर कृषी विभाग, राज्याचा कृषी विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठिकाणी कृषी विभाग कार्यरत आहे. याव्यतिरिक्त सेवाभावी संस्थेद्वारे (बँक, संस्था) शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ घेता यावा, याकरिता चार दशकांपूर्वीपासून प्रयत्न केले जात आहेत. मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्याऐवजी दयनीय होत चाललेली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.शेतकऱ्यांना शेतीविषयक जाणीव व्हावी, आधुनिक शेतीत सुधारणा व्हावी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावले, याकरिता १९६९ मध्ये कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात करण्यात आली. कृषी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालये सुरू करण्यात आली. पिकात सुधारणा व्हावी, उत्पन्नात वाढ व्हावी, कमी खर्चात अधिक उत्पादन मिळावे, याकरिता १९७२ मध्ये पीक संशोधन केंद्र उभारण्यात आले. बियाणे तंत्रज्ञान संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. मत्स्य संशोधन केंद्राची स्थापना १९८३ ला करण्यात आली. भूसंसाधन केंद्राची व कार्यक्रमाची स्थापना, पर्यावरण केंद्राची प्रगत प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. एवढेच नाही, तर कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र सुरू करण्यात आले. शेतकरी दिलासा अभियान सुरू करण्यात आले. २00३ मध्ये कृषी तंत्रज्ञान केंद्राची सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर भाभा अणुसंशोधन केंद्राच्या सहयोगातून संशोधनाचे कार्य १९८४ पासून सुरू करण्यात आले.सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून शासनातर्फे शेतीविषयक आधुनिक साहित्य व औजारे, बियाणे, कमी दरात खते, औषधी, यंत्रे पुरविण्यात येत आहेत. राष्ट्रीय पाणलोट कार्यक्रमाची स्थापना १९९५ मध्ये करण्यात आली. या योजनेंतंर्गत बांधाचे धुर्‍यावर माती घालणे (शेती पुनरुज्जीवन), भाततळे, सिमेंट नाल्यांचे बांधकाम व बोडीचे काम पूर्ण केले जात आहे.शेतकऱ्यांना दिले जाणारे आर्थिक लाभ व सहयोग यावर विचार केल्यास राष्ट्रीयकृत बँकेत कृषी विभाग असतो. जिल्हा मध्यवर्ती बँक, सेवा सहकारी संस्था, ग्रामीण व शहरी भागात सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची सुविधा करण्यात आली आहे. शेतीत उत्पादन काढण्याकरिता कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी अल्प दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. परंतु या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार शासन करीत असल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)