शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

शेतकरी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 6:00 AM

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने १७ फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित व्यक्तींना तसेच पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी सुधारित निर्णय घेतला.ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी पीक कर्ज घेतले नाही.

ठळक मुद्देधानपिक नुकसानीच्या सर्वेक्षणानंतरही मदत नाही : शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त

संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : जुलै ते ऑक्टोबर २०१९ मधील अतिवृष्टी व पूरबाधित व्यक्तींन आणि पीक हानी झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्याचा निर्णय घेतला. नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांना ६९ कोटी रुपये मंजूर केले. मात्र गोंदिया जिल्ह्यात आॅगस्ट व सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या धानपिक नुकसानीचे सर्वेक्षण होऊनही मदत देण्यात आली नाही.या प्रकारामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने १७ फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित व्यक्तींना तसेच पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी सुधारित निर्णय घेतला.ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी पीक कर्ज घेतले नाही. परंतु त्यांच्या पिकांची अतिवृष्टी व पुरामुळे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना कमाल हेक्टरच्या मर्यादेत शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीनुसार अनुज्ञेय असलेल्या मदत दराच्या तिप्पट रक्कम मदत म्हणून देण्यास मान्यता दिली आहे. नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी मागणी केलेला ६८ कोटी ९४ लक्ष २७ हजार रुपये निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.पूर्व विदर्भाच्या नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नुकसानीचा लाभ मिळणार आहे. मात्र ऑगस्ट व सप्टेंबर २०१९ या महिन्यात गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर हानीमुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३ ते ६ सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली.संबंधित विभागाद्वारे नुकसानीचे सर्वेक्षण होऊन अहवाल सादर करण्यात आला. यात जानवा, येगाव, खामखुरा, इसापूर, इटखेडा, डोंगरगाव, महागाव, सिरोली, नवनीतपूर, काटगाव, वडेगावबंध्या, बोळदे, करडगाव, माहूरकुडा, मालकनपुर, निलज, रामघाट, तुमडीमेंढा, गवरा भरनोली, केशोरी, परसोडी रयत, सिलेझरी अशा २३ गावातील ४५२ शेतकºयांच्या ६६.४८ हे आर शेतातील ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले आहे. तर या सर्व गावातील १०५.२९ हे.आर. शेत जमिनीतील धान पिकाचे ३३ टक्क्यापेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. तसा अहवाल तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने सादर करण्यात आला. आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोंदिया तालुक्यात सुमारे १२०० हे.आर. शेतजमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे.त्यासाठी १.७५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.एवढे असतानाही शासनाने १७ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या निर्णयात जी मदतीची आकडेवारी दर्शविण्यात आली आहे. त्यात गोंदिया जिल्ह्याला वगळण्यात आले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कालावधीत जिल्ह्यातील इतर तालुक्यात नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही.जिल्हानिहाय मिळालेल्या निधीचा गोषवारानागपूर      ९२०९८०० कोटीवर्धा           ३६७२०००भंडारा       ८३६५४०००गोंदिया     ०००००००चंद्रपूर        २०८१७००००गडचिरोली   ३०१८३३०००