शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

शेतकरी पाण्यासाठी आसूसलेले

By admin | Updated: February 11, 2016 02:13 IST

उदरनिर्वाहासाठी शेती गरजेची आहे. शेतीच्या पिकांवर नागरिक, राज्य आणि प्रशासनसुध्दा ७० टक्के अवलंबून आहे.

निकृष्ट व अर्धवट बांधकाम : कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे संगनमतबाराभाटी : उदरनिर्वाहासाठी शेती गरजेची आहे. शेतीच्या पिकांवर नागरिक, राज्य आणि प्रशासनसुध्दा ७० टक्के अवलंबून आहे. पण जिल्हा पाण्याचा असूनही इथल्या शेती पोशिंद्याला पीक घेण्यासाठी कालव्यालगतच्या शेतीलाही पाणी मिळत नाही. पण याच कालव्यांना नटवण्यासाठी प्रशासन आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खासगी कंत्राटदाराकडून ओबळधोबळ काम करवून घेतात. या कामांना आता वेग येत आहे, पण शेतकऱ्यांना मात्र पाण्याअभावी खेद होत आहे. परिसरात २०१५ ला उन्हाळ्यामध्ये नवेगावबांध तलावाच्या पाण्याचे स्त्रोत, लहान-मोठा कालवा शेती पाण्यासाठी उपलब्ध आहेत. पण हे कालवे निकामी ठरल्यासारखे आहेत. फक्त त्यांना नववधूप्रमाणे नटविले जाते. सिंमेटचे बासिंग बांधून निकृष्ट दर्जाचे काम केले जाते. पण या परिसराचा शेतकरी मात्र पाण्यासाठी आसूसलेलाच दिसतो. काम जरी झाले तरी ते निकृष्ट व अर्धवटच असते. याची तपासणी कधीच झाली नाही. कंत्राटदार व सदर विभागाचे अभियंता-कर्मचारी आणि अधिकारी यांचे ओल्या पार्टीचे संगनमत व पाकीट बंदचा प्रकार असतो. लिफाफा ही तत्त्वप्रणाली सुरूच आहे.या कालव्यालगत शेती परिसरात कधीच पूर्णपणे पाणी मिळाले नाही. उन्हाळी हंगाम तर कधीच पूर्ण झाले नाही. नवेगावबांधचे पाणी कालवा मार्गाने कधीच पूर्ण मिळत नाही. त्यामुळे मोठा शेतकरी हा स्वत:च्या शेतात बोअरवेल करतो. मात्र अभियंता-अधिकारी यांची चौकशी नाही. सदैव दुर्लक्ष म्हणून पावसाळी-उन्हाळी शेती पिके अनेकवेळा हातून गेले. अशातच कर्जाचे ओफे व धान नाही म्हणून आत्महत्येचा प्रकार घडतो. पाण्याची आवश्यकता आहे पण मिळत नाही. कमिशन तत्वावर खासगी व शासकीय कंत्राटदारांना काम देऊन मोकळे होतात. पण त्या कालव्यांमध्ये पाण्याचा थेंबही दिसत नाही, असेच सर्वत्र दिसून येते. सिमेंट कामासारखे इतर काम झाले, पण त्याला कधी योग्य न्याय मिळत नाही. कुठे काम तुटतो, कधी पाईप टाकत नाही, बंधारा देत नाही. पाणी योग्य मिळत नाही, पण कामाला मात्र मर्यादा नाहीच. अशा परिस्थितीमध्ये कोणतीही शेती पिकत नाही. त्यामुळे नुकसानच सहन करावे लागते. भूमिपूत्र, मंत्री, आमदार, खासदार लक्ष देत नाही. येरंडी, बाराभाटी, कुंभीटोला, बोळदे, कवठा, सुकळी, खैरी, ब्राम्हणटोला, पिंपळगाव, खांबी, डोंगरगाव येथील शेतकरी उन्हाळी पिकाची आस करतात. पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी कामे सुरळीत होणे गरजेचे आहे. (वार्ताहर)