शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

शेतकरी पीक कर्जापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:07 AM

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. याला वर्षभराचा कालावधी लोटूनही कर्जमाफीतील घोळ संपलेला नाही. त्याचाच फटका नवीन पीक कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे.

ठळक मुद्देयाद्यांनी वाढविली चिंता : बँका उद्दिष्टापासून लांबच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. याला वर्षभराचा कालावधी लोटूनही कर्जमाफीतील घोळ संपलेला नाही. त्याचाच फटका नवीन पीक कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. खात्यावरील आधीचे कर्ज शून्य न झाल्याने बँका नवीन पीक कर्ज देण्यास टाळटाळ करीत असल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ७० हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. यासाठी शासनाने यंदा खरीप हंगामात जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाना एकूण २७६ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले. मात्र जुलै महिना अर्धा संपला असताना बँकानी अद्यापही पीक कर्ज वाटपाचे अर्धे सुध्दा उद्दिष्ट पूर्ण केले नाही.गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आत्तापर्यंत १९ हजार २२० शेतकऱ्यांना ७३ कोटी रुपयांचे तर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकानी केवळ ३७ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे.जिल्हा व राष्ट्रीयकृत बँकानी वाटप केलेल्या पीक कर्जाची बेरीज केल्यास ११० कोटी रुपयांच्या पलिकडे हा आकडा जात नाही. त्यामुळे बँकाना पीक कर्जाचे अर्धे सुध्दा उद्दिष्ट गाठता आले नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी असून दरवर्षी यापैकी ७० ते ८० हजार शेतकरी पीक कर्जाची उचल करतात. मात्र यंदा खरीप हंगामाला सुरूवात होवून दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर केवळ २५ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया किती गतीने सुरू आहे याची कल्पना न केलेली बरी. राष्ट्रीयकृत बँकाच्या पायऱ्या झिजवून देखील पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढत चालली आहे. तर दुसरीकडे बँका आमचे काम सुरळीत सुरू असल्याचा दावा करीत आहे. पीक कर्ज वाटपाचे पाणी नेमके कुठे मुरत आहे हे न समजण्यापलीकडे आहे.महाआॅनलाईनकडून याद्या मिळण्यास विलंबकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांची दहावी ग्रीन यादी अद्यापही बँकाना महाआॅनलाईनकडूृन प्राप्त झाली नाही. त्यामुळे जवळपास २० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरील कर्जाची रक्कम शून्य होत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देता येत नाही. तर शेतकऱ्यांनी थकीत कर्ज भरल्यास त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. दरम्यान महाआॅनलाईनकडून याद्या प्राप्त पाठविण्यास विलंब होत असल्याने पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची मात्र कोंडी होत आहे.पीक कर्ज वाटप मेळावे नावापुरतेचखरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध व्हावे, त्यांना सावकारांच्या दारात उभे राहण्याची वेळ येवू नये, यासाठी बँकातर्फे तालुका स्तरावर पीक कर्ज वाटप मेळावे घेण्यात आले. मात्र यानंतर पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकाना गाठता आले नाही. त्यामुळे पीक कर्ज वाटप मेळावे घेवून बँकानी नेमके काय साध्य केले असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.त्या शेतकऱ्यांचे कायकर्जमाफीच्या ग्रीन यादीत शेतकऱ्यांची नावे नसताना त्यांची दिशाभूल करुन थकीत कर्जाची रक्कम भरायला लावण्यात आल्याचा प्रकार तिरोडा तालुक्यातील पिंडकेपार, बोदलकसा, सुकडी डाकराम या गावांमध्ये घडला. मात्र आता या शेतकऱ्यांची नावे ग्रीन यादीत नसल्याने व जवळ असलेली सर्व जमापुंजी व उधार उसनवारी करुन कर्जाची रक्कम भरली. आता नवीन पीक कर्ज मिळणार नसल्याने खरीप हंगाम करायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.