शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

खोटे आश्वासन देणारे सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:24 IST

भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करते. मात्र आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही ठोस निर्णय घेतलेला नाही. शेतकरी कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. मात्र फक्त २० टक्केच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम पिपरटोला येथील कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करते. मात्र आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही ठोस निर्णय घेतलेला नाही. शेतकरी कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. मात्र फक्त २० टक्केच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे काम काँग्रेस सरकारने केले असून भाजप सरकार खोटे आश्वासन देणारी सरकार असल्याचा आरोप आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केला.तालुक्यातील पांढराबोडी जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या ग्राम पिपरटोला (गिरोला) येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले, पांढराबोडी जिल्हा परिषद क्षेत्र नेहमीच कॉँग्रेस पक्षाचे बळकट गड राहिले आहे. मात्र मागील काही काळात कॉँग्रेसचा गड तोडण्यासाठी भाजपा कार्यकर्ते चुकीचा प्रचार करुन लोकांमध्ये भ्रम निर्माण करीत आहे. मात्र आता जनतेलाही भाजप सरकारचा खरा चेहरा ओळखू आला आहे, त्याचे परिणाम लोकसभेच्या पोटनिवडणुकीत दाखवून दिले असल्याचेही आमदार अग्रवाल सांगितले.मेळाव्याला जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमनलाल बिसेन, रमेश लिल्हारे, प्रकाश डहाट, प्रकाश रहमतकर, ओमप्रकाश भक्तवर्ती, रूद्रसेन खांडेकर, विक्की बघेले, लक्ष्मी रहांगडाले, जगतराय बिसेन, बंडू शेंडे, मदन लिल्हारे, ओमप्रकाश रहांगडाले, डॉ. योगेश बिसेन, कृपाल लिल्हारे, प्रकाश तांडेकर, राजेश ठाकरे, संतोष ठाकरे, दिनेश तुरकर, अनिल चुलपार, लखन पटले, नलिनी शहारे, मधु हनवते यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालcongressकाँग्रेस