शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बाहेरून आलेल्यांची तपासणी व चौकशी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

अलिकडेच बाहेरील राज्यातून बरेच नागरीक आले आहे. गोरेगाव शहरासह अनेक भागात बाहेरून आलेल्या नागरीकाविषयी सुज्ञ नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. गोरेगाव शहरात बाहेरील राज्यातून किती लोकं आले आहे. याचा आकडाच नाही. त्यामुळे कोरोनाची लागन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात तीन दिवसांपूर्वी आलेल्या काही कुटूंब आणि शिक्षणासाठी गेलेल्या युवकाची साधी आरोग्य तपासणी ही झाली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याविषयी नगर पंचायतकडून माहीती घेतली असता त्यांच्याकडे कुठलीही माहिती नाही.

ठळक मुद्देकोरोनाची दहशत : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यात बाहेरील राज्यातून बरेच नागरीक परत आले आहे. काही शिक्षण घेण्यासाठी गेले होते तर काही रोजगारासाठी. मात्र स्थानिक प्रशासनाने यांची साधी तपासणी किंवा चौकशी केली नाही. बाहेरील राज्यातून गोरेगाव येथे परतणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे यापासून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अलिकडेच बाहेरील राज्यातून बरेच नागरीक आले आहे. गोरेगाव शहरासह अनेक भागात बाहेरून आलेल्या नागरीकाविषयी सुज्ञ नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. गोरेगाव शहरात बाहेरील राज्यातून किती लोकं आले आहे. याचा आकडाच नाही. त्यामुळे कोरोनाची लागन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात तीन दिवसांपूर्वी आलेल्या काही कुटूंब आणि शिक्षणासाठी गेलेल्या युवकाची साधी आरोग्य तपासणी ही झाली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याविषयी नगर पंचायतकडून माहीती घेतली असता त्यांच्याकडे कुठलीही माहिती नाही. याविषयी सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी नगर पंचायत प्रशासनाने सायंकाळी उशिरापर्यंत शहरात दवंडी देत बाहेरील राज्यातून आलेल्या नागरीकांविषयी माहीती देण्याचे आवाहन केले असले तरी भितीपोटी कुणीही माहिती द्यायला पुढे आलेले नाही. ज्या ज्या वॉर्डात बाहेरील राज्यातून नागरीक आले आहे. त्या-त्या वॉर्डातील नागरिकांनी प्रशासनाच्या गलथान कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता तालुक्यात कोरोना दहशत असताना जमावबंदी संचारबंदी कायदा अंमलात आणण्यासाठी पोलीस विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. गोरेगाव पोलीस स्टेशन अतंर्गत ७३ गावे येतात. मात्र सध्याच्या परिस्थितीत गोरेगाव पोलीस स्टेशन येथे ४५ कर्मचारी कार्यरत आहेत.यापैकी काही कर्मचारी रात्रपाळीत गस्तीवर काही रजेवर तर काही दैनंदिन कामात व्यस्त राहतात. अशा वेळी उरलेल्या कर्मचाऱ्यांवर संपूर्ण भार येतो. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यात नागरिकही तेवढेच दोषी आहेत.पोलीस नागरिकांसाठी झटत आहे ही भावना नागरिकांना अद्यापही लक्षात येत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या