शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: February 28, 2015 01:07 IST

राज्याच्या प्रत्येक क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीनुरूप शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे.

गोरेगाव : राज्याच्या प्रत्येक क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीनुरूप शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. जिल्ह्यात विविध विकासात्मक कामे सुरू असून अनेक कामे शासनाच्या विचाराधिन आहेत. या सर्व योजना कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचवाव्या, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.तालुक्यातील सोनी जि.प. क्षेत्राच्या सदस्य सीता रहांगडाले यांच्या वतीने आयोजित भाजप कार्यकर्ता मेळावा तसेच नवनिर्वाचित आमदार व खासदार यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.ते पुढे म्हणाले, येत्या काळात सिंचनासह शेतीपूरक उद्योग साधला जाईल. सोबत बेरोजगार व बचत गटाच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबविले जाणार आहेत. ही विकास कामे जनतेपर्यंत पोहचावेत यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यातूनच पक्ष व शासनाप्रति जनतेचा विश्वास वाढेल, असे ते म्हणाले.भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली माजी आ. हेमंत पटले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी ना. राजकुमार बडोले, खा. नाना पटोले, आ. विजय रहांगडाले यांचा जि.प. सदस्य सीता रहांगडाले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सोहळ्याला माजी आ. खुशाल बोपचे, खोमेश रहांगडाले, रेखलाल टेंभरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिलीप चौधरी, रविकांत बोपचे, सभापती चित्रकला चौधरी, तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, युवराज रहांगडाले, संजय बारेवार, रूषीलाल टेंभरे, शशी फडे, पंकज रहांगडाले, सुरेश रहांगडाले, नितीन कटरे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविकातून सीता रहांगडाले यांनी सोनी क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा मांडला. शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी निवेदन पुस्तिका सादर केली. अध्यक्षीय भाषणात विनोद अग्रवाल यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेताना, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले. मतभेद बाजूला ठेऊन कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाचे कार्य हे स्वत:चे कार्य समजून करावे आणि पक्षाला बळकट करावे, असे आवाहनही त्यांनी केले. खा. नाना पटोले यांनी आगामी काळात सर्वसामान्यांना नक्कीच चांगले दिवस येतील, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी आ. विजय रहांगडाले, हेमंत पटले, खोमेश रहांगडाले यांनीही मार्गदर्शन केले. संचालन कमलेश रहांगडाले व आभार युवराज रहांगडाले यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)