शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

पगार न झाल्यास बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

शासनाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी १४६ आणि १३ सप्टेंबर २०१९ ला १६३८ विना अनुदानीत शाळांना अनुदान देण्याची घोषणा केली. यानंतर उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी १८ व २१ ऑक्टोबर २०१९ रोजी शिक्षण संचालक पुणे यांनी राज्यातील सर्व उपसंचालकांना १ ते ५९ कॉलमची माहिती मागविली होती.

ठळक मुद्देकृती संघटनेचा इशारा : शासनाने दखल घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विनाअनुदानीत शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना मागील पंधरा ते वीस वर्षांपासून वेतन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे येत्या दहा ते पंधरा दिवसात पगार न झाल्यास आगामी बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शाळा कृती संघटना गोंदिया शाखेतर्फे देण्यात आला आहे.संघटनेने त्यांच्या मागण्यांकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. हे धरणे आंदोलन आ.नागो गाणार यांच्या नेतृत्त्वात करण्यात येणार होते. मात्र ते पोहचलेच नाही. त्यामुळे संघटनेने याबद्दल संताप व्यक्त केला.शासनाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी १४६ आणि १३ सप्टेंबर २०१९ ला १६३८ विना अनुदानीत शाळांना अनुदान देण्याची घोषणा केली. यानंतर उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी १८ व २१ ऑक्टोबर २०१९ रोजी शिक्षण संचालक पुणे यांनी राज्यातील सर्व उपसंचालकांना १ ते ५९ कॉलमची माहिती मागविली होती. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शिक्षण शिक्षणाधिकारी कार्यालय या ठिकाणी सर्व उच्च माध्यमिक शाळांनी ११ व १३ नोव्हेंबरपर्यंत माहितीची फाईल पूर्ण करून जमा केली. त्यानुसार या शाळांना वेतन व पगार मिळण्यासाठी येणाऱ्या नागपूर येथील अधिवेशनात आर्थिक तरतूद पुरवणी मागणीद्वारे करण्यात येणार होती. परंतु ती आर्थिक तरतूद सहा दिवस चाललेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मंजूर होऊ शकली नाही. वरील घोषित १४६ व १६६८ तसेच मंत्रालय स्तरावरील कॉलेजची वेतन निश्चितीसह ५९ मुद्यांची माहिती संचालक कार्यालयाकडून दोन महिन्यापूर्वी मागविलेली होती.सदर माहिती वेळेत पोहोचली नसल्याने वरील कॉलेजची पुरवणी मागणी डिसेंबर २०१९ मधील अधिवेशनात होऊ शकली नाही. त्यामुळे १३ सप्टेंबर २०१९ व २८ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयान्वये या कॉलेजला आर्थिक तरतूद करून वेतन सुरू करावे असा स्पष्ट जीआर आहे. त्यामुळे शासनाने या जीआरची अंमलबजावणी करुन शिक्षकांचे पगार त्वरीत करावे. अन्यथा बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.मागील पंधरा ते वीस वर्षांपासून शिक्षकांना वेतन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर वेतनाच्या प्रतीक्षेत गोंदिया येथील एका शिक्षकाचा बळी गेला असून याला केवळ शासन आणि शिक्षण विभागाच जबाबदार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना त्वरीत वेतन देण्यात यावे अशी मागणी संघटनेचे नागपूर विभागीय सचिव प्रा.कैलास बोरकर, महिला अध्यक्ष प्राध्यापिका सरोदे, प्रा.एच.डी.समरीत, नागपूर विभागीय महिला सचिव प्राध्यापिका अर्चना उरकुडे, सचिव प्रा.मेहर, एस.एस बन्सोड, आर.एस जगणे, एस.डी.येळे, एम.ए.उके, सोनू कटरे, अनिता बनवले यांनी केली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक