शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

प्रवाशांच्या जीव गेला तरी चालेल प्रवास खड्ड्यातूनच करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST

सालेकसा : तालुक्याची लाईफ लाईन समजल्या जाणारा आमगाव सालेकसा दरेकसा मार्ग आज घडीला पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे नजर ...

सालेकसा : तालुक्याची लाईफ लाईन समजल्या जाणारा आमगाव सालेकसा दरेकसा मार्ग आज घडीला पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे नजर हटी दुर्घटना घटी ही म्हण खरी ठरत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे.

राज्य महामार्ग म्हणून ओळखला जाणारा हा मुख्य रस्ता तालुक्याच्या महत्त्वाचा आहे. या मार्गाशिवाय तालु्क्यातील कोणत्याही हालचालीची कल्पनाच करता येत नाही. या मार्गाकडे शासन प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. या मार्गावरुन प्रवास करणे प्रवाशांच्या जीवावर बेतणारे ठरत आहे. प्रवाशांचा जीव गेला तरी चालेल पण प्रवास खड्ड्यातूनच करा असे चित्र आहे. आमगाव सालेकसा दरेकसा मार्ग हा आमगावपासून वाघ नदीपर्यंत ३ किमी फक्त आमगाव तालुक्यात येत असून वाघ नदीपासून सालेकसा तालुक्याची सीमा प्रारंभ होऊन सालेकसापर्यंत १३ किमी सालेकसावरुन दरेकसापर्यंत १५ किमी आणि दरेकसाच्या पुढे राज्याच्या सीमेवर असलेल्या चांदसूरजपर्यंत सात किमी आणि नंतर पुढे छत्तीसगड राज्यात प्रवेश करुन डोंगरगड शहराला जोडते. एकूण ३५ किमी लांबीचा रस्ता राज्य महामार्ग आहे. तसेच आमगाव ते सालेकसा, साकरीटोला, झालीया, कावराबांध, गोवारीटोला, पानगाव, रोंढा, मुरुमखोला या गावावरुन जाणारे रस्ते या मार्गाशी मध्य प्रदेशला जोडतात.

.....

निकृष्ट बांधकामाकडे दुर्लक्ष

साकरीटोला, मोहाटोला, कोटजमूरा, नवेगाव, बाम्हणी, खेडेपार, गल्लाटोला येथील सीमेवरुन दररोज हजारो लोक मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात सतत ये-जा करीत असतात. या सीमेवरील दोन्हीकडील गावाकडचे नातेवाईक सुध्दा आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या शहराकडे जाण्यासाठी मध्य प्रदेशातील आणि छत्तीसगड राज्यातील लोक या महामार्गावरुनच प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावरुन २४ तास वर्दळ असते. या मार्गाचे अनेकदा डांबरीकरण करण्यात आले. पण बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याने अल्पावधीत रस्त्याची स्थिती जैसे थे होते.

.....

डागडुजीचे वय दोन दिवस

आमगाव-सालेकसा मार्गावरुन जाताना काही ठिकाणी दोन तीन महिला कामगार हातात झाडू घेऊन रस्ता स्वच्छ करताना दिसतात त्यानंतर एखदा दुसरा मजूर त्यावर थोडासा डांबरीकरण करुन गिट्टी टाकून जातो व रस्ता दुरुस्तीची सारवासारव केली जाते. परंतु फक्त दोनच दिवसात ती डागडुजी निघून जाते आणि रस्ता पुन्हा खड्डेमय होतो.

.......