शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

नऊ वर्षानंतरही बेवारटोला हत्याकांडाच्या जखमा ओल्या

By admin | Updated: May 30, 2014 00:09 IST

सालेकसापासून पूर्वेस २२ कि.मी.वर बेवारटोला परिसरात ३0 मे २00५ ला घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटाने नक्षलवाद्यांनी पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्याला मोठा हादरा दिला होता. त्यात ९ पोलीस कर्मचारी

३0 मे २00५ ची घटना : १0 पोलीस जवानांचा घेतला होता बळीनामदेव हटवार - सालेकसासालेकसापासून पूर्वेस २२ कि.मी.वर बेवारटोला परिसरात ३0 मे २00५ ला घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटाने नक्षलवाद्यांनी पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्याला मोठा हादरा दिला होता. त्यात ९ पोलीस कर्मचारी आणि एका खासगी वाहन चालकाचा बळी गेला. या घटनेला शुक्रवारी ९ वर्षे होत आहेत. मात्र या दुर्घटनेतून वाचलेल्या पोलीस कर्मचार्‍यांच्या अंगावर अजूनही त्या घटनेच्या आठवणीने काटा उभा राहिल्याशिवाय राहात नाही.बेवारटोला गावाजवळ बेवारटोला जलाशयाचे काम सुरू होते. बेवारटोला हा परिसर जंगलव्याप्त असून नक्षलवाद्यांचा वावर असलेला परिसर आहे. शासनाच्या मंजुरीनंतर येथे तलावाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. येथील बांधकामासाठी दगड फोडण्याचे काम नेहमीप्रमाणे सुरू होते. दगड फोडण्यासाठी स्फोटकांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी दरेकसा येथील एओपीचे (आर्म्स आऊट पोस्ट) पोलीस गार्ड पुरविण्यात आले होते. ३0 मे २00५ ला ब्लास्टिंगचे काम करण्याचे ठरल्यामुळे पोलीस कर्मचारी सोबतीला देण्यात आले होते. ब्लास्टिंगचे काम संपल्यानंतर दुपारी ४.३0 वाजताच्यादरम्यान पोलीस पार्टी परत येण्यासाठी क्वॉलिस गाडी (एमएच ३१/ए.एच २४९0) आणि एक्सप्लोझिव्ह व्हॅन (एमएच ३५/९३४) मध्ये बसून निघाले असताना बेवारटोला बंजारी रस्त्यावर भूसुरुंगाद्वारे स्फोट करण्यात आला. पोलीस विभागाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवून अगोदरच नक्षलवाद्यांनी रचलेल्या कटानुसार हा भयानक स्फोट झाला. क्वालिस गाडी खेळण्यातल्या गाडीसारखी हवेत उंच उडाली आणि तिचे तुकडे तुकडे झाले. सोबतच नक्षल्यांकडून बेधुंद गोळीबार झाला.या घटनेत २ पोलीस उपनिरीक्षक, ७ पोलीस कर्मचारी व १ खासगी वाहन चालक अशा १0  जणांचा बळी गेला. दोन पोलीस गंभीर  जखमी होऊन या हत्याकांडातून वाचले. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांकडील ७ एसएलआर, ४ एके रायफल, ग्रेनेट, वॉकीटाकी, काडतूस व इतर साहित्य लुटून नेले. एक्सप्लोसिव्ह व्हॅनमधील सोलर प्राईम पेटी २४ किलो आणि सुपर पावरगो जिलेटिन १ पेटी २५ किलो असा २५00 रुपयांचा ऐवजही पळवून नेला. गोंदिया जिल्ह्यात नक्षलवादी सक्रिय झाल्यानंतर त्यांनी घडवून घडवून आणलेली ही पहिलीच मोठी हिंसक कारवाई होती. त्या घटनेपासून जिल्ह्यात नक्षल्यांची दहशत आणखीच वाढली. ती आजही कायम आहे.या भूसुरुंग स्फोटाच्या घटनेला नऊ वर्षे झाली तरी प्रत्यक्षदशर्र्ींना अजूनही ती घटना ताजी असल्यासारखे वाटते. नशीन बलवत्तर होते म्हणून आपले प्राण या भयानक घटनेतून वाचले, असे दोन्ही प्रत्यक्षदश्री सांगतात. या घटनेनंतर पोलिसांनी तीव्र नक्षली भागात गस्त करताना काळजी घेणे सुरू केल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा भुसुरूंगासारख्या घटना घडवून आणण्यात नक्षल्यांना यश आले नाही. परंतू नक्षल्यांनी तसे प्रयत्न मात्र जरूर केले आहेत. काही महिन्यांपूर्वी नक्षल्यांनी पेरून ठेवलेले भुसूरंग पोलिसांनी जप्त करून नक्षल्यांचा डाव उधळून लावला आहे.