शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
3
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
4
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
5
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
6
गणेश चतुर्थीला मित्रांना, नातेवाईकांना सोशल मीडियावर 'हा' संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
7
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
8
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
9
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
10
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
11
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
12
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
13
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
14
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
15
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
16
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
17
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
18
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
19
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
20
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

नऊ वर्षानंतरही बेवारटोला हत्याकांडाच्या जखमा ओल्या

By admin | Updated: May 30, 2014 00:09 IST

सालेकसापासून पूर्वेस २२ कि.मी.वर बेवारटोला परिसरात ३0 मे २00५ ला घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटाने नक्षलवाद्यांनी पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्याला मोठा हादरा दिला होता. त्यात ९ पोलीस कर्मचारी

३0 मे २00५ ची घटना : १0 पोलीस जवानांचा घेतला होता बळीनामदेव हटवार - सालेकसासालेकसापासून पूर्वेस २२ कि.मी.वर बेवारटोला परिसरात ३0 मे २00५ ला घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटाने नक्षलवाद्यांनी पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्याला मोठा हादरा दिला होता. त्यात ९ पोलीस कर्मचारी आणि एका खासगी वाहन चालकाचा बळी गेला. या घटनेला शुक्रवारी ९ वर्षे होत आहेत. मात्र या दुर्घटनेतून वाचलेल्या पोलीस कर्मचार्‍यांच्या अंगावर अजूनही त्या घटनेच्या आठवणीने काटा उभा राहिल्याशिवाय राहात नाही.बेवारटोला गावाजवळ बेवारटोला जलाशयाचे काम सुरू होते. बेवारटोला हा परिसर जंगलव्याप्त असून नक्षलवाद्यांचा वावर असलेला परिसर आहे. शासनाच्या मंजुरीनंतर येथे तलावाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. येथील बांधकामासाठी दगड फोडण्याचे काम नेहमीप्रमाणे सुरू होते. दगड फोडण्यासाठी स्फोटकांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी दरेकसा येथील एओपीचे (आर्म्स आऊट पोस्ट) पोलीस गार्ड पुरविण्यात आले होते. ३0 मे २00५ ला ब्लास्टिंगचे काम करण्याचे ठरल्यामुळे पोलीस कर्मचारी सोबतीला देण्यात आले होते. ब्लास्टिंगचे काम संपल्यानंतर दुपारी ४.३0 वाजताच्यादरम्यान पोलीस पार्टी परत येण्यासाठी क्वॉलिस गाडी (एमएच ३१/ए.एच २४९0) आणि एक्सप्लोझिव्ह व्हॅन (एमएच ३५/९३४) मध्ये बसून निघाले असताना बेवारटोला बंजारी रस्त्यावर भूसुरुंगाद्वारे स्फोट करण्यात आला. पोलीस विभागाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवून अगोदरच नक्षलवाद्यांनी रचलेल्या कटानुसार हा भयानक स्फोट झाला. क्वालिस गाडी खेळण्यातल्या गाडीसारखी हवेत उंच उडाली आणि तिचे तुकडे तुकडे झाले. सोबतच नक्षल्यांकडून बेधुंद गोळीबार झाला.या घटनेत २ पोलीस उपनिरीक्षक, ७ पोलीस कर्मचारी व १ खासगी वाहन चालक अशा १0  जणांचा बळी गेला. दोन पोलीस गंभीर  जखमी होऊन या हत्याकांडातून वाचले. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांकडील ७ एसएलआर, ४ एके रायफल, ग्रेनेट, वॉकीटाकी, काडतूस व इतर साहित्य लुटून नेले. एक्सप्लोसिव्ह व्हॅनमधील सोलर प्राईम पेटी २४ किलो आणि सुपर पावरगो जिलेटिन १ पेटी २५ किलो असा २५00 रुपयांचा ऐवजही पळवून नेला. गोंदिया जिल्ह्यात नक्षलवादी सक्रिय झाल्यानंतर त्यांनी घडवून घडवून आणलेली ही पहिलीच मोठी हिंसक कारवाई होती. त्या घटनेपासून जिल्ह्यात नक्षल्यांची दहशत आणखीच वाढली. ती आजही कायम आहे.या भूसुरुंग स्फोटाच्या घटनेला नऊ वर्षे झाली तरी प्रत्यक्षदशर्र्ींना अजूनही ती घटना ताजी असल्यासारखे वाटते. नशीन बलवत्तर होते म्हणून आपले प्राण या भयानक घटनेतून वाचले, असे दोन्ही प्रत्यक्षदश्री सांगतात. या घटनेनंतर पोलिसांनी तीव्र नक्षली भागात गस्त करताना काळजी घेणे सुरू केल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा भुसुरूंगासारख्या घटना घडवून आणण्यात नक्षल्यांना यश आले नाही. परंतू नक्षल्यांनी तसे प्रयत्न मात्र जरूर केले आहेत. काही महिन्यांपूर्वी नक्षल्यांनी पेरून ठेवलेले भुसूरंग पोलिसांनी जप्त करून नक्षल्यांचा डाव उधळून लावला आहे.