शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

प्रशासन बैठकीत व्यस्त अन् शहरवासीय कचऱ्याने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST

अस्वच्छता हीच सर्व आजारांचे मूळ आहे. त्यातच सध्या कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहे. मात्र यानंतरही नगर परिषद केवळ बघ्याची भूमिका निभावित आहे. शहरात प्रवेश केल्यापासूनच केरकचऱ्याचे ढिेगारे पडलेले दिसतात.

ठळक मुद्देठिकठिकाणी केरकचऱ्याचे ढिगारे : न.प.ची बघ्याची भूमिका,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत शासन आणि प्रशासनातर्फे युध्दपातळीवर उपाय योजना केल्या जात आहे. कोरोनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी दररोज बैठका घेत आहेत. मात्र गोंदिया शहरवासीयांच्या आरोग्याकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे चित्र आहे. शहरात सर्वत्र केरकचऱ्याचे ढिगारे पडले असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पण, याकडे नगर परिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासन बैठकांमध्ये व्यस्त तर शहरवासीय केरकचऱ्याने त्रस्त असल्याचे चित्र शहरात सध्या कायम आहे.अस्वच्छता हीच सर्व आजारांचे मूळ आहे. त्यातच सध्या कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहे. मात्र यानंतरही नगर परिषद केवळ बघ्याची भूमिका निभावित आहे. शहरात प्रवेश केल्यापासूनच केरकचऱ्याचे ढिेगारे पडलेले दिसतात. या कचऱ्यावर डुकरांचा स्वच्छंदपणे वावर सुरू असतो. तर कचरा संकलन करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी लावलेल्या कचरापेट्यांमधील कचऱ्याची विल्हेवाट न लावल्याने त्या तुडूंब भरुन सर्वत्र कचरा पसरला आहे. विशेष म्हणजे गोरेलाल चौक, प्रभू रोड, पोस्ट आॅफिस रोड या मार्गावर काही ठिकाणी कचरापेट्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच याच लगत पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहे. हाच कचरा पाण्याच्या स्त्रोतांमध्ये पडून असल्याने शहरवासीयांना दूषीत पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नाही. नेहरु चौकातील पुतळ्यासमोर केचकचºयाचे ढिगारे मागील दोन तीन दिवसांपासून पडले आहेत. थोर पुरुषांपासून नागरिकांना प्रेरणा मिळावी यासाठी थोरपुरुषांचे शहरात ठिकठिकाणी पुतळे उभारण्यात आले आहे. मात्र या पुतळ्यांच्या परिसरातील घाणीचे साम्राज्य पाहून या थोर पुरुषांना सुध्दा स्वत:चा अपमान होत असल्याची जाणीव होत असावी असेच चित्र आहे. शहरातील कुठल्या भागात जा त्या ठिकाणी केरकचºयाचे ढिगारे पडले नसतील तर आश्चर्य वाटेल. संपूर्ण शहरालाच केरकचऱ्याचा वेढा असल्याचे चित्र आहे. शहरवासीयांची याबद्दल ओरड सुरू आहे. मात्र ही अद्यापही नगर परिषदेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. त्यामुळे कोरोनासारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना नगर परिषदे स्वच्छतेप्रती ऐवढी उदासीन राहली नसती. शहराचे बकाल हाल होत असताना जिल्हाधिकाऱ्यांचे सुध्दा याकडे लक्ष नसल्याचे दिसून येते.मागील आठवडाभरापासून त्या केवळ कोरोनाच्या बैठकांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र आहे.शहरात आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यास जवाबदार कोणशहरात काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांलगतच केरकचऱ्याचे ढिगारे पडले आहे. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून नागरिकांना दूषीत पाण्याचा पुरवठा होऊन साथ रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अद्यापही ही बाब नगर परिषदेने गांर्भियाने घेतलेली नाही.त्यामुळे शहरवासीयांच्या आरोग्याची नगर परिषदेला किती काळजी आहे दिसून येते.डासनाशक फवारणीचा विसरकोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नगर परिषदेने शहरात प्रतिबंधकात्मक उपाय योजना राबविणे अपेक्षित होते. तसेच केरकचऱ्याची नियमित विल्हेवाट लावून डासनाशक फवारणी करण्याची गरज होती. तसेच पाण्याच्या स्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर टाकणे शिवाय इतर उपाय योजना करणे अपेक्षित होते. मात्र यासंदर्भात कुठलेही पाऊल नगर परिषदेने अद्यापही उचललेले नाही.कचऱ्याची रोज विल्हेवाट तर रस्त्यावर कचरा कसा?शहरातील केरकचऱ्याची नियमित विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेने ३३ आॅटो टिप्पर, घंटा गाड्यांची खरेदी केली आहे. त्यांच्या माध्यमातून दररोज केरकचरा संकलीत केला जात असल्याचा दावा नगर परिषदेचे अधिकारी करीत आहे. मग कचरपेट्या आणि रस्त्याच्या लगत केरकचºयाचे ढिगारे कसे पडून आहेत. असा सवाल शहरवासीयांकडून केला जात आहे.अधिकार आहेत तर वापर केव्हा करणार ?नागपूर महानगरपालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खर्रा खावून रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता काही दिवस पानठेले बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. आपत्तकालीन स्थिती अश्या उपाय योजना करण्याची तरतूद सुध्दा आहे. मग नगर परिषद कुणाच्या आदेशाची प्रतीक्षा करित आहे हे कळण्यास मार्ग नाही.जनजागृतीत सुध्दा उदासीनताकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व याला प्रतिबंध लावण्यासाठी नागरिकांनी कोणत्या उपाय योजना कराव्यात यासाठी शासन आणि प्रशासनाकडून व्यापक जनजागृती केली जात आहे. मात्र नगर परिषदेने अद्यापही यासाठी कुठलीच पाऊले उचली नसल्याचे चित्र आहे.आजारांचा प्रकोप वाढल्यानंतर घेणार का दखलशहरातील अस्वच्छता व घाणीच्या साम्राज्यामुळे शहरवासीयांना साथरोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे साथरोगांची लागण झाल्यानंतर नगर परिषद कामाला लागणार का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.कराची आकारणी करता मग सुविधा का नाही?नगर परिषदेकडून शहरवासीयांकडून विविध कराची आकारणी केली जाते. तो कर शहरवासीय सुध्दा नियमित भरतात. मात्र शहरवासीय ज्या गोष्टींचे कर नगर परिषदेकडे भरतात मग त्यांना त्या सुविधा देणे हे नगर परिषदेचे काम आहे. मात्र गोंदिया शहराची सध्या स्थिती पाहता हे केवळ नाममात्र ठरतात. त्यामुळे कराची आकारणी करता मग सुविधा का देत नाही असा सवालही शहरवासीय करीत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस