शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

समस्यांचा पाढा संपेना...

By admin | Updated: March 13, 2015 01:57 IST

शहराच्या ह्दयस्थळी वसलेल्या प्रभाग क्रमांक ६ मधील बहुतांश भाग सिव्हील लाईन्स मध्ये मोडतो.

कपिल केकत गोंदिया शहराच्या ह्दयस्थळी वसलेल्या प्रभाग क्रमांक ६ मधील बहुतांश भाग सिव्हील लाईन्स मध्ये मोडतो. शिवाय शहरातील गणेशनगर व बाजार भागातील परिसरही या प्रभागात येत असल्याने प्रभाग चांगलाच मोठा आहे. यातील राहुल यादव व सुनिता हेमणे या दोनही नगरसेवकांची ही पहिलीच वेळ आहे. येथील चारही नगरसेवकांनी आपपला परिसर वाटून घेतला आहे. यातील तीन नगरसेवक भाजपचे तर एक नगरसेवक राष्ट्रवादीचा आहे. तरिही ते एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे ऐकू आले. सफाईचा अभाव, सांडपाण्याचे डबके, डुकरांचा हैदोस, कचरा व सांडपाण्याने बरबटलेल्या नाल्या तसेच उखडलेल्या रस्त्यांचे दचके येथील नागरिकांच्या नशिबी आहे. नगरसेवक येत नाही. तक्रार केल्यास आश्वासन देतात मात्र समस्या सोडविल्या जात नसल्याचे नागरिक सांगतात. मामा चौकातून प्रभागात पाय ठेवल्यास सांई मंदिर रोडवर दचके खात पुढे जावे लागते. सफाई मंदिराच्या परिसरातच तुंबलेल्या नाल्या व कचऱ्याचे ढिगार नजरेत पडतात. या ट्रेलरवरूनच उर्वरीत पिक्चर डोळ््यापुढे येते. साईनगर नव्याने वसत असलेली कॉलनी असून येथील रस्ते बघताच परतून जावे अशी स्थिती आहे. नाल्यांअभावी प्लॉटमध्ये सांडपाण्याचे डबके तयार झाले आहेत. त्यात डुकरांचा वावर, यामुळे दुर्गंध व डासांचा प्रकोप आहे. अशा कठिण परिस्थितीत नागरिकांना रहावे लागत आहे. येथील काहींनी तर नगरसेवकाने आपल्या घराजवळचा रस्ता बनवून अन्य नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याचे बोलून दाखविले. गोविंदपूर रोडतर जागोजागी उखडला आहे. गजानन महाराजांच्या मंदिरासमोर पावसाळयात पाणी साचत असल्याचे नागरिकांनी सांगीतले. गटार फुटलेले, नाल्या तुंबलेल्या आहेत. नगरसेवकांचे दर्शन होत नसून फक्त वोट मागण्यासाठी आले होते असे येथील नागरिक सांगतात. एवढेच नव्हे तर समस्या सांगीतल्यास तो परिसर आमचा नसल्याचे सांगत टोलवाटोलवी करून आपली जबाबदारी झटकत असल्याचेही येथील नागरिकांनी सांगीतले. पथदिवे व्यवस्थीत असल्याचे नागरिकांनी सांगीतले. गांधी वॉर्डात लोकांशी संवाद साधला असता त्यांनी, महिना-महिना कचरा पडून राहत असून उचल होत नसल्याचे सांगत आपला रोष व्यक्त केला. झाडू लागतो मात्र सफाई होत नाही. पाईपलाईनसाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने रस्ते खोदले. मात्र त्यांची दुरूस्ती न झाल्याने नागरिकांनी ये-जा करण्यात त्रास होत आहे. रस्त्यांमुळे कित्येक अपघातही येथे घडल्याचे नागरिकांनी सांगीतले. विशेष म्हणजे नगरसेवकांच्या येण्या-जाण्याचा हा रस्ता असल्यामुळे ते दिसतात. मात्र त्यांना काही समस्या सांगीतल्यास फक्त आश्वासन मिळत असून त्यांची पूर्तता होत नसल्याचे येथील महिलांनी सांगीतले. वोटसाठीच नगरसेवक आल्याचे नागरिक बोलतात.