शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मे महिन्याच्या पहिल्या जि. प. अध्यक्ष निवडणुकीचा साधणार मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 13:17 IST

जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला, मात्र अद्यापही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली नाही.

ठळक मुद्देपंचायत समितीची आरक्षण सोडत आज राजकीय हालचालींना वेग, सत्ता स्थापनेकडे लागले लक्ष

गोंदिया : जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत मंगळवारी (दि. १९) काढण्यात येणार आहे. ही आरक्षण सोडत निघल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर होणार असून, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जि. प. अध्यक्षाची निवड होणार असल्याची माहिती आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला, मात्र अद्यापही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली नाही. परिणामी, मागील तीन महिन्यापासून निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे. नुकतेच ग्रामविकास मंत्रालयाने अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुका घेण्याबाबत पत्र दिले. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

आधी कोरोनामुळे आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षण रद्द केल्याने मागील दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रशासकराज सुरू आहे. त्यातच आरक्षणासंदर्भात ग्रामविकास मंत्रालयाने आपले मार्गदर्शन करण्यास तब्बल तीन महिने लावले. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना निवडून आल्यानंतरही अधिकारापासून वंचित राहावे लागत होते. मात्र, आता ही अडचण दूर झाली असून, जिल्हा निवडणूक विभागाने जि. प. अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अध्यक्ष आणि सभापतींची निवड होणे आता निश्चित मानले जात आहे.

आठही पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत

ग्रामविकास विभागाच्या १२ एप्रिलच्या पत्रानुसार जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील अडीच वर्षांच्या कालावधीकरिता जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदांच्या आरक्षित पदांची सोडत सोमवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे.

तीन तालुक्यांत प्राधान्य कुणाला ?

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेत भाजप सर्वाधिक २६ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकूण ५३ सदस्यीय जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २७ या मॅजिक फिगरची गरज आहे. अपक्षांच्या मदतीने हा आकडा गाठण्याची धडपड भाजपने सुरू केली आहे. जि. प. अध्यक्ष पदासाठी गोंदिया तालुक्यातून संजय टेंभरे, अर्जुनी मोरगाव तालुक्यातून लायकराम भेंडारकर, गोरेगाव तालुक्यातून डॉ. लक्ष्मण भगत यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. पण अध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हे भाजपचे वरिष्ठ नेते ठरविणार आहेत.

अध्यक्ष निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याला घेऊन वेळेवर काही होऊ शकते. याच जिल्हा परिषदेत भाजप-काँग्रेस अभद्र युतीचा प्रयोग सुद्धा झाला आहे. तर या निवडणुकीत सुद्धा कुरघोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. दोन भिन्न पक्ष एकत्रित येऊन देखील जि. प. मध्ये सत्ता स्थापन करू शकतात. या निवडणुकीला घेऊन सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळेच या निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडी चमत्कार करणार का?

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २७ या आकड्याची गरज आहे. काँग्रेस १३, राष्ट्रवादी ८, अपक्ष २, चाबी ४ यांची बेरीज केल्यास २७ हा आकडा गाठता येतो. तशा अंतर्गत हालचाली सुद्धा सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी ऐनवेळी काही चमत्कार करते काय, हे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदgondiya-acगोंदिया