शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेत आठ गावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:26 IST

शहराप्रमाणेच गावांचा विकास व्हावा व सर्व पायाभूत सुविधा निर्माण करुन आदर्श गावचे स्वप्न साकारावे यासाठी शासनाने ‘स्मार्ट ग्राम’ योजना २०१६ पासून सुरू केली. या योजनेतंर्गत प्रत्येक तालुक्यातील एक, जिल्ह्यातील एक व राज्यातील एका गावची ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसोमवारपासून पाहणी : ‘स्मार्ट ग्राम’ ठरणाऱ्या ग्रामपंचायतला ४० लाखांचे बक्षीस

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराप्रमाणेच गावांचा विकास व्हावा व सर्व पायाभूत सुविधा निर्माण करुन आदर्श गावचे स्वप्न साकारावे यासाठी शासनाने ‘स्मार्ट ग्राम’ योजना २०१६ पासून सुरू केली. या योजनेतंर्गत प्रत्येक तालुक्यातील एक, जिल्ह्यातील एक व राज्यातील एका गावची ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड करण्यात येत आहे. सन २०१८ या वर्षात तालुक्याचे मुल्यमापन झाले असून त्यातील आठ गावे जिल्हास्तरावरील ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेत आली आहेत.हिवरेबाजार या आदर्श गावचे चित्र राज्यातील प्रत्येक गावांमध्ये निर्माण व्हावे, गावांचा सर्वांगिण विकास व्हावा, तेथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देऊन ती गावे ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून ओळखली जावित यासाठी शासनाने २०१६ पासून ‘स्मार्ट ग्राम’ योजना सुरू केली. या योजनेतंर्गत प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातून १ स्मार्ट ग्राम आणि निवड केलेल्या तालुक्यातील गावांपैकी एका गावची जिल्हास्तरावर ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड केली जात आहे.तालुकास्तरावर ‘स्मार्ट ग्राम’ला प्रत्येकी १० लाख रुपये तर जिल्हास्तरावर निवड केलेल्या ‘स्मार्ट ग्राम’ला ४० लाख रूपयांचा पुरस्कार देण्यात येत आहे. ‘स्मार्ट ग्राम’ झालेल्या गावांमध्ये पर्यावरण समृद्धी योजना, गांडूळ व कंपोस्ट खत निर्मिती, सौर उर्जेवर पथदिवे, गावातील रस्त्यांचे सिमेंटीकरण, आठवडीबाजाराचा विकास, गावातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा यासह इतर कामे केली जाणार होती.या कामांसाठी लागणारा निधी ‘स्मार्ट ग्राम’ला पुरस्कार स्वरुपात मिळालेल्या रकमेतून केला जाण्याचा सरकारचा माणस आहे.मागील वर्षाची पुरस्कार रक्कम मिळाली नाहीसन २०१७ मध्ये निवड झालेल्या ‘स्मार्ट ग्राम’ला १ मे रोजी महाराष्टÑ दिनाच्या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार होते. पण, पुरस्कारासाठी लागणारा निधी ग्रामविकास विभागाने उपलब्ध करुन दिला नाही. त्यामुळे मागील वर्षभरापासून ‘स्मार्ट ग्राम’ ठरलेल्या गावातील गावकरी पुरस्काराच्या प्रतिक्षेत आहे. वर्षभराचा कालावधी लोटूनही शासनाने पुरस्काराच्या रकमेबाबत कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे मागील वर्षी ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड झालेले सडक-अर्जुनी तालुक्यातील कोकणा गाव निधीपासून वंचीत असून निधी अधावी ‘स्मार्ट ग्राम’चे स्वप्न अधुरेच आहे.ही गावे आहेत स्पर्धेत‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेत उतरलेल्या गावांचे तालुकास्तरावर मुल्यमापन करण्यात आले. यामध्ये, आमगाव तालुक्यातून वळद हे गाव प्रथम आले. देवरी तालुक्यातील भागी-शिरपूर, सालेकसा तालुक्यातील झालीया, गोरेगाव तालुक्यातील मलपूरी, तिरोडा तालुक्यातील पांजरा, गोंदिया तालुक्यातील मुंडीपार-ढाकणी, सडक-अर्जुनी तालुक्यातील गोंगले व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शिरेगावबांध या गावांचा समावेश आहे. या यावांची तपासणी सोमवारपासून करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय चमू २३ एप्रिल रोजी आमगाव, सालेकसा व देवरी तालुका, २४ एप्रिल रोजी सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुका व २५ एप्रिल रोजी गोरेगाव, तिरोडा व गोंदिया तालुक्याचे मुल्यमापन करणार आहे. या मुल्यामापनात तालुकास्तरावर प्रथम आलेल्या आठ गावांचे मुल्यमापन जिल्हास्तरावर करण्यात येईल.तालुकास्तरावर प्रथम आलेली गावे जिल्हास्तरावरील ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेत आहेत. प्रत्येक तालुक्यातून प्रथम येणाºया गावांचे मुल्यमापन करून परिशिष्ट ‘अ’ मध्ये असलेल्या निकषांच्या आधारावर मुल्यांकन करून ‘स्मार्ट ग्राम’ निवडले जाईल.- राजेश बागडेउपमुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प.गोंदिया.