शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

वीज वितरण कंपनीला आठ हजारांचा दंड

By admin | Updated: June 2, 2014 01:23 IST

वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याचा आरोप लाऊन

गोंदिया : वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याचा आरोप लाऊन ग्राहकाकडून २५ हजार २११ रूपये तसेच वीज जोडणीच्या नावावर चार हजार रूपये उकळणार्‍या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने चांगलाच दणका दिला आहे. या प्रकरणात ग्राहक न्याय मंचने वीज वितरण कंपनीला तक्रारदारास झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी पाच हजार रूपये तर तक्रारीवर आलेल्या खर्चापोटी तीन हजार रूपये दंड ठोठावला आहे. २९ मे रोजी ग्राहक न्यायमंचने हा आदेश सुनावला आहे.

सविस्तर प्रकरण असे की, तक्रारकर्ता दिलीप काशिनाथ तिवारी (तिरोडा) यांच्याकडे त्यांच्या नावाने सन २00५ वीज मीटर आहे. त्यांच्याक डील विद्युत देयक अवाढव्य येत असल्याने तिवारी यांनी वीज मीटर मध्ये बीघाड आल्याने मीटर बदलून देण्याची विनंती वीज कंपनीकडे केली होती.

यावर २१ मे २0११ रोजी तिवारी यांच्या तक्रारीवरून वीज कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी त्यांच्याकडील मीटर तपासणी करून त्याचे सील तुटलेले असल्याचे तसेच मीटर कमी गतीने फिरत असल्याचे दाखवून तिवारी यांना २५ हजार २११ रूपये २६ पैशांचे विद्युत देयक दिले. एवढेच नव्हे तर वीज जोडणीच्या नावावर चार हजार रूपये घेतले.

मात्र यानंतरही तिवारी यांना १४९ युनिटचे बिल दिल्या जात असल्याने त्यांनी जास्तीचे पैसे वसुल केले जात असून कंपनीकडे जमा असलेल्या रकमेतून पुढील देयक अदा करण्यात यावे.

तसेच झालेल्या त्रासापोटी वीज कंपनीकडून १२ हजार रूपये मिळावे यासाठी तिवारी यांनी १६ नोव्हेंबर २0११ रोजी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता व्ही.डी.मेश्राम व सहायक अभियंता ए.व्ही. तुपकर यांच्या विरोधात ग्राहक तक्रार न्याय मंचकडे तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे न्यायालयाने दोघांना नोटीस बजावून त्यांचा लेखी जबाब मागविला.

यावर त्यांच्या वकिलांनी दोघांना जाब मांडत तक्रारदार तिवारी हे वेळोवेळी विद्युत देयक भरत नव्हते. तसेच त्यांच्या मीटरची तपासणी केली असता ते कमी वेगाने फिरत असल्याचे, मीटरची सील तुटलेली असल्याने व त्यांनी वीज जोडणी साठी आकारण्यात येणारी रक्कम न भरल्याचे आपल्या जबाबात नमूद केले.

यावर मात्र तिवारी यांच्या वकिलांनी मीटरचे सील तुटले नाही. तसेच पंचनामा सहायक कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत तयार करावयाचा होता व त्यावेळी ग्राहक तेथे उपस्थित होणे गरजेचे होते. मात्र सहायक कार्यकारी अभियंता यांनी स्वत: पाहणी न केल्याने हा पंचनामा वैध ठरू शकत नसल्याची युक्तीवाद मांडला.

तसेच वीज कंपनीने पंचनामा करीत असताना दशर्विलेल्या पंचांचे प्रतिज्ञापत्र पुरावा म्हणून कंपनीने दाखल केले नसल्याचेही कारण पुढे मांडत २५ हजार २११ रूपयांचे देयक बेकायदेशीर असल्याचे मत मांडले. यावर ग्राहक तक्रार न्याय मंचने वीज कं पनीला तिवारी यांच्याकडून वसूल केलेली २५ हजार २११ रूपयांची रकम त्यांच्या पुढील देयकांत समायोजीत करावी, उपरोक्त रकमेवर दसादशे आठ टक्के दराने व्याज द्यावे, वीज जोडणीसाठी घेतलेले चार हजार रूपये परत करावे, तिवारी यांना झालेल्या त्रासाबद्दल पाच हजार रूपये तक्रारीचा खर्च म्हणून तीन हजार रूपये देण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे तर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून ३0 दिवसांच्या आत करण्याचे आदेशात नमूद आहे.

(शहर प्रतिनिधी)