शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मानव विकासच्या बसेसमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By admin | Updated: February 19, 2015 01:07 IST

महाराष्ट्र शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थिनींना शाळा व महाविद्यालयात ये-जा करण्याकरिता स्कूल बसची व्यवस्था केलेली आहे.

कोसमतोंडी : महाराष्ट्र शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थिनींना शाळा व महाविद्यालयात ये-जा करण्याकरिता स्कूल बसची व्यवस्था केलेली आहे. सदर बसने शालेय विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर ने-आण करणे आवश्यक आहे. परंतु एसटी बसच्या अनियमितपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सडक-अर्जुनी तालुक्याच्या व गोंदिया जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या कोसमतोंडी येथे फुलिचंद भगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि लोकसेवा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहेत. या दोन्ही शाळांसाठी शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत एका बसची व्यवस्था करून दिली आहे. या स्कूल बसने गिरोला, हेटी, चिचटोला, मुंडीपार, धानोरी व लेंडेझरी येथील विद्यार्थिनी ये-जा करतील, असे गृहीत होते. परंतु शासनाची ही योजना सपशेल अपयशी ठरली. कोसमतोंडी येथील दोन्ही शाळांची दुपार पाळीची वेळ दुपारी ११ वाजताची आहे. सकाळ पाळीची वेळ सकाळी ७.३० वाजताची आहे. मात्र मानव विकासची बस सकाळी ८ वाजता साकोलीवरून सुटून ९ वाजता कोसमतोंडी येथे पोहचते. त्यामुळे दोन तास अगोदर विद्यार्थिनी जेवण करून सदर बस पकडू शकत नाही. तसेच सायंकाळी दोन्ही शाळांना ५ वाजता सुट्टी होते. परंतु मानव विकासची स्कूल बस सायंकाळी ६.३० वाजता कोसमतोंडी येथे पोहचते. त्यामुळे विद्यार्थिनींना दीड ते दोन तास ताटकळत बसावे लागते. त्यामुळे मागील संपूर्ण सत्रामध्ये विद्यार्थिनींनी या बसने ये-जा करणे बंद केले. एकही विद्यार्थिनी या बसने ये-जा करीत नाही. बस खालीच येते आणि जाते. या बसचे व्यवस्थापन खंडविकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या अधिकारक्षेत्रात येते. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना कितपत होतो, याकडे त्यांचेसुद्धा लक्ष नाही. यावरून ग्रामीण भागामध्ये मानव विकासची ही योजना किती फसवी आहे, याची प्रचिती येते. दुसरीकडे सदर गावातील विद्यार्थिनींना बसची व्यवस्था आहे. त्यामुळे शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींना सायकल वाटप योजनेपासून वंचित ठेवले. त्यामुळे शासनाच्या दोन्ही योजनेचा लाभ विद्यार्थिनींना मिळत नसल्यामुळे विद्यार्थी व पालक संताप व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)