शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

परंपरागत व्यवसायाला ग्रहण

By admin | Updated: April 12, 2015 01:36 IST

थंड पाण्याच्या माध्यमातून कित्येकांचा आत्मा शांत करणारा कुंभार समाज शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आजही उपेक्षित जीवन जगत आहे.

गोंदिया : थंड पाण्याच्या माध्यमातून कित्येकांचा आत्मा शांत करणारा कुंभार समाज शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आजही उपेक्षित जीवन जगत आहे. त्यांचा परंपरागत व्यवसाय लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.उन्हाळ््यात जिवाची लाहीलाही होत असताना माठातील शितल जल अमृताप्रमाणे असते. गरिबांचा फ्रिज म्हणून पहिली पसंती माठाला असते. परंतु माठ घडविणारा समाज आजही उपेक्षितांचे जीवन जगत आहे. उन्हाळ््यात थंडगार पाणी मिळावे म्हणून कुंभार समाज माठ तयार करतो. माठ घडविण्यासाठी कुंभाराला गरम भट्टीचे व शासन तथा समाज व्यवस्थेचे चटके सहन करावे लागत आहे. बारा बलुतेदारांपैकी एक असा हा समाज आहे. परंपरा जोपासत पूर्वजांपासून चालत असलेला आपला व्यवसाय पुढे चालवित आहे. मात्र अलिकडे त्यांची ही कला शासनाच्या उदासीनतेत सापडली आहे. अ‍ॅल्युमिनियम, स्टील, पितळ आणि प्लास्टिकच्या अनेक वस्तु बाजारात उपलब्ध असल्याने मातीची काही गृहोपयोगी भांडी नामशेष झाली आहेत. परंतु थंड पाण्यासाठी असलेला माठ आजही गरिबांचा फ्रिज म्हणून वापरात आहे.शेतकऱ्यांना शेतात पिकविणे माहीत आहे. परंतु विकणे माहीत नाही. त्याचप्रमाणे कुंभार समाजाला फक्त माठ बनविणे माहीत आहे. परंतु त्याहून मोठया आर्थिक लाभाचा मार्ग अवगत नाही. या माठ व्यवसायात इतर जाती समुहाचे विक्रेते तयार झाले आहेत. कुंभार समाजात शिक्षणाचा प्रसार अत्यल्प असल्याने संपूर्ण कुटुंब याच व्यवसायावर अवलंबून आहे. दिवसभर कामामुळे आपल्या मुलांकडे त्यांना लक्ष देता येत नाही. मार्गदर्शनाचा अभाव व आईवडीलांची कसरत पाहून मुले शिक्षणापासून वंचित राहून व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिणामी समाजातील मुले शिक्षणापासूनच दूरच राहतात. त्यामुळेच वडिलांच्या हाताला हात लावत तेही याच व्यवसायात अडकून राहतात. या व्यवसायात इंधनासाठी लागणारी लाकडे व माती हेच साहित्य महत्वाचे असले तरी वन कायद्यामुळे तेही आज दुर्मिळ झाले आहेत. जीवन जगण्यासाठी समाजाकडे दुसरा व्यवसाय नाही. समाजबांधव शेती करतात. अनेकजण मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे थंड पाण्याच्या माध्यमातून कित्येकांचा आत्मा शांत करणारा कुंभार समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे. (शहर प्रतिनिधी)