शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

फक्त एक लाख खड्डे खोदले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 20:57 IST

जिल्ह्याातील ५४६ ग्रामपंचायतींना सहा लाख ६०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. असे असताना मात्र या ग्रामपंचायतींनी वृक्षारोपणासाठी अद्याप फक्त एक लाख नऊ हजार ५०५ खड्डे खोदून ठेवले आहेत.

ठळक मुद्देटार्गेट सहा लाख वृक्षलागवडीचे : १ जुलैपासून होणार सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याातील ५४६ ग्रामपंचायतींना सहा लाख ६०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. असे असताना मात्र या ग्रामपंचायतींनी वृक्षारोपणासाठी अद्याप फक्त एक लाख नऊ हजार ५०५ खड्डे खोदून ठेवले आहेत. १ जुलैपासून वृक्षलागवड केली जाणार असल्याने आता महिनाभरात या ग्रामपंचायत पाच लाख खड्डे खोदणार काय, असा सवाल येथे उपस्थित होत आहे.राज्य शासनाने सन २०१८ च्या पावसाळ्यात १३ कोटी वृक्ष लागवडची संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेत जिल्ह्यात ५० लाखांपेक्षा अधिक रोपटे लावले जाणार आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५४६ ग्रामपंचायतींना वृक्षारोपण करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहेत. यात, तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींना एक लाख चार हजार ५०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी फक्त ४ हजार ५३० खड्डे खोदले आहेत. गोंदिया तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींना एक लाख १९ हजार ९०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्यासाठी ग्रामपंचायतींनी फक्त तीन हजार ८५० खड्डे खोदले आहेत.गोरेगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींना ६० हजार ५०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्यासाठी ग्रामपंचायतींनी २० हजार २०० खड्डे खोदले आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यातील ६३ ग्राम पंचायतींना ६९ हजार ३०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात असून ग्रामपंचायतींनी फक्त चार हजार ३५० खड्डे खोदले आहेत. आमगाव तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींना ६२ हजार ७०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात असून येथील ग्रामपंचायतींनी फक्त १५ हजार ५०० खड्डे खोदले आहेत. देवरी तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींना ६० हजार ५०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी फक्त २३ हजार ३०० खड्डे खोदले आहेत.सालेकसा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींना ४६ हजार २०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी फक्त २२ हजार ७७५ खड्डे खोदले आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींना ७७ हजार रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी फक्त १५ हजार खड्डे खोदले आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींना ६ लाख ६०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. मात्र जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी मे अखेर फक्त एक लाख नऊ हजार ५०५ खड्डे खोदले आहेत. अशात उर्वरीत चार लाख ९१ हजार ९५ खड्डे अद्याप कधी खोदले जाणार असा प्रश्न पडत असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.खड्ड्यांना उन्हाचा फटका?उन्हाळ्यात माती किंवा मुरुमाच्या ठिकाणची जागा खोदण्यास मजुरांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. एक जोरदार पावसाची वाट खड्डे खोदण्यासाठी ग्रामपंचायत पाहात तर नसतील ना अशी शंका मनात येते. परंतु पावसाचे आगमन झाल्यावर शेतकरी पेरणीच्या कामाला लागेल. तेव्हा खड्डे खोदण्यासाठी मजूर कोठून मिळणार असा प्रश्न पडतो. अशात मागील वर्षातील रोपट्यांची संख्या यंदाच्या वृक्षारोपणात तर दाखविली जाणार नाही.लावलेल्या रोपट्यांचे संवर्धन व्हावेशासन दरवर्षी वृक्षारोपण करण्यावर भर देते. परंतु लावलेल्या रोपट्यांच्या संवर्धनाकडे तेवढाच भर देणे आवश्यक आहे. वृक्षारोपणासाठी जेवढा आग्रह केला जातो, तेवढाच आग्रह त्या रोपट्यांच्या संवर्धनासाठी करणे आवश्यक आहे. असे न झाल्यास लावलेली रोपटी एकतर देखभाली अभावी मरून जातात किंवा जनावरांच्या आहारी जातात. अशात वृक्ष लागवड कार्यक्रमाची उद्दीष्ट पुर्ती होत नाही.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत