शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
2
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
3
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
6
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
7
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
8
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
9
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
10
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
11
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
12
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
13
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
14
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
15
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
16
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
17
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
18
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
19
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
20
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू

फक्त एक लाख खड्डे खोदले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 20:57 IST

जिल्ह्याातील ५४६ ग्रामपंचायतींना सहा लाख ६०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. असे असताना मात्र या ग्रामपंचायतींनी वृक्षारोपणासाठी अद्याप फक्त एक लाख नऊ हजार ५०५ खड्डे खोदून ठेवले आहेत.

ठळक मुद्देटार्गेट सहा लाख वृक्षलागवडीचे : १ जुलैपासून होणार सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याातील ५४६ ग्रामपंचायतींना सहा लाख ६०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. असे असताना मात्र या ग्रामपंचायतींनी वृक्षारोपणासाठी अद्याप फक्त एक लाख नऊ हजार ५०५ खड्डे खोदून ठेवले आहेत. १ जुलैपासून वृक्षलागवड केली जाणार असल्याने आता महिनाभरात या ग्रामपंचायत पाच लाख खड्डे खोदणार काय, असा सवाल येथे उपस्थित होत आहे.राज्य शासनाने सन २०१८ च्या पावसाळ्यात १३ कोटी वृक्ष लागवडची संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेत जिल्ह्यात ५० लाखांपेक्षा अधिक रोपटे लावले जाणार आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५४६ ग्रामपंचायतींना वृक्षारोपण करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहेत. यात, तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींना एक लाख चार हजार ५०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी फक्त ४ हजार ५३० खड्डे खोदले आहेत. गोंदिया तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींना एक लाख १९ हजार ९०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्यासाठी ग्रामपंचायतींनी फक्त तीन हजार ८५० खड्डे खोदले आहेत.गोरेगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींना ६० हजार ५०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्यासाठी ग्रामपंचायतींनी २० हजार २०० खड्डे खोदले आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यातील ६३ ग्राम पंचायतींना ६९ हजार ३०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात असून ग्रामपंचायतींनी फक्त चार हजार ३५० खड्डे खोदले आहेत. आमगाव तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींना ६२ हजार ७०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात असून येथील ग्रामपंचायतींनी फक्त १५ हजार ५०० खड्डे खोदले आहेत. देवरी तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींना ६० हजार ५०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी फक्त २३ हजार ३०० खड्डे खोदले आहेत.सालेकसा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींना ४६ हजार २०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी फक्त २२ हजार ७७५ खड्डे खोदले आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींना ७७ हजार रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी फक्त १५ हजार खड्डे खोदले आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींना ६ लाख ६०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. मात्र जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी मे अखेर फक्त एक लाख नऊ हजार ५०५ खड्डे खोदले आहेत. अशात उर्वरीत चार लाख ९१ हजार ९५ खड्डे अद्याप कधी खोदले जाणार असा प्रश्न पडत असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.खड्ड्यांना उन्हाचा फटका?उन्हाळ्यात माती किंवा मुरुमाच्या ठिकाणची जागा खोदण्यास मजुरांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. एक जोरदार पावसाची वाट खड्डे खोदण्यासाठी ग्रामपंचायत पाहात तर नसतील ना अशी शंका मनात येते. परंतु पावसाचे आगमन झाल्यावर शेतकरी पेरणीच्या कामाला लागेल. तेव्हा खड्डे खोदण्यासाठी मजूर कोठून मिळणार असा प्रश्न पडतो. अशात मागील वर्षातील रोपट्यांची संख्या यंदाच्या वृक्षारोपणात तर दाखविली जाणार नाही.लावलेल्या रोपट्यांचे संवर्धन व्हावेशासन दरवर्षी वृक्षारोपण करण्यावर भर देते. परंतु लावलेल्या रोपट्यांच्या संवर्धनाकडे तेवढाच भर देणे आवश्यक आहे. वृक्षारोपणासाठी जेवढा आग्रह केला जातो, तेवढाच आग्रह त्या रोपट्यांच्या संवर्धनासाठी करणे आवश्यक आहे. असे न झाल्यास लावलेली रोपटी एकतर देखभाली अभावी मरून जातात किंवा जनावरांच्या आहारी जातात. अशात वृक्ष लागवड कार्यक्रमाची उद्दीष्ट पुर्ती होत नाही.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत