शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुभाष बागेची आबाळ

By admin | Updated: October 4, 2015 02:40 IST

बाग आहे मात्र त्याला माळीच नाही म्हटल्यास तोंडात बोट घालण्याची वेळ येते.

गोंदिया : बाग आहे मात्र त्याला माळीच नाही म्हटल्यास तोंडात बोट घालण्याची वेळ येते. मात्र ही आर्श्चयजनक बाब शहरातील एकमेव सुभाष बागेशी संबंधित आहे. नगर परिषदेच्या या भव्य बागेसाठी माळीच नाही. शिवाय कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे बागेची देखरेख व कामकाज प्रभावित होत आहे. शहरातील एकमात्र बागेला सुसज्ज करण्यात येथील नगर परिषद प्रशासन अपयशी ठरत असल्याचे यातून दिसून येते. शहरात नगर परिषदेची आता एकमात्र सुभाष बाग उरली आहे. बागेच्या अन्य जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहे, तर काही जागांचा अन्य उपयोगासाठी वापर केला जात आहे. अशात सकाळी आणि सायंकाळी बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना फिरण्यासाठी फक्त सुभाष बाग उरली आहे. शहरातील प्रदूषणयुक्त वातावरणापासून मुक्त होऊन चार क्षण शुद्ध वातावरणात घालविण्यासाठी शहरवासीयांचा कल सुभाष बागेकडे असतो. शहराच्या ह््दयस्थळी असलेली ही सुभाष बाग बाराही महिने नागरिकांच्या गर्दीने फुललेली असते. बागेतील शुद्ध वातावरणात चकरा मारण्यासाठी किंवा आपल्या बालगोपालांना बागेतील खेळण्यांवर खेळण्या-बागडवण्यासाठी शहरवासी मोठ्या उत्सुकतेने येथे येतात. मात्र बागेत पाहिजे त्या प्रमाणात व्यवस्था दिसून येत नाही. आजघडीला बागेत उगवलेले गवत गुडघ्यापेक्षा जास्त वाढले असून जंगली रोपटेही जिकडेतिकडे वाढलेले दिसते. बागीचा प्रशासनाकडून त्यांची कटाई करण्याचे काम सुरू आहे. मात्र बागेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने हे काम पाहिजे त्या गतीने होताना दिसून येत नाही. परिणामी जंगली गवत बागेत झपाट्याने वाढत चालले आहे. याशिवाय बागेत असलेल्या खेळण्यांतील एक-दोन खेळणी तुटलेली असल्याने चिमुकल्यांना त्यावर खेळता येत नाही. त्यांचा हिरमोड होते. विशेष म्हणजे गेल्यावर्षीच या बागेत काही खेळण्यांची दुरूस्ती झाली होती. मात्र वर्षभरात ही खेळणी पुन्हा खराब झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.बागेचे सौंदर्य हरपतेयबागेत माळीच नसल्याने वाढलेल्या झाडांची पद्धतशीरपणे कापणी करणे, फुलझाडांची देखरेख, जंगली गवत व झाडांच्या उगवण्यावर उपाययोजना, खत व कीटकनाशक फवारणी करणे आदि कामे बागेत होत नाहीत. परिणामी बागेचे सौंदर्य हरपले आहे. एवढी मोठी बाग असूनही माळी नसणे ही बाब नगर परिषदेसाठी नामुष्कीची ठरत आहे. बागेत येणाऱ्यांना मात्र याचा त्रास होतो. शहरात एकमेव बाग असताना त्याची देखभाल करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र यातून दिसून येते. (शहर प्रतिनिधी)