शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुभाष बागेची आबाळ

By admin | Updated: October 4, 2015 02:40 IST

बाग आहे मात्र त्याला माळीच नाही म्हटल्यास तोंडात बोट घालण्याची वेळ येते.

गोंदिया : बाग आहे मात्र त्याला माळीच नाही म्हटल्यास तोंडात बोट घालण्याची वेळ येते. मात्र ही आर्श्चयजनक बाब शहरातील एकमेव सुभाष बागेशी संबंधित आहे. नगर परिषदेच्या या भव्य बागेसाठी माळीच नाही. शिवाय कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे बागेची देखरेख व कामकाज प्रभावित होत आहे. शहरातील एकमात्र बागेला सुसज्ज करण्यात येथील नगर परिषद प्रशासन अपयशी ठरत असल्याचे यातून दिसून येते. शहरात नगर परिषदेची आता एकमात्र सुभाष बाग उरली आहे. बागेच्या अन्य जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहे, तर काही जागांचा अन्य उपयोगासाठी वापर केला जात आहे. अशात सकाळी आणि सायंकाळी बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना फिरण्यासाठी फक्त सुभाष बाग उरली आहे. शहरातील प्रदूषणयुक्त वातावरणापासून मुक्त होऊन चार क्षण शुद्ध वातावरणात घालविण्यासाठी शहरवासीयांचा कल सुभाष बागेकडे असतो. शहराच्या ह््दयस्थळी असलेली ही सुभाष बाग बाराही महिने नागरिकांच्या गर्दीने फुललेली असते. बागेतील शुद्ध वातावरणात चकरा मारण्यासाठी किंवा आपल्या बालगोपालांना बागेतील खेळण्यांवर खेळण्या-बागडवण्यासाठी शहरवासी मोठ्या उत्सुकतेने येथे येतात. मात्र बागेत पाहिजे त्या प्रमाणात व्यवस्था दिसून येत नाही. आजघडीला बागेत उगवलेले गवत गुडघ्यापेक्षा जास्त वाढले असून जंगली रोपटेही जिकडेतिकडे वाढलेले दिसते. बागीचा प्रशासनाकडून त्यांची कटाई करण्याचे काम सुरू आहे. मात्र बागेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने हे काम पाहिजे त्या गतीने होताना दिसून येत नाही. परिणामी जंगली गवत बागेत झपाट्याने वाढत चालले आहे. याशिवाय बागेत असलेल्या खेळण्यांतील एक-दोन खेळणी तुटलेली असल्याने चिमुकल्यांना त्यावर खेळता येत नाही. त्यांचा हिरमोड होते. विशेष म्हणजे गेल्यावर्षीच या बागेत काही खेळण्यांची दुरूस्ती झाली होती. मात्र वर्षभरात ही खेळणी पुन्हा खराब झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.बागेचे सौंदर्य हरपतेयबागेत माळीच नसल्याने वाढलेल्या झाडांची पद्धतशीरपणे कापणी करणे, फुलझाडांची देखरेख, जंगली गवत व झाडांच्या उगवण्यावर उपाययोजना, खत व कीटकनाशक फवारणी करणे आदि कामे बागेत होत नाहीत. परिणामी बागेचे सौंदर्य हरपले आहे. एवढी मोठी बाग असूनही माळी नसणे ही बाब नगर परिषदेसाठी नामुष्कीची ठरत आहे. बागेत येणाऱ्यांना मात्र याचा त्रास होतो. शहरात एकमेव बाग असताना त्याची देखभाल करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र यातून दिसून येते. (शहर प्रतिनिधी)