शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे देना बँकेचे व्यवहार ठप्प

By admin | Updated: November 12, 2014 22:46 IST

शहरात बऱ्याच वर्षापासून सुरू असलेली देना बँकेत आज कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे पैशाची देवाण घेवाण पुर्णत: बंद असल्याने ग्राहकाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

देवरी : शहरात बऱ्याच वर्षापासून सुरू असलेली देना बँकेत आज कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे पैशाची देवाण घेवाण पुर्णत: बंद असल्याने ग्राहकाकडून संताप व्यक्त केला जात आहे.मंगळवारी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील लोक बऱ्याच संख्येत ११ वाजता पैशाचे व्यवहार करण्याकरीता बँकेत पोहोचले. परंतु बँकेतील मुख्य कर्मचारी, उपलेखापाल व व्यवस्थापक गैरहजर असल्याने विड्रॉल फार्मवर कोण स्वाक्षरी करणार? हा प्रश्न तेथील उपस्थित रोख व लिपीक पडला त्यामुळे त्यांनी ग्राहकांना सांगितले की, आज पैशाचे व्यवहार होणार नाही. हे ऐकताच ग्राहकांची तारांबळ उडाली. त्यांनी संताप व्यक्त करीत बँकेतुन खाली हात परतले.प्राप्त माहितीनुसार मागील २० दिवसांपासून बँकेचे व्यवस्थापक सुधाकर नाना रंगारी बेपत्ता होते. तसेच उप लेखापाल महिला कर्मचारी सुट्टीवर आहेत. अशावेळी बँक व्यवस्थापकाद्वारे दुसरी कोणतीच उपाययोजना न केल्याने आज ग्राहकांना खाली हाताने परतावे लागले.विशेष म्हणजे या बँकेत सामान्य नागरिकांव्यतिरिक्त व्यापारी वर्ग निराधार वृद्ध, महिला, घरकुल योजना व मनरेगाचे हजारो खाते असल्याने दररोज या बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. बँकेची इमारत छोटी असल्यामुळे बरेचदा ग्राहकांना बँकेच्या बाहेर उन्हात उभे राहावे लागते. एटीएम मशीन शोभेची वास्तू बनवून ठेवण्यात आली आहे. सुरक्षा कर्मी व पार्किंगची सुविधा नाही. या संगळ्या अव्यवस्थेत बँकेत व्यवस्थापक नसने ही ग्राहकांसाठी चितेंची बाब आहे. देना बँकेच्या उच्च अधिकाराऱ्यांच्या दुर्लक्षामुळे देना बँकेच्या देवरी शाखेचे भविष्य संकटात असल्याचे बोलल्या जात आहे. देना बँकेच्या वरिष्ट स्तरावरील अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)