शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

काळी-पिवळी मालकांच्या भांडणामुळे वाहतूक बंद

By admin | Updated: June 11, 2014 23:20 IST

आमगाव-गोंदिया मार्गावर जवळपास ४० ते ५० काळी-पिवळी टॅक्सी मागील अनेक वर्षांपासून चालत आहेत. सध्या एका व्यक्तीच्या तीन काळी-पिवळी चालत आहेत, असा वाद समोर आल्याने सतत तीन

आमगाव : आमगाव-गोंदिया मार्गावर जवळपास ४० ते ५० काळी-पिवळी टॅक्सी मागील अनेक वर्षांपासून चालत आहेत. सध्या एका व्यक्तीच्या तीन काळी-पिवळी चालत आहेत, असा वाद समोर आल्याने सतत तीन दिवसांपासून आमगाव-गोंदिया मार्गावरील वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे रखरखत्या उन्हाळ्यात हाल होत आहेत. यावर प्रशासनामार्फत कोणताच तोडगा न निघाल्याने मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. आमगाव-गोंदिया मार्गावरील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आमगाववरून गोंदिया येथे विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय व खाजगी न्यायालयीन कामाकरीता जाणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या या मार्गावर ४० ते ४५ काळी-पिवळी टॅक्सी गाडी चालत आहे. मात्र नगरातील नविन जैन यांच्या मालकीच्या दोन काळी-पिवळी चालत आहेत. त्यात पुन्हा दोनमध्ये एक गाडी वाढवून तिन गाड्या जैन यांनी चालू केल्यामुळे इतरांकडे ज्या एक-एक गाड्या आहेत. त्यांच्यावर मोठा परिणाम झाला आहे. याचे आर्थिक भुर्दंड मालकावर बसत आहे. त्यामुळे सतत तीन दिवसांपासून काळी-पिवळी संघटनेच्यावतीने आमगाव-गोंदिया मार्गावरील वाहतूक बंद आहे. प्रवाशांकरिता सुरू असलेल्या एसटीच्या गाड्या कमी झाल्याने प्रवाशांचे भर उन्हाळ्यात ेहाल झाले आहेत. यात काळी-पिवळी संघटनेने पोलीस निरीक्षक यांचे सोबत बैठक घेतली मात्र त्यात काही निष्पन्न झाले नाही. आता गोंदिया येथील रस्ता वाहतूक अधिकारी यांना भेटून मार्ग काढण्याचा काळी-पिवळी संघटनेचा संकल्प आहे. या मार्गावरील वाहतूकी संदर्भात जैन याना विचारले असता माझ्या दोन गाड्या आहेत. त्याची कागदपत्र बरोबर आहेत. तिसऱ्या गाडीबाबत जो आरोप लावला जात आहे तो बिनबुडाचा आहे. तिसऱ्या गाडीवर माझ्याकडून बंद झालेला चालक शोभेलाल याच्या मालकीची आहे. त्या गाडीला नोंदणीकृत संघटनेने परवानगी दिली आहे. जर सदर काळी-पिवळी संघटनेने माझ्या चालत असलेल्या गाड्या बंद करण्याचा प्रयत्न केला तर मी न्यायालयात जाणार अशी प्रतिक्रीया जैन यानी व्यक्त केली. एकंदरीत काळी-पिवळीच्या भांडणात या मार्गावरील वाहतूक बस सोडून बंद असल्याने प्रवाशांचे बेहाल झाले आहे. यात पोलीस विभाग व जिल्ह्यातील वाहतूक विभागाने पुढाकार घेऊन मार्ग काढणे गरजेचे आहे. अशात त्वरीत या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)