शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

काळी-पिवळी मालकांच्या भांडणामुळे वाहतूक बंद

By admin | Updated: June 11, 2014 23:20 IST

आमगाव-गोंदिया मार्गावर जवळपास ४० ते ५० काळी-पिवळी टॅक्सी मागील अनेक वर्षांपासून चालत आहेत. सध्या एका व्यक्तीच्या तीन काळी-पिवळी चालत आहेत, असा वाद समोर आल्याने सतत तीन

आमगाव : आमगाव-गोंदिया मार्गावर जवळपास ४० ते ५० काळी-पिवळी टॅक्सी मागील अनेक वर्षांपासून चालत आहेत. सध्या एका व्यक्तीच्या तीन काळी-पिवळी चालत आहेत, असा वाद समोर आल्याने सतत तीन दिवसांपासून आमगाव-गोंदिया मार्गावरील वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे रखरखत्या उन्हाळ्यात हाल होत आहेत. यावर प्रशासनामार्फत कोणताच तोडगा न निघाल्याने मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. आमगाव-गोंदिया मार्गावरील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आमगाववरून गोंदिया येथे विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय व खाजगी न्यायालयीन कामाकरीता जाणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या या मार्गावर ४० ते ४५ काळी-पिवळी टॅक्सी गाडी चालत आहे. मात्र नगरातील नविन जैन यांच्या मालकीच्या दोन काळी-पिवळी चालत आहेत. त्यात पुन्हा दोनमध्ये एक गाडी वाढवून तिन गाड्या जैन यांनी चालू केल्यामुळे इतरांकडे ज्या एक-एक गाड्या आहेत. त्यांच्यावर मोठा परिणाम झाला आहे. याचे आर्थिक भुर्दंड मालकावर बसत आहे. त्यामुळे सतत तीन दिवसांपासून काळी-पिवळी संघटनेच्यावतीने आमगाव-गोंदिया मार्गावरील वाहतूक बंद आहे. प्रवाशांकरिता सुरू असलेल्या एसटीच्या गाड्या कमी झाल्याने प्रवाशांचे भर उन्हाळ्यात ेहाल झाले आहेत. यात काळी-पिवळी संघटनेने पोलीस निरीक्षक यांचे सोबत बैठक घेतली मात्र त्यात काही निष्पन्न झाले नाही. आता गोंदिया येथील रस्ता वाहतूक अधिकारी यांना भेटून मार्ग काढण्याचा काळी-पिवळी संघटनेचा संकल्प आहे. या मार्गावरील वाहतूकी संदर्भात जैन याना विचारले असता माझ्या दोन गाड्या आहेत. त्याची कागदपत्र बरोबर आहेत. तिसऱ्या गाडीबाबत जो आरोप लावला जात आहे तो बिनबुडाचा आहे. तिसऱ्या गाडीवर माझ्याकडून बंद झालेला चालक शोभेलाल याच्या मालकीची आहे. त्या गाडीला नोंदणीकृत संघटनेने परवानगी दिली आहे. जर सदर काळी-पिवळी संघटनेने माझ्या चालत असलेल्या गाड्या बंद करण्याचा प्रयत्न केला तर मी न्यायालयात जाणार अशी प्रतिक्रीया जैन यानी व्यक्त केली. एकंदरीत काळी-पिवळीच्या भांडणात या मार्गावरील वाहतूक बस सोडून बंद असल्याने प्रवाशांचे बेहाल झाले आहे. यात पोलीस विभाग व जिल्ह्यातील वाहतूक विभागाने पुढाकार घेऊन मार्ग काढणे गरजेचे आहे. अशात त्वरीत या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)