शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 12:13 IST

यंदा सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरिपातील रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे१ लाख १० हजार हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या४५ टक्के पावसाची तूट सिंचन प्रकल्पात मोजकाच साठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वातावरणातील बदलाचा शेतीवर झपाट्याने होत आहे. मागील तीन चार वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. यंदा सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरिपातील रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधी सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो. ऐवढा पाऊस धान लागवडीसाठी अनुकुल मानला जातो. त्यामुळेच जिल्ह्यात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. यंदा एकूण १ लाख ७७ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाणार आहे. त्यापैकी २७ जुलैपर्यंत ७१ हजार हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली असून अजून १ लाख १० हजार हेक्टरवरील रोवणी शिल्लक आहे. जुलै महिना संपत आला तरी अद्यापही पावसाने मागील वर्षीची सुध्दा सरासरी गाठली नाही. परिणामी सुरू असलेल्या धानाच्या रोवण्या देखील पूर्णपण खोळंबल्या आहे. पावसाअभावी रोवण्या लांबत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावित आहे. तर दुसरीकडे ७१ हजार हेक्टरवर केलेल्या रोवण्या सुध्दा पावसाअभावी वाळण्याच्या मार्गावर आला आहे.

रोवणी केलेल्या धानाच्या बांध्यामध्ये आतापासूनच भेगा पडण्यास सुरूवात झाली असून उन्ह देखील चांगलेच तापत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्येत आणखी भर टाकली आहे. मागीलवर्षी देखील पावसाअभावी रोवण्या खोळंबल्या होत्या. तर याच कालावधीत ३२ हजार ६१६ हेक्टरवर रोवण्या झाल्या होत्या. त्यातुुलनेत यंदा रोवण्या जास्ती झाल्या असल्या तरी दमदार पावसाअभावी नदी, नाले, बोड्या कोरड्या पडल्या असल्याने समस्येत वाढ झाली आहे. सिंचन प्रकल्पाच्या पाण्याच्या मदतीने सध्या केलेली रोवण्या वाचविण्याचे काम सुरू आहे. एकंदरीत पावसाच्या अनिश्चिततेमुळे जिल्ह्यावर कोरडा दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ