शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
3
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
4
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
5
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
6
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
7
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
8
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
9
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
10
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
11
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
12
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
13
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
14
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
15
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
17
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
18
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
19
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
20
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप

भाजपने केले जनतेचे स्वप्न साकार

By admin | Updated: November 16, 2015 01:48 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. एका वर्षात सरकारने लोककल्याणकारी निर्णय व योजनांद्वारे राज्याचा विकास साधला आहे.

अनिल सोले यांचे प्रतिपादन : वर्षपूर्तीनिमित्त भाजपची लोकसंवाद बैठकगोंदिया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. एका वर्षात सरकारने लोककल्याणकारी निर्णय व योजनांद्वारे राज्याचा विकास साधला आहे. शेतकरी, मजूर व सामान्य नागरिकांच्या समस्यांना सोडविण्यात यश मिळविले, असे मत आ. अनिल सोले यांनी केले. जलयुक्त शिवार अभियान, विजेचे प्रश्न, वस्त्रोद्योग धोरण, मेक इन महाराष्ट्र, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक, लंडन येथील वास्तुखरेदी, एलबीटी रद्द करणे, धानाला बोनस, सेवा हमी कायदा, मालगुजारी तलावांचे खोलीकरण, शिक्षण संदर्भातील निर्णय आदी अनेक निर्णयामुळे सरकारने जनतेचे स्वप्न साकारण्याचे कार्य केले, असे ते म्हणाले. मयूर लॉन येथे झालेल्या भाजप लोकसंवाद जिल्हा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल होते. बैठकीला प्रामुख्याने पूर्व विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, माजी आ. हेमंत पटले, माजी आ. दयाराम कापगते, माजी आ. हरीश मोरे, माजी आ. खोमेश रहांगडाले, प्रदेश सदस्य राकेश शर्मा, अशोक इंगळे, नेतराम कटरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव सीता रहांगडाले, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, विरेंद्र अंजनकर, दीपक कदम, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय कुलकर्णी उपस्थित होते. आ. सोले पुढे म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते विकासाच्या माध्यमातून अनेक राज्यमार्गांना राष्ट्रीय मार्ग करण्याचे धोरण अवलंबिले असून कार्य सुरू केले आहे. रेल्वेचे अनेक वर्षापासूनचे थांबलेले ब्रॉडगेजचे काम द्रुतगतीने सुरू झाले आहे. ज्या समस्या मागील १५ वर्षांत आघाडी सरकारने निर्माण करून ठेवल्या होत्या, त्या सोडविण्याचे काम भाजप सरकारने अल्पावधीतच केले आहे. राज्याचे दोन लाख कोटींचे बजेट असून तीन लाख कोटींच्या वर कर्ज असताना सरकारने अशा बिकट परिस्थितीत राज्याला सावरण्याचे कार्य केले आहे. सावकारी कर्जापासून मुक्ती, शेतकऱ्यांना कृषिपंप, जलयुक्त शिवार आदी शेतकरी हिताचे धोरण राबविल्याने राज्य विकासाच्या प्रवाहात आले आहे. गरिबांना घर, स्वच्छता मोहीम, आदर्श गाव संकल्पनेमुळे नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्याचे कार्य सरकार करीत आहे. कार्यकर्त्यांनी सरकारच्या प्रत्येक योजना व त्यांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता प्रत्येक बूथस्तरावर लोकसंवाद कार्यक्रमातून सांगण्याचे आवाहन केले. नगर पंचायत निवडणुकीत विजयी सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन विरेंद्र अंजनकर यांनी केले. कार्यक्रमाला मंडळ अध्यक्ष भरत क्षत्रीय, नंदकुमार बिसेन, रघुनाथ लांजेवार, लक्ष्मण भगत, प्रमोद संगीडवार, चतुर्भूज बिसेन, बाबा लिल्हारे, सर्व जि.प. सदस्य, नगरसेवक, पं.स. सदस्य जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाआ. विजय रहांगडाले यांनी जिल्ह्यातील अनेक समस्या शासनस्तरावर सोडविण्यात आल्याची माहिती दिली. तर आ. संजय पुराम यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांनी, जिल्ह्यात व राज्यात सरकारच्या कामातून निश्चितच विकास होत असल्याचे जनतेला दिसून आले आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाकरिता अनेक कल्याणकारी कार्य सुरू आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना व निर्णयांची माहिती पोहोचविण्याचे कार्य करावे, असे मत व्यक्त केले.