शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

त्या पाच गावांमध्ये शिक्षणाची दारे अद्यापही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेने त्या शाळांसाठी एक एक शिक्षक ही नियुक्त केले होते. म्हणायला तर शाळा सुरु झाल्या परंतु शाळा त्या गावापर्यंत ये-जा करणे मोठी तारेवरची कसरत असल्याने शिक्षकांना दरेकसावरुन पायी प्रवास करुन जावे लागत होते. शिक्षक त्या ठिकाणी एक दोन थांबायचे आणि थोडे शिक्षणाचे धडे देऊन दरेकसा येथे परत यायचे. काही वर्ष असेच चालले. आठ आठ दिवस शिक्षक शाळेत जात नव्हते.

ठळक मुद्देतीन वर्षापूर्वी बंद केल्या शाळा : मुरकुडोह-दंडारीच्या मुलांचे भवितव्य अंधातरी

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : ज्या महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर यांनी शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची मशाल पेटविण्यासाठी अख्खे आयुष्य समर्पित केले, त्याच महाराष्ट्रात आज २१ व्या शतकात सुद्धा अशी गावे आहेत जिथे शिक्षणाची दारे पुढे सुरु ठेवण्याऐवजी बंद करण्यात आली.या गावामध्ये मुरकुडोह-दंडारी सारख्या आदिवासी गावाचा आहे. मात्र अद्यापही येथे शाळा सुरू न झाल्याने येथील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे बंदच असल्याचे चित्र आहे.मुरकुडोह-दंडारी परिसरात मुरकुटडोहचे तीन गाव आणि दंडारी टेकाटोला मिळून एकूण पाच गावांचा समावेश आहे. मधात एक दोन छोट्या टोल्यांचा सुद्धा समावेश त्यात असून ही पाच गावे मिळून एकूण दोनशेच्यावर घरांमध्ये जवळपास ३५० कुटुंबांचे वास्तव्य आहे.अशात या ठिकाणी किमान प्राथमिक शिक्षणाची सोय असणे आवश्यक आहे. दोन दशकापूर्वी शासनाने ‘गाव तिथे शाळा’ ही योजना अंमलात आणली होती.या योजनेअंतर्गत मुरकुटडोह आणि दंडारी या गावांमध्ये सुद्धा एक एक शाळा मंजूर करण्यात आली होती.जिल्हा परिषदेने त्या शाळांसाठी एक एक शिक्षक ही नियुक्त केले होते. म्हणायला तर शाळा सुरु झाल्या परंतु शाळा त्या गावापर्यंत ये-जा करणे मोठी तारेवरची कसरत असल्याने शिक्षकांना दरेकसावरुन पायी प्रवास करुन जावे लागत होते. शिक्षक त्या ठिकाणी एक दोन थांबायचे आणि थोडे शिक्षणाचे धडे देऊन दरेकसा येथे परत यायचे. काही वर्ष असेच चालले. आठ आठ दिवस शिक्षक शाळेत जात नव्हते.या गावांमध्ये शिक्षण कसे चालले याची प्रत्यक्ष शहनिशा करण्यासाठी कोणता अधिकारी कधी पोहोचला नाही. नंतर शिक्षकांची संख्या वाढविण्यात आली. मात्र यानंतरही कोणताच शिक्षक नियमित जात नव्हता.एक तर सुदूर डोंगराळ भागात टापूवर असलेले गावावरुन नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्र त्यामुळे या भागात जाणे म्हणजे जीव मुठीत घेवून चालले,असे समजायचे. सालेकसा तालुक्यातील दरेकसा या परिसरात बदली करुन टाकायची यातच एखाद्या शिक्षकाला शिक्षा म्हणून बदली करायची असेल तर त्याला मुरकुटडोह दंडारी पाठवा असाच फरमान निघायचा. यामुळेच तो शिक्षक त्या शाळेत जाण्यासाठी घरुन तर निघायचा परंतु अर्ध्या रस्त्यातूनच परत यायचा. या सर्व प्रकारात सतत येथील विद्यार्थ्यांचे नुकसानच होत गेले. परिणामी येथील शाळा बंदच स्थितीत आहेत.पटसंख्या नाही म्हणून शाळा बंदमुरकुडोह-दंडारी येथे कसे बसे प्राथमिक शाळा सुरु असताना तीन वर्षापूर्वी शासनाने आदेश काढून ज्या शाळांमध्ये १० पेक्षा कमी पटसंख्या असेल त्या शाळांना बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे येथील तिन्ही प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या. या पाचही गावातील चिमुकल्यासाठी शिक्षणाची दारे बंद करण्यात आली. मागील तीन वर्षापासून शाळा बंद झाल्या आहेत. त्यामुळे या गावामधील काही मुले आश्रम शाळेत जातात तर उर्वरित मुले-मुली शिक्षणाविना असून त्यांचे भविष्य अंधातरी दिसत आहे.एक तरी शाळा सुरु करावीपाचही गावे मिळून किमान एक तरी प्राथमिक शाळा पुन्हा सुरु करावी अशी मागणी या गावातील नागरिकांनी केली आहे. नुकतेच गावकऱ्यांनी शिक्षण विभागासह लोकप्रतिनिधी निवेदन देवून प्राथमिक शाळा सुरु करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Educationशिक्षण