शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या हाता-पायाला मुंग्या तर येत नाहीत, दुर्लक्ष केल्यास बेतेल जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 15:59 IST

नियमित व्यायाम गरजेचा : लकव्याची लक्षणे, तात्काळ उपचार घेणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची: जीबीएस (गुलियन बॅरी सिंड्रोम) हा दुर्मीळ आजार असून यात हात-पाय लुळे पडण्यासारखी लक्षणे दिसतात. याकडे थोडेसे दुर्लक्ष केले तरीही ते जिवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच निदान, योग्य उपचार व आरोग्यदायी जीवनशैलीतून या संकटावर मात करता येणे शक्य आहे.

वयाच्या दीड वर्षानंतर बाळातील चालण्यात किंवा हात-पाय हलवण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्यास म्हणजे वेळीच जीबीएसवर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. साधारणतः हा आजार कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. अंग दुखणे, चालताना तोल जाणे, चेहरा सुजणे, चावताना व गिळताना त्रास होणे, हात-पाय लुळे पडणे, अशी लक्षणे दिसून येतात, तर या आजाराचे प्रमाण लहान बाळामध्ये अधिक दिसून येत असून बुलियन बॅरी सिंड्रोम एक वेगाने प्रगतिशील पॉलिन्यूरोपॅथी आहे ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात.

संशयास्पद रुग्णांसाठी इलेक्ट्रो मायोग्राफी आणि सीएसएफ विश्लेषण यासारख्या इलेक्ट्रोडायग्नोस्टिक उपचार करण्याचा सल्ला तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे या आजारा संदर्भातील लक्षणे आढळल्यानंतर तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे हितावह आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास या आजारातून सावरणे कठीण होते. यामुळे कायमचे अपंगत्व तसेच जीवालाही धोका होण्याची शक्यता असते.

ही आहेत या आजाराची लक्षणे?● हातापायाला मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे आणि • डोळे किंवा चेहऱ्याची हालचाल करण्यास त्रास होणे यासारख्या लक्षणांबद्दल सतर्क राहणे गरजेचे आहे.● मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात, फुफ्फुस आणि श्वासनलिकेवरही हल्ला करत रुग्णाची अवस्था पक्षघात म्हणजे लकवा झाल्यासारखी होते.

काय आहे जीबीएस? वायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे तसेच लसीकरणानंतर काही जणांना जीबीएस हा आजार झाल्याचे आढळले आहे. हाता- पायाच्या नसा कमजोर होतात. रोगप्रतिकार क्षमता हळूहळू कमी होत जाते. पक्षघात म्हणजेच लकवा वात अशा प्रकारचे आजार जळू शकतात. साधारणतः हे आजार लसीकरणानंतर अधिक प्रमाणात आढळल्याचे दिसून आले आहे.

उपचाराने टळेल धोकाजीबीएस किंवा एआयडीपी या आजारावर आयव्हीआयजी हे इंजेक्शन देणे महत्त्वाचे आहे. हे इंजेक्शन महागडे असून तीन दिवसांच्या आत दिल्यास रुग्णांवरील धोका टळतो. मात्र, हे उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीमध्येच हिताचे ठरते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हात-पाय लुळे पडण्याचीच लक्षणे नाही तर बाकी अवयवावर सुद्धा या आजाराचा प्रभाव पडू शकतो. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हे होऊ शकते; परंतु याचे प्रमाण वयाच्या दीड वर्षावरील बालकांमध्ये अधिक आढळून येते. त्यामुळे वेळीच योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन जीबीएसची चाचणी करून उपचार घेणे हितावह आहे.- डॉ. नरेंद्र खोबा, वैद्यकीय अधिकारी, कोरची

टॅग्स :gondiya-acगोंदिया