शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा अन् नळाला येणाऱ्या पाण्याचा काही संबंध असतो काय रे भाऊ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:10 IST

गोंदिया : यंदा हवामान विभागाने शंभर टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र सुरुवातीपासूनच पावसाच्या अनियमिततेने शेतकऱ्यांच्या काळजीत भर ...

गोंदिया : यंदा हवामान विभागाने शंभर टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र सुरुवातीपासूनच पावसाच्या अनियमिततेने शेतकऱ्यांच्या काळजीत भर घातली. जुलै महिना संपला तरी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात केवळ ३५ टक्केच पाणीसाठा आहे. धरण आणि मोठ्या सिंचन प्रकल्पांनी अजूनही ५० टक्क्याची पातळी गाठलेली नाही. त्यामुळे याचा काही प्रमाणात पाणीपुरवठ्यावरसुध्दा परिणाम होतो. गोंदिया शहराला डांगोर्ली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत शहरवासीयांना दोन पाळीत पुरेसा पाणीपुरवठा होत आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी वैनगंगा नदीचे पात्र लवकरच कोरडे पडल्याने पुजारीटोला धरणातून पाणी सोडून गोंदिया शहरवासीयांना पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र तेव्हा धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा होता. यंदा ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली तरी मोठी धरणे आणि सिंचन प्रकल्पात केवळ ३५ टक्के साठा असल्याने ही स्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळेच पावसाचा आणि नळाला येणाऱ्या पाण्याचा बराच संबंध येतो.

................

धरणातील पाणीसाठा

प्रकल्प संख्या उपयुक्त टक्केवारी

मोठे ४ २५.०० ३५.१०

मध्यम ९ २१.३६३ दलघमी २१.४२ टक्के

लघु २२ १०.३४० १४.९८ टक्के

....................

बळीराजा आनंदला.....

जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला असून आता आमची रोवणी आटोपत आली आहे. यंदा पाऊस लांबल्याने रोवणीला थोडा विलंब झाला होता. पण आता स्थिती ठीक आहे.

- विनोद बिसेन, शेतकरी

............

यंदा सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने काहीशी चिंता वाढविली होती. पण मागील तीन दिवसात झालेल्या पावसामुळे रोवणी करण्यास मदत झाली.

- दिलीपसिंह गहरवार, शेतकरी

...................

शहराला होतोय नियमित पाणीपुरवठा

- गोंदिया शहराला डांगोर्ली येथे वैनगंगा नदीच्या तीरावर उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत दोन वेळेस पुरेसा पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

- यंदा सुरुवातीपासूनच शहरवासीयांना पाणीटंचाईच्या समस्येला ताेंड द्यावे लागले नाही.

- पुजारीटोला धरणातसुध्दा पुरेसा पाणीसाठा असल्याने समस्या निर्माण झाली नाही.

................

शहरवासीय म्हणतात नळाला येतेय पुरेसे पाणी

यंदा आतापर्यंत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे दोन पाळीत पुरेसा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणीटंचाईची कुठलीच समस्या नाही.

- राधेश्याम आगलावे

...............

पाणीपुरवठ्याची समस्या नाही, मात्र काही ठिकाणी पाइपलाइन लिकेज असल्याने गढूळ पाणीपुरवठ्याची समस्या आहे. सध्या दोन पाणी पाळीत पुरेसा पाणीपुरवठा केला जात आहे.

- अतुल बारसागडे

..............

जिल्ह्यात झालेला पाऊस

तालुका अपेक्षित प्रत्यक्षात टक्केवारी

गोंदिया १२०८.७ मिमी ५५६.६ मिमी ४६ टक्के

आमगाव १४२५.६ मिमी ४६०.८ मिमी ३२.३ टक्के

तिरोडा ११५१.६ मिमी ५८०.६ मिमी ५०.४ टक्के

गोरेगाव १०२५.९ मिमी ५५८ मिमी ५४.४ टक्के

सालेकसा ११५८ मिमी ४८२.३ मिमी ४१.६ टक्के

देवरी १२९१ मिमी ५२१.४ मिमी ४०.४ टक्के

अर्जुनी मो. १३६१.१ मिमी ६३४.४ मिमी ४८.४ टक्के

सडक अ. १३३०.९ मिमी ४८६ मिमी ३६.६ टक्के

..............................................................................................