शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचा राज्यावर विश्वास नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST

मागील खरीप हंगामात या दोन्ही विभागाने रेकार्ड ब्रेक धान खरेदी केली. तर खरेदी केलेल्या धानाची भरडाईसाठी उचल न झाल्याने हा धान गोदामात तसाच पडून होता. त्यामुळे रबीतील धान खरेदी लांबली होती. शाळा आणि भाड्याने गोदाम घेऊन तोडगा काढण्यात आला होता. मात्र, अद्यापही गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत २४ लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत पडला. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षीच्या खरीप आणि रबी हंगामातील धानाची भरडाईसाठी अजूनही उचल झाली नाही. त्यामुळे गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत २४ लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत गोदामात पडले आहे. केंद्र सरकारकडून ३० डिसेंबर २०२१ पर्यंत धान भरडाईसाठी मुदतवाढ दिली जाते. मात्र, ही मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारकडून नकार दिला जात आहे. त्यांच्या रेकार्डनुसार धान शिल्लक नसल्याची माहिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने खरोखरच धान शिल्लक आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यासाठी केंद्राने चारही जिल्ह्यांत अधिकारी पाठविले आहेत. पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत धानाचे सर्वाधिक उत्पादन होत घेतले जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यानंतर खरेदी केलेल्या धानाची राइस मिलर्ससह करार करून भरडाई केली जाते. मागील खरीप हंगामात या दोन्ही विभागाने रेकार्ड ब्रेक धान खरेदी केली. तर खरेदी केलेल्या धानाची भरडाईसाठी उचल न झाल्याने हा धान गोदामात तसाच पडून होता. त्यामुळे रबीतील धान खरेदी लांबली होती. शाळा आणि भाड्याने गोदाम घेऊन तोडगा काढण्यात आला होता. मात्र, अद्यापही गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत २४ लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत पडला. केंद्र सरकारकडून यासंदर्भात हिरवी झेंडी मिळेपर्यंत या धानाची उचल करणे कठीण आहे. राज्य सरकार धानाची भरडाई करून तांदूळ भारतीय खाद्य महामंडळाकडे जमा करते. यासाठी केंद्र सरकारडून ३० सप्टेंबरपर्यंत तांदूळ जमा करण्यासाठी मुदत दिली जाते. मात्र, मागील वर्षी धान खरेदीस विलंब झाल्याने ३० डिसेंबरपर्यंत तांदूळ जमा करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे; पण केंद्र सरकारने मुदतवाढ देण्यास मनाई केल्याची माहिती आहे. केंद्राच्या माहितीनुसार राज्याकडे भरडाईसाठी धानच नाही. त्यामुळे त्यांनी खरोखरच धान शिल्लक आहे किंवा नाही, याची पाहणी करण्यासाठी चार अधिकाऱ्यांना पाठविले आहे. ते धानाची मोजणी करून केंद्र सरकारकडे अहवाल सादर करणार असून त्यानंतरच मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. 

धानाची मोजणी करणार कशी? - गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या चारही जिल्ह्यांत लाखो क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत आहे. हे धान गोदामात पडले आहे. त्यामुळे हे धान केंद्राकडून आलेले अधिकारी मोजणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची यंत्रणासुद्धा तणावात आहे. 

खरिपातील धान खरेदी होणार कशी?- मागील वर्षी खरेदी केलेल्या खरीप आणि रबीतील धानाची अद्यापही उचल करण्यात आली नाही. त्यामुळे नवीन खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे, असा प्रश्न आहे. ऑक्टोबरपासून नवीन धान खरेदीला सुरुवात होणार आहे. मात्र, गोदामात धान शिल्लक असल्याने नवीन खरेदी केलेले धान ठेवायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे धान खरेदी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी