शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

मदतीसाठी शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट पाहू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 21:01 IST

शेतकरी मेल्यानंतर त्यांना दोन लाखांची मदत देण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी येतात. परंतु त्या शेतकऱ्याने काबाडकष्ट करून पिकविलेल्या मालाला योग्य भाव देत नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव न देता त्याला कर्जाच्या खाईत जातपर्यंत कवडीची मदत करीत नाही.

ठळक मुद्देनाना पटोले यांचे प्रतिपादन : खमारी येथे कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकरी मेल्यानंतर त्यांना दोन लाखांची मदत देण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी येतात. परंतु त्या शेतकऱ्याने काबाडकष्ट करून पिकविलेल्या मालाला योग्य भाव देत नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव न देता त्याला कर्जाच्या खाईत जातपर्यंत कवडीची मदत करीत नाही. त्यांच्या कामाची किंमत मृत्यूनंतर करण्यापेक्षा आधीच मदत का करीत नाही. म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या मरण्याची वाट पाहते का? असा सवाल माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.गोंदिया जिल्हा कुणबी जनकल्याण संस्था खमारीतर्फे कुणबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात ते पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा. अर्जुन बुध्दे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपालदास अग्रवाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, पत्रकार नरेश रहिले, बाहेकर व्यसनमुक्ती केंद्राचे विजय बहेकार, प्राचार्य कमलबापू बहेकार, नगरसेविका भावना कदम, सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र फुंडे, छत्तीसगडच्या रायपूर येथील कुणबी समाजाचे अध्यक्ष एस.एस. ब्राम्हणकर, आमगाव येथील कुणबी समाजाचे संघटक बुधराम हत्तीमारे, पं.स. सदस्य मार्तंडराव बहेकार, काशिराम शिवणकर, चंद्रकुमार बहेकार, महादेव मेंढे, कैलाश साखरे, अमर वऱ्हाडे व इतर समाजबांधव उपस्थित होते.माजी खा. पटोले यांनी, सामूहिक विवाहात लग्न करणाºया जोडप्यांना आधी तालुकास्तरावर तहसील कार्यालयाच्या मार्फत लाभ देण्यात येत असल्याने सामूहिक विवाहात लग्न करणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढली. परंतु शासनाने ही मदत देण्यासाठी अनेक जाचक अटी घातल्यामुळे आता लोकांनी सामूहिक विवाहाकडे पाठ फिरविली आहे. सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे. समाजबांधवांनी वेळ व पैशाची बचत करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यातच लग्न करावे अस मत व्यक्त केले.या वेळी नरेश रहिले, प्राचार्य कमलबापू बहेकार, विजय शिवणकर आ. गोपालदास अग्रवाल, माजी खा. नाना पटोले व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अर्जुन बुध्दे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरूवात संत शिरोमणी तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व गणपतीच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.या वेळी मार्गदर्शन करताना आ. गोपालदास अग्रवाल यांनी, समाज संघटीत राहावा असे सांगितले. प्राचार्य कमलबापू बेहकार यांनी पीक विम्यातील दोष सांगितले. मागच्या वर्षी पावसाअभावी लागवड न झालेल्या उत्पन्न देणाऱ्या शेतीला तलाठ्यांकडून पडीक दाखविण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याला आणखीच अडचणीत आणले आहे, असे सांगितले.प्रास्ताविक अध्यक्ष बुधराम चुटे यांनी मांडले. संचालन प्रा. गजानन तरोणे यांनी केले. आभार नगरसेविका भावना कदम यांनी मानले. कार्यक्रमासाठी संख्याध्यक्ष बुधराम चुटे, सचिव आत्माराम कोरे, चिमनलाल मेंढे, सदाशिव भांडारकर, पुरन तावाडे, राजाराम तरोणे, लिखीराम मुनेश्वर, राजू मेंढे, महेंद्र मेंढे, भगवती चुटे, कल्पना पाथोडे, हुकूमता राखडे, संतोष हत्तीमारे, देवा तावाडे, अनिल भांडारकर, विष्णू भांडारकर, संतोष मेंढे, रविंद्र हत्तीमारे, रंजीत गायधने, रवी हत्तीमारे, तुळशीराम मेंढे, सुशील तावाडे गज्जू मेंढे, श्याम तावाडे, महेश भांडारकर, कमलेश तावाडे, गोवर्धन भांडारकर, सशभाष तरोणे, रूपेश मेंढे, सुनिल तावाडे, सोनू तावाडे, संतोष भांडारकर, राध्येश्याम गायधने, शकुन हत्तीमारे, आशा शिवणकर ललीता बागडे, कल्पना बागडे यांनी सहकार्य केले.पाच जोडपी विवाहबद्धगोंदिया जिल्हा कुणबी जनकल्याण संस्था खमारीतर्फे आयोजित कुणबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात पाच जोडप्यांचा विवाह करण्यात आला. मंगलाष्टके आमगाव येथील भरत चुटे यांनी गायिली. या सोहळ्यातील जोडप्यांना माजी खा. नाना पटोले यांनी आशीर्वाद दिले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले