शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मदतीसाठी शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट पाहू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 21:01 IST

शेतकरी मेल्यानंतर त्यांना दोन लाखांची मदत देण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी येतात. परंतु त्या शेतकऱ्याने काबाडकष्ट करून पिकविलेल्या मालाला योग्य भाव देत नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव न देता त्याला कर्जाच्या खाईत जातपर्यंत कवडीची मदत करीत नाही.

ठळक मुद्देनाना पटोले यांचे प्रतिपादन : खमारी येथे कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकरी मेल्यानंतर त्यांना दोन लाखांची मदत देण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी येतात. परंतु त्या शेतकऱ्याने काबाडकष्ट करून पिकविलेल्या मालाला योग्य भाव देत नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव न देता त्याला कर्जाच्या खाईत जातपर्यंत कवडीची मदत करीत नाही. त्यांच्या कामाची किंमत मृत्यूनंतर करण्यापेक्षा आधीच मदत का करीत नाही. म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या मरण्याची वाट पाहते का? असा सवाल माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.गोंदिया जिल्हा कुणबी जनकल्याण संस्था खमारीतर्फे कुणबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात ते पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा. अर्जुन बुध्दे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपालदास अग्रवाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, पत्रकार नरेश रहिले, बाहेकर व्यसनमुक्ती केंद्राचे विजय बहेकार, प्राचार्य कमलबापू बहेकार, नगरसेविका भावना कदम, सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र फुंडे, छत्तीसगडच्या रायपूर येथील कुणबी समाजाचे अध्यक्ष एस.एस. ब्राम्हणकर, आमगाव येथील कुणबी समाजाचे संघटक बुधराम हत्तीमारे, पं.स. सदस्य मार्तंडराव बहेकार, काशिराम शिवणकर, चंद्रकुमार बहेकार, महादेव मेंढे, कैलाश साखरे, अमर वऱ्हाडे व इतर समाजबांधव उपस्थित होते.माजी खा. पटोले यांनी, सामूहिक विवाहात लग्न करणाºया जोडप्यांना आधी तालुकास्तरावर तहसील कार्यालयाच्या मार्फत लाभ देण्यात येत असल्याने सामूहिक विवाहात लग्न करणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढली. परंतु शासनाने ही मदत देण्यासाठी अनेक जाचक अटी घातल्यामुळे आता लोकांनी सामूहिक विवाहाकडे पाठ फिरविली आहे. सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे. समाजबांधवांनी वेळ व पैशाची बचत करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यातच लग्न करावे अस मत व्यक्त केले.या वेळी नरेश रहिले, प्राचार्य कमलबापू बहेकार, विजय शिवणकर आ. गोपालदास अग्रवाल, माजी खा. नाना पटोले व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अर्जुन बुध्दे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरूवात संत शिरोमणी तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व गणपतीच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.या वेळी मार्गदर्शन करताना आ. गोपालदास अग्रवाल यांनी, समाज संघटीत राहावा असे सांगितले. प्राचार्य कमलबापू बेहकार यांनी पीक विम्यातील दोष सांगितले. मागच्या वर्षी पावसाअभावी लागवड न झालेल्या उत्पन्न देणाऱ्या शेतीला तलाठ्यांकडून पडीक दाखविण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याला आणखीच अडचणीत आणले आहे, असे सांगितले.प्रास्ताविक अध्यक्ष बुधराम चुटे यांनी मांडले. संचालन प्रा. गजानन तरोणे यांनी केले. आभार नगरसेविका भावना कदम यांनी मानले. कार्यक्रमासाठी संख्याध्यक्ष बुधराम चुटे, सचिव आत्माराम कोरे, चिमनलाल मेंढे, सदाशिव भांडारकर, पुरन तावाडे, राजाराम तरोणे, लिखीराम मुनेश्वर, राजू मेंढे, महेंद्र मेंढे, भगवती चुटे, कल्पना पाथोडे, हुकूमता राखडे, संतोष हत्तीमारे, देवा तावाडे, अनिल भांडारकर, विष्णू भांडारकर, संतोष मेंढे, रविंद्र हत्तीमारे, रंजीत गायधने, रवी हत्तीमारे, तुळशीराम मेंढे, सुशील तावाडे गज्जू मेंढे, श्याम तावाडे, महेश भांडारकर, कमलेश तावाडे, गोवर्धन भांडारकर, सशभाष तरोणे, रूपेश मेंढे, सुनिल तावाडे, सोनू तावाडे, संतोष भांडारकर, राध्येश्याम गायधने, शकुन हत्तीमारे, आशा शिवणकर ललीता बागडे, कल्पना बागडे यांनी सहकार्य केले.पाच जोडपी विवाहबद्धगोंदिया जिल्हा कुणबी जनकल्याण संस्था खमारीतर्फे आयोजित कुणबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात पाच जोडप्यांचा विवाह करण्यात आला. मंगलाष्टके आमगाव येथील भरत चुटे यांनी गायिली. या सोहळ्यातील जोडप्यांना माजी खा. नाना पटोले यांनी आशीर्वाद दिले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले