शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

पंतप्रधानांच्या आवाहनाला जिल्हावासीयांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

संपूर्ण देशच नव्हे तर जग कोरोना विरुध्द लढा देत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.कोरोना बाधीत रुग्णांच्या आकड्यात दररोज वाढ होत असून रविवारी महाराष्ट्रातील कोरोना बाधीत रुग्णांचा ६९० च्यावर पोहचला. त्यामुळे संपूर्ण नागरिकांमध्ये दहशतीचे वातारण आहे.

ठळक मुद्देप्रकाशाने उजळून निघाला परिसर : कुणी लावला दिवा तर कुणी सुरू केला मोबाईला टॉर्च, नऊ मिनिटांसाठी लाईट्स केले बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या अंधकाररुपी संकटावर १३० भारतीयांच्या एकजुट आणि प्रकाशपर्वातून मात करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना केले होते. यासाठी रविवारी (दि.५) रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करुन दिवे, मेणबत्ती अथवा मोबाईल टॉर्च सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते. याला जिल्हावासीयांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. नऊ मिनिटांसाठी सर्वांच्या घरातील लाईट्स बंद असल्याने सर्व परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाल्याचे चित्र होते.संपूर्ण देशच नव्हे तर जग कोरोना विरुध्द लढा देत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.कोरोना बाधीत रुग्णांच्या आकड्यात दररोज वाढ होत असून रविवारी महाराष्ट्रातील कोरोना बाधीत रुग्णांचा ६९० च्यावर पोहचला. त्यामुळे संपूर्ण नागरिकांमध्ये दहशतीचे वातारण आहे. कोरोना विरुध्दची लढाई शासन आणि प्रशासन सध्या युध्द पातळीवर लढत आहे. हा लढा अधिक तीव्र करुन देशवासीयांची या लढ्याविरुध्द एकजूट दाखवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील सर्व लाईट्स बंद करुन मेणबत्ती, दिवे, मोबाईल टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला गोंदिया शहर आणि जिल्हावासीयांकडून प्रतिसाद मिळाला. या प्रकाशपर्वात जवळपास सर्वच नागरिक सहभागी झाल्याने कोरोनारुपी अंधकारमय वातावरणात प्रकाशरुपी भारतवायीयांच्या एकजुटीने एक प्रकारे विजय मिळविल्याचे चित्र पाहयला मिळाले.या प्रकाशपर्वाची तयारी करण्यासाठी जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी, युवक आणि नागरिकांकडून फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून दोन तीन दिवसांपूर्वीपासूनच तयार केली जात होती. याचा सुध्दा काही प्रमाणात या प्रकाशपर्वात परिणाम दिसून आला.कुणी अंगणात कुणी लावले गॅलरीत दिवेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील काही नागरिकांनी रात्री नऊ वाजता आपल्या घराच्या गॅलरीत आणि अंगणात दिवे लावले होते. त्यामुळे कोरोनाच्या अंधकारमय वातावरणावर या प्रकाशपर्वाने काहीशी मात केल्याचे चित्र होते.मेणबत्त्या आणि मोबाईलचे टॉर्चरविवारी (दि.५) रात्री नऊ वाजताच अनेक नागरिकांनी आपल्या घराच्या गॅलरीत तर काही घराच्या प्रवेशव्दारासमोर येऊन व हातात मेणबत्त्या तसेच मोबाईल टॉर्च आॅन करुन या प्रकाशपर्वात आपला सहभाग नोंदवून भारतवासीयांच्या एकजुटीचा परिचय दिला.हे प्रकाशपर्वमागील पंधरा ते वीस दिवसांपासून देशात कोरोनाचा कहर आहे. परिणामी सर्वत्र लॉकडाऊन असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि काहीसे नैराश्याचे वातावरण आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी रविवारी प्रकाशपर्व साजरे करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वत्र दिवे लावण्यात आले होते. त्यामुळे सर्वत्र दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाल्याने हिरमुसलेल्या चेहऱ्यांवर या प्रकाशपर्वामुळे थोडासा आनंद झळकल्याचे चित्र होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या