शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

पंतप्रधानांच्या आवाहनाला जिल्हावासीयांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

संपूर्ण देशच नव्हे तर जग कोरोना विरुध्द लढा देत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.कोरोना बाधीत रुग्णांच्या आकड्यात दररोज वाढ होत असून रविवारी महाराष्ट्रातील कोरोना बाधीत रुग्णांचा ६९० च्यावर पोहचला. त्यामुळे संपूर्ण नागरिकांमध्ये दहशतीचे वातारण आहे.

ठळक मुद्देप्रकाशाने उजळून निघाला परिसर : कुणी लावला दिवा तर कुणी सुरू केला मोबाईला टॉर्च, नऊ मिनिटांसाठी लाईट्स केले बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या अंधकाररुपी संकटावर १३० भारतीयांच्या एकजुट आणि प्रकाशपर्वातून मात करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना केले होते. यासाठी रविवारी (दि.५) रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करुन दिवे, मेणबत्ती अथवा मोबाईल टॉर्च सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते. याला जिल्हावासीयांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. नऊ मिनिटांसाठी सर्वांच्या घरातील लाईट्स बंद असल्याने सर्व परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाल्याचे चित्र होते.संपूर्ण देशच नव्हे तर जग कोरोना विरुध्द लढा देत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.कोरोना बाधीत रुग्णांच्या आकड्यात दररोज वाढ होत असून रविवारी महाराष्ट्रातील कोरोना बाधीत रुग्णांचा ६९० च्यावर पोहचला. त्यामुळे संपूर्ण नागरिकांमध्ये दहशतीचे वातारण आहे. कोरोना विरुध्दची लढाई शासन आणि प्रशासन सध्या युध्द पातळीवर लढत आहे. हा लढा अधिक तीव्र करुन देशवासीयांची या लढ्याविरुध्द एकजूट दाखवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील सर्व लाईट्स बंद करुन मेणबत्ती, दिवे, मोबाईल टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला गोंदिया शहर आणि जिल्हावासीयांकडून प्रतिसाद मिळाला. या प्रकाशपर्वात जवळपास सर्वच नागरिक सहभागी झाल्याने कोरोनारुपी अंधकारमय वातावरणात प्रकाशरुपी भारतवायीयांच्या एकजुटीने एक प्रकारे विजय मिळविल्याचे चित्र पाहयला मिळाले.या प्रकाशपर्वाची तयारी करण्यासाठी जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी, युवक आणि नागरिकांकडून फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून दोन तीन दिवसांपूर्वीपासूनच तयार केली जात होती. याचा सुध्दा काही प्रमाणात या प्रकाशपर्वात परिणाम दिसून आला.कुणी अंगणात कुणी लावले गॅलरीत दिवेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील काही नागरिकांनी रात्री नऊ वाजता आपल्या घराच्या गॅलरीत आणि अंगणात दिवे लावले होते. त्यामुळे कोरोनाच्या अंधकारमय वातावरणावर या प्रकाशपर्वाने काहीशी मात केल्याचे चित्र होते.मेणबत्त्या आणि मोबाईलचे टॉर्चरविवारी (दि.५) रात्री नऊ वाजताच अनेक नागरिकांनी आपल्या घराच्या गॅलरीत तर काही घराच्या प्रवेशव्दारासमोर येऊन व हातात मेणबत्त्या तसेच मोबाईल टॉर्च आॅन करुन या प्रकाशपर्वात आपला सहभाग नोंदवून भारतवासीयांच्या एकजुटीचा परिचय दिला.हे प्रकाशपर्वमागील पंधरा ते वीस दिवसांपासून देशात कोरोनाचा कहर आहे. परिणामी सर्वत्र लॉकडाऊन असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि काहीसे नैराश्याचे वातावरण आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी रविवारी प्रकाशपर्व साजरे करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वत्र दिवे लावण्यात आले होते. त्यामुळे सर्वत्र दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाल्याने हिरमुसलेल्या चेहऱ्यांवर या प्रकाशपर्वामुळे थोडासा आनंद झळकल्याचे चित्र होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या